शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

coronavirus: "लसीकरणावरून भाजपा नेत्यांची राज्य सरकारवरील टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा’’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 15:55 IST

Corona Vaccination in Maharashtra : लसीकरणावरून भाजपा नेत्यांची राज्य सरकारवरील टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

ठळक मुद्देअत्यंत ढिसाळ आणि नियोजनशून्य मोदी सरकारने लसींचा पुरवठा न केल्याने हा कार्यक्रम देशपातळीवर सुरू होऊ शकणार नाही, ही बाब दुर्दैवी देशातील युवावर्गाची जबाबदारी मोदी सरकारने राज्यांवर ढकलली पण आता लसीकरणातील दिरंगाई ही तरुणाईच्या जीवावर उठणारी आहेभाजपाचे राज्यातील प्रवीण दरेकरांसारखे नेते आणि भाजपा आयटी सेल मात्र राज्य सरकारला दोष देत आहे. तसेच अपप्रचार करत आहे. याला चोराच्या उलट्या बोबा म्हणतात

मुंबई - पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध नसल्याने १ मे पासून सुरू होणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. ( Corona Vaccination) महाराष्ट्रातही लसींच्या टंचाईमुळे १ मेपासून लगेच लसीकरण होणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आधीच स्पष्ट केले होते. दरम्यान, कोरोना लसीकरणावरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्या राज्यातील भाजपा नेत्यांना काँग्रेसने जोरदार टोला लगावला आहे. लसीकरणावरून भाजपा नेत्यांची राज्य सरकारवरील टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. (Congress Spock person Sachin Sawant Criticize Maharashtra BJP leader on issue Of Corona Vaccination)

लसीकरणावरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांवर सचिन सावंत यांनी ट्विट करून निशाणा साधला आहे. त्यात ते म्हणतात की, एक मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. परंतु अत्यंत ढिसाळ आणि नियोजनशून्य मोदी सरकारने लसींचा पुरवठा न केल्याने हा कार्यक्रम देशपातळीवर सुरू होऊ शकणार नाही, ही बाब दुर्दैवी आहे. 

 

जगात लसीकरण युद्धपातळीवर सुरू असताना भाजपाचे राज्यातील प्रवीण दरेकरांसारखे नेते आणि भाजपा आयटी सेल मात्र राज्य सरकारला दोष देत आहे. तसेच अपप्रचार करत आहे. याला चोराच्या उलट्या बोबा म्हणतात. देशातील युवावर्गाची जबाबदारी मोदी सरकारने राज्यांवर ढकलली पण आता लसीकरणातील दिरंगाई ही तरुणाईच्या जीवावर उठणारी आहे, असेही सचिन सावंत म्हणाले. 

तसेच लसीकरणातील ही दिरंगाई केवळ १८ ते ४४ या वयोगटातच नाही. ४५ वर्षांवरील वयोगटातील लसीकरणही केंद्राने लसींचा पुरवठा नीट न केल्याने सातत्याने अडचणीत येत आहे. महाराष्ट्राला जाहीर केलेल्या ४३५०००  रेमडेसीवीरपैकी केवळ २,३०,००० इंजेक्शन पाठवले. मोदी सरकार दिलेले शब्द पाळत नसेल तर राज्यांनी नियोजन कसे करावे? असा सवालही सचिन सावंत यांनी विचारला आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSachin sawantसचिन सावंतcongressकाँग्रेसBJPभाजपा