शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

"कोरोना मध्य प्रदेशचं काय बिघडवेल ज्याचे प्रदेशाध्यक्ष विष्णू आणि मुख्यमंत्री शिव आहेत" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 11:49 IST

Corona Virus Shivraj Singh Chouhan And BJP Tarun Chugh : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि प्रदेशाध्यक्ष विष्णु दत्त शर्मा यांच्याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केलं आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर गेल्या 24 तासांत कोरोनाचे 28,204 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका नेत्याने अजब विधान केलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) आणि प्रदेशाध्यक्ष विष्णु दत्त शर्मा (Vishnu Dutt Sharma) यांच्याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केलं आहे. ज्याचे मुख्यमंत्री हे "शिव" आहेत त्यांचं कोरोना काय बिघडवेल? असं म्हटलं आहे. 

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुघ (Tarun Chugh) यांनी कोरोनाबाबत एक अजब विधान केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.  "कोरोना मध्य प्रदेशचं काय बिघडवेल ज्याचे प्रदेशाध्यक्ष विष्णू आणि मुख्यमंत्री शिव आहेत" असं तरुण चुघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलें आहे. भोपाळमधील एका कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली होती. तेव्हा असं म्हटलं आहे. तसेच या वर्षी डिसेंबरपर्यंत देशाच्या आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनाच्या लसीचे 135 कोटी डोस पोहोचवले जातील असं देखील चुघ यांनी म्हटलं आहे. 

काँग्रेस प्रवक्ते भूपेंद्र गुप्ता यांनी यावरून जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते हे फक्त पक्षाच्या कार्यकर्त्याकडून कौतुक ऐकण्यासाठी अशी विधान करत असल्याचं म्हटलं आहे. गुप्ता यांनी यावर्षी जानेवारी ते मे दरम्यान मध्य प्रदेशमध्ये 3.28 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जो सामान्य मृत्यू दरापेक्षा 54 टक्के अधिक होता. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी स्वतः कबुल केलं होतं की भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांच्या कुटुंबातील 3500 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता असा दावा केला आहे. 

मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 28,204 नवे रुग्ण; 147 दिवसांतील नीचांक

सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 147 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे.  मंगळवारी (10 ऑगस्ट) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 28,204 नवे रुग्ण आढळून आले आहेत. रिकव्हरी रेट हा 97.45 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,88,508 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानPoliticsराजकारण