शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

"कोरोना मध्य प्रदेशचं काय बिघडवेल ज्याचे प्रदेशाध्यक्ष विष्णू आणि मुख्यमंत्री शिव आहेत" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 11:49 IST

Corona Virus Shivraj Singh Chouhan And BJP Tarun Chugh : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि प्रदेशाध्यक्ष विष्णु दत्त शर्मा यांच्याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केलं आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर गेल्या 24 तासांत कोरोनाचे 28,204 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका नेत्याने अजब विधान केलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) आणि प्रदेशाध्यक्ष विष्णु दत्त शर्मा (Vishnu Dutt Sharma) यांच्याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केलं आहे. ज्याचे मुख्यमंत्री हे "शिव" आहेत त्यांचं कोरोना काय बिघडवेल? असं म्हटलं आहे. 

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुघ (Tarun Chugh) यांनी कोरोनाबाबत एक अजब विधान केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.  "कोरोना मध्य प्रदेशचं काय बिघडवेल ज्याचे प्रदेशाध्यक्ष विष्णू आणि मुख्यमंत्री शिव आहेत" असं तरुण चुघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलें आहे. भोपाळमधील एका कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली होती. तेव्हा असं म्हटलं आहे. तसेच या वर्षी डिसेंबरपर्यंत देशाच्या आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनाच्या लसीचे 135 कोटी डोस पोहोचवले जातील असं देखील चुघ यांनी म्हटलं आहे. 

काँग्रेस प्रवक्ते भूपेंद्र गुप्ता यांनी यावरून जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते हे फक्त पक्षाच्या कार्यकर्त्याकडून कौतुक ऐकण्यासाठी अशी विधान करत असल्याचं म्हटलं आहे. गुप्ता यांनी यावर्षी जानेवारी ते मे दरम्यान मध्य प्रदेशमध्ये 3.28 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जो सामान्य मृत्यू दरापेक्षा 54 टक्के अधिक होता. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी स्वतः कबुल केलं होतं की भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांच्या कुटुंबातील 3500 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता असा दावा केला आहे. 

मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 28,204 नवे रुग्ण; 147 दिवसांतील नीचांक

सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 147 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे.  मंगळवारी (10 ऑगस्ट) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 28,204 नवे रुग्ण आढळून आले आहेत. रिकव्हरी रेट हा 97.45 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,88,508 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानPoliticsराजकारण