शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

"कोरोना मध्य प्रदेशचं काय बिघडवेल ज्याचे प्रदेशाध्यक्ष विष्णू आणि मुख्यमंत्री शिव आहेत" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 11:49 IST

Corona Virus Shivraj Singh Chouhan And BJP Tarun Chugh : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि प्रदेशाध्यक्ष विष्णु दत्त शर्मा यांच्याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केलं आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर गेल्या 24 तासांत कोरोनाचे 28,204 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका नेत्याने अजब विधान केलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) आणि प्रदेशाध्यक्ष विष्णु दत्त शर्मा (Vishnu Dutt Sharma) यांच्याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केलं आहे. ज्याचे मुख्यमंत्री हे "शिव" आहेत त्यांचं कोरोना काय बिघडवेल? असं म्हटलं आहे. 

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुघ (Tarun Chugh) यांनी कोरोनाबाबत एक अजब विधान केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.  "कोरोना मध्य प्रदेशचं काय बिघडवेल ज्याचे प्रदेशाध्यक्ष विष्णू आणि मुख्यमंत्री शिव आहेत" असं तरुण चुघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलें आहे. भोपाळमधील एका कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली होती. तेव्हा असं म्हटलं आहे. तसेच या वर्षी डिसेंबरपर्यंत देशाच्या आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनाच्या लसीचे 135 कोटी डोस पोहोचवले जातील असं देखील चुघ यांनी म्हटलं आहे. 

काँग्रेस प्रवक्ते भूपेंद्र गुप्ता यांनी यावरून जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते हे फक्त पक्षाच्या कार्यकर्त्याकडून कौतुक ऐकण्यासाठी अशी विधान करत असल्याचं म्हटलं आहे. गुप्ता यांनी यावर्षी जानेवारी ते मे दरम्यान मध्य प्रदेशमध्ये 3.28 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जो सामान्य मृत्यू दरापेक्षा 54 टक्के अधिक होता. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी स्वतः कबुल केलं होतं की भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांच्या कुटुंबातील 3500 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता असा दावा केला आहे. 

मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 28,204 नवे रुग्ण; 147 दिवसांतील नीचांक

सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 147 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे.  मंगळवारी (10 ऑगस्ट) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 28,204 नवे रुग्ण आढळून आले आहेत. रिकव्हरी रेट हा 97.45 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,88,508 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानPoliticsराजकारण