शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

Coronavirus: “कोरोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर १०, ११, १२ आणि १३ या तारखांना सकाळी १० वाजता यज्ञ करावा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 17:17 IST

मध्य प्रदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राजधानी भोपाळसह अन्य शहरात शेकडो मृत्यू झाले आहेत.

ठळक मुद्देशिवराज चौहान सरकार राज्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी आधीच तयारी करत आहे त्यात पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी कोरोना लाटेबद्दल अजबगजब तर्क लढवला आहेयज्ञ केला तर कोरोनाची तिसरी लाट भारताला स्पर्शही करू शकत नाही.

इंदौर – कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी जगातील प्रत्येक देश याविरुद्ध आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. जगात या महामारी हाहाकार माजवला आहे. भारतातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. कोरोना रोखण्यासाठी संशोधक दिवसरात्र मेहनत घेत आहेत. याच दरम्यान अनेक राजकीय नेते कोरोना नियंत्रणात आणण्यावरून अजबगजब उपाय सांगत असल्याचं दिसून आलं आहे.

यूपीतील एका भाजपा नेत्याने अलीकडेच गोमूत्र प्यायल्याने कोरोना ठीक होतो असं विधान केले होते. त्यानंतर आता मध्य प्रदेशात वादग्रस्त विधानांनी नेहमी चर्चेत असणाऱ्या मंत्री उषा ठाकूर यांनी अनोखा सल्ला दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर सर्व लोकांनी सकाळी १० वाजता यज्ञ करायला हवा असं उषा ठाकूर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या विधानावर चर्चा होऊ लागली आहे.

मध्य प्रदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राजधानी भोपाळसह अन्य शहरात शेकडो मृत्यू झाले आहेत. भोपाळमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूनंतर चितेचे फोटो देश आणि जगात व्हायरल झाले होते. आता शिवराज चौहान सरकार राज्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी आधीच तयारी करत आहे त्यात पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी सांगितलं की, देशात कोरोना महामारीची तिसरी लाट थांबवायची असेल तर लोकांनी यज्ञ करायला हवा. भारताची सनातन आणि पौराणिक परंपरेचा हवाला देत ठाकूर यांनी यज्ञ करण्याची वेळही निश्चित केली.

मंत्री उषा ठाकूर यांनी सांगितले की, यज्ञ केला तर कोरोनाची तिसरी लाट भारताला स्पर्शही करू शकत नाही. कोरोनाची तिसरी लाट नियंत्रित करण्यासाठी सरकार सर्व तयारी करत आहे. सर्वांचे प्रयत्न यशस्वी होतील. सर्व लोकांनीही पर्यावरण शुद्ध करण्यासाठी यज्ञ करावा. आता १०, ११, १२ आणि १३ या तारखेला सकाळी १० वाजता यज्ञ करावा. यज्ञ हे वैद्यकीय आहे हे कर्मकांड अथवा अंधविश्वास नाही. तर पर्यावरण शुद्ध करण्याची वैद्यकीय प्रक्रिया आहे असा दावा त्यांनी केला.

 दरम्यान, उषा ठाकूर यांनी पहिल्यांदा असं विधान केले आहे असे नाही. तर याआधीही मास्कवरून केलेल्या विधानावरून त्या चर्चेत आल्या होत्या. मास्कचा वापर करण्यावरून उषा ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी सांगितलं होतं की, मी रोज योगा करते, प्राणायम करते आणि सप्तशक्ती पाठ करते त्यामुळे मला कोरोना होऊ शकत नाही असाही दावा त्यांनी केला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा