शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: “कोरोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर १०, ११, १२ आणि १३ या तारखांना सकाळी १० वाजता यज्ञ करावा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 17:17 IST

मध्य प्रदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राजधानी भोपाळसह अन्य शहरात शेकडो मृत्यू झाले आहेत.

ठळक मुद्देशिवराज चौहान सरकार राज्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी आधीच तयारी करत आहे त्यात पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी कोरोना लाटेबद्दल अजबगजब तर्क लढवला आहेयज्ञ केला तर कोरोनाची तिसरी लाट भारताला स्पर्शही करू शकत नाही.

इंदौर – कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी जगातील प्रत्येक देश याविरुद्ध आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. जगात या महामारी हाहाकार माजवला आहे. भारतातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. कोरोना रोखण्यासाठी संशोधक दिवसरात्र मेहनत घेत आहेत. याच दरम्यान अनेक राजकीय नेते कोरोना नियंत्रणात आणण्यावरून अजबगजब उपाय सांगत असल्याचं दिसून आलं आहे.

यूपीतील एका भाजपा नेत्याने अलीकडेच गोमूत्र प्यायल्याने कोरोना ठीक होतो असं विधान केले होते. त्यानंतर आता मध्य प्रदेशात वादग्रस्त विधानांनी नेहमी चर्चेत असणाऱ्या मंत्री उषा ठाकूर यांनी अनोखा सल्ला दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर सर्व लोकांनी सकाळी १० वाजता यज्ञ करायला हवा असं उषा ठाकूर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या विधानावर चर्चा होऊ लागली आहे.

मध्य प्रदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राजधानी भोपाळसह अन्य शहरात शेकडो मृत्यू झाले आहेत. भोपाळमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूनंतर चितेचे फोटो देश आणि जगात व्हायरल झाले होते. आता शिवराज चौहान सरकार राज्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी आधीच तयारी करत आहे त्यात पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी सांगितलं की, देशात कोरोना महामारीची तिसरी लाट थांबवायची असेल तर लोकांनी यज्ञ करायला हवा. भारताची सनातन आणि पौराणिक परंपरेचा हवाला देत ठाकूर यांनी यज्ञ करण्याची वेळही निश्चित केली.

मंत्री उषा ठाकूर यांनी सांगितले की, यज्ञ केला तर कोरोनाची तिसरी लाट भारताला स्पर्शही करू शकत नाही. कोरोनाची तिसरी लाट नियंत्रित करण्यासाठी सरकार सर्व तयारी करत आहे. सर्वांचे प्रयत्न यशस्वी होतील. सर्व लोकांनीही पर्यावरण शुद्ध करण्यासाठी यज्ञ करावा. आता १०, ११, १२ आणि १३ या तारखेला सकाळी १० वाजता यज्ञ करावा. यज्ञ हे वैद्यकीय आहे हे कर्मकांड अथवा अंधविश्वास नाही. तर पर्यावरण शुद्ध करण्याची वैद्यकीय प्रक्रिया आहे असा दावा त्यांनी केला.

 दरम्यान, उषा ठाकूर यांनी पहिल्यांदा असं विधान केले आहे असे नाही. तर याआधीही मास्कवरून केलेल्या विधानावरून त्या चर्चेत आल्या होत्या. मास्कचा वापर करण्यावरून उषा ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी सांगितलं होतं की, मी रोज योगा करते, प्राणायम करते आणि सप्तशक्ती पाठ करते त्यामुळे मला कोरोना होऊ शकत नाही असाही दावा त्यांनी केला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा