शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
4
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
5
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
6
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
7
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
8
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
9
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
10
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
11
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
12
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
13
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
14
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
15
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
16
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
17
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
18
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
19
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

Coronavirus: “कोरोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर १०, ११, १२ आणि १३ या तारखांना सकाळी १० वाजता यज्ञ करावा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 17:17 IST

मध्य प्रदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राजधानी भोपाळसह अन्य शहरात शेकडो मृत्यू झाले आहेत.

ठळक मुद्देशिवराज चौहान सरकार राज्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी आधीच तयारी करत आहे त्यात पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी कोरोना लाटेबद्दल अजबगजब तर्क लढवला आहेयज्ञ केला तर कोरोनाची तिसरी लाट भारताला स्पर्शही करू शकत नाही.

इंदौर – कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी जगातील प्रत्येक देश याविरुद्ध आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. जगात या महामारी हाहाकार माजवला आहे. भारतातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. कोरोना रोखण्यासाठी संशोधक दिवसरात्र मेहनत घेत आहेत. याच दरम्यान अनेक राजकीय नेते कोरोना नियंत्रणात आणण्यावरून अजबगजब उपाय सांगत असल्याचं दिसून आलं आहे.

यूपीतील एका भाजपा नेत्याने अलीकडेच गोमूत्र प्यायल्याने कोरोना ठीक होतो असं विधान केले होते. त्यानंतर आता मध्य प्रदेशात वादग्रस्त विधानांनी नेहमी चर्चेत असणाऱ्या मंत्री उषा ठाकूर यांनी अनोखा सल्ला दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर सर्व लोकांनी सकाळी १० वाजता यज्ञ करायला हवा असं उषा ठाकूर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या विधानावर चर्चा होऊ लागली आहे.

मध्य प्रदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राजधानी भोपाळसह अन्य शहरात शेकडो मृत्यू झाले आहेत. भोपाळमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूनंतर चितेचे फोटो देश आणि जगात व्हायरल झाले होते. आता शिवराज चौहान सरकार राज्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी आधीच तयारी करत आहे त्यात पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी सांगितलं की, देशात कोरोना महामारीची तिसरी लाट थांबवायची असेल तर लोकांनी यज्ञ करायला हवा. भारताची सनातन आणि पौराणिक परंपरेचा हवाला देत ठाकूर यांनी यज्ञ करण्याची वेळही निश्चित केली.

मंत्री उषा ठाकूर यांनी सांगितले की, यज्ञ केला तर कोरोनाची तिसरी लाट भारताला स्पर्शही करू शकत नाही. कोरोनाची तिसरी लाट नियंत्रित करण्यासाठी सरकार सर्व तयारी करत आहे. सर्वांचे प्रयत्न यशस्वी होतील. सर्व लोकांनीही पर्यावरण शुद्ध करण्यासाठी यज्ञ करावा. आता १०, ११, १२ आणि १३ या तारखेला सकाळी १० वाजता यज्ञ करावा. यज्ञ हे वैद्यकीय आहे हे कर्मकांड अथवा अंधविश्वास नाही. तर पर्यावरण शुद्ध करण्याची वैद्यकीय प्रक्रिया आहे असा दावा त्यांनी केला.

 दरम्यान, उषा ठाकूर यांनी पहिल्यांदा असं विधान केले आहे असे नाही. तर याआधीही मास्कवरून केलेल्या विधानावरून त्या चर्चेत आल्या होत्या. मास्कचा वापर करण्यावरून उषा ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी सांगितलं होतं की, मी रोज योगा करते, प्राणायम करते आणि सप्तशक्ती पाठ करते त्यामुळे मला कोरोना होऊ शकत नाही असाही दावा त्यांनी केला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा