शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

Bihar Assembly Election 2020: कोरोना संपला का? बिहार निवडणुकीवरून संजय राऊतांचा बाण; भाजपवरही शरसंधान

By कुणाल गवाणकर | Updated: September 25, 2020 15:01 IST

सुशांतच्या मृत्यूचा वापर केवळ निवडणुकीतील राजकारणासाठी; राऊतांची थेट टीका

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचं राजकारण करण्यात येत आहे. त्यासाठी मुंबईची, इथल्या पोलिसांची बदनामी करण्यात आली. बिहारमधल्या सत्ताधाऱ्यांकडे कोणताही मुद्दा नसल्यानंच भावनिक गोष्टींचा आधार घेतला जात असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत असताना राऊत यांनी बिहार निवडणूक, सुशांत सिंह राजपूत प्रकरणासह नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची कारवाई, उत्तर प्रदेशातील फिल्मसिटी याबद्दलची शिवसेनेची भूमिका यावर सविस्तर भाष्य केलं. एका बूथवर 1000 मतदार, वेळेची मर्यादा वाढवली; कोरोनाग्रस्तांनाही करता येणार मतदान'कोरोनामुळे देशात अभूतपूर्व परिस्थिती आहे. सध्या लोकांना निवडणुका नकोत, तर काम हवंय. निवडणुका घेण्यासारखी स्थिती बिहारमध्ये आहे का?, याचा विचार व्हायला हवा. कोरोना संपला असेल, तर मग निवडणूक आयोगानं तसं जाहीर करायला हवं,' असं राऊत म्हणाले. 'विकासाचे मुद्देच नसल्यानं सुशांत सिंह राजपूतच्या नावावर बिहारमध्ये भावनिक मुद्दे तापवले जात आहेत. सुशांत हाच तिथे प्रचाराचा मुद्दा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलानं पोस्टरदेखील छापले आहेत,' अशा शब्दांत राऊत यांनी बिहारच्या राजकारणावर भाष्य केलं.बिहारमध्ये दिवाळीपूर्वीच 'फटाके वाजणार'; विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर'बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांवर टीका करत होते. आता त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे. ते बक्सरमधून निवडणूक लढवणार आहेत. सुशांतवरून सुरू असलेल्या राजकीय नाट्यात त्यांनी पडदे ओढण्याचं काम केलं. सुशांत प्रकरणावरून सगळं नाट्य रचण्यात आलं. दिग्दर्शन, नेपथ्य, संहिता, पार्श्वसंगीत सगळं काही ठरवून करण्यात आलं,' असंदेखील राऊत पुढे म्हणाले. नितीश कुमार यांच्या सरकारबद्दल जनतेच्या मनात नाराजी आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच हे सगळं करण्यात आल्याचा दावादेखील त्यांनी केला."मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर शरद पवारांनी अन्नत्याग केला असता तर बरे वाटले असते"सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवलं जावं म्हणून सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेण्यात आली. मात्र महिन्याभरानंतरही सीबीआयचे हात रिकामेच आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता अनेक कलाकारांची चौकशी करत आहे. मात्र सीमेवरून देशात अंमली पदार्थ येऊ न देणे हे त्यांचं खरं काम आहे, असं राऊत यांनी म्हटलं.उत्तर प्रदेश सरकार चित्रपट नगरी उभारत असेल, तर चांगलंच आहे. प्रत्येक राज्याला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. पण त्यामुळे मुंबईचं वैभव कमी होणार नाही. कलाकारांनी मोठ्या कष्टानं मुंबईला घडवलं. तुम्ही चित्रपट नगरी उभाराल. पण राज कपूर, देवानंद कुठून आणाल? असा सवाल राऊत यांनी विचारला. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यासारख्या कलाकारांनी इथेच नाव कमावलं. ही मंडळी चित्रपट नगरी सुरू झाली म्हणून उत्तर प्रदेशात जाणार नाहीत, असं राऊत म्हणाले.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत