शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Assembly Election 2020: कोरोना संपला का? बिहार निवडणुकीवरून संजय राऊतांचा बाण; भाजपवरही शरसंधान

By कुणाल गवाणकर | Updated: September 25, 2020 15:01 IST

सुशांतच्या मृत्यूचा वापर केवळ निवडणुकीतील राजकारणासाठी; राऊतांची थेट टीका

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचं राजकारण करण्यात येत आहे. त्यासाठी मुंबईची, इथल्या पोलिसांची बदनामी करण्यात आली. बिहारमधल्या सत्ताधाऱ्यांकडे कोणताही मुद्दा नसल्यानंच भावनिक गोष्टींचा आधार घेतला जात असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत असताना राऊत यांनी बिहार निवडणूक, सुशांत सिंह राजपूत प्रकरणासह नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची कारवाई, उत्तर प्रदेशातील फिल्मसिटी याबद्दलची शिवसेनेची भूमिका यावर सविस्तर भाष्य केलं. एका बूथवर 1000 मतदार, वेळेची मर्यादा वाढवली; कोरोनाग्रस्तांनाही करता येणार मतदान'कोरोनामुळे देशात अभूतपूर्व परिस्थिती आहे. सध्या लोकांना निवडणुका नकोत, तर काम हवंय. निवडणुका घेण्यासारखी स्थिती बिहारमध्ये आहे का?, याचा विचार व्हायला हवा. कोरोना संपला असेल, तर मग निवडणूक आयोगानं तसं जाहीर करायला हवं,' असं राऊत म्हणाले. 'विकासाचे मुद्देच नसल्यानं सुशांत सिंह राजपूतच्या नावावर बिहारमध्ये भावनिक मुद्दे तापवले जात आहेत. सुशांत हाच तिथे प्रचाराचा मुद्दा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलानं पोस्टरदेखील छापले आहेत,' अशा शब्दांत राऊत यांनी बिहारच्या राजकारणावर भाष्य केलं.बिहारमध्ये दिवाळीपूर्वीच 'फटाके वाजणार'; विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर'बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांवर टीका करत होते. आता त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे. ते बक्सरमधून निवडणूक लढवणार आहेत. सुशांतवरून सुरू असलेल्या राजकीय नाट्यात त्यांनी पडदे ओढण्याचं काम केलं. सुशांत प्रकरणावरून सगळं नाट्य रचण्यात आलं. दिग्दर्शन, नेपथ्य, संहिता, पार्श्वसंगीत सगळं काही ठरवून करण्यात आलं,' असंदेखील राऊत पुढे म्हणाले. नितीश कुमार यांच्या सरकारबद्दल जनतेच्या मनात नाराजी आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच हे सगळं करण्यात आल्याचा दावादेखील त्यांनी केला."मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर शरद पवारांनी अन्नत्याग केला असता तर बरे वाटले असते"सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवलं जावं म्हणून सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेण्यात आली. मात्र महिन्याभरानंतरही सीबीआयचे हात रिकामेच आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता अनेक कलाकारांची चौकशी करत आहे. मात्र सीमेवरून देशात अंमली पदार्थ येऊ न देणे हे त्यांचं खरं काम आहे, असं राऊत यांनी म्हटलं.उत्तर प्रदेश सरकार चित्रपट नगरी उभारत असेल, तर चांगलंच आहे. प्रत्येक राज्याला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. पण त्यामुळे मुंबईचं वैभव कमी होणार नाही. कलाकारांनी मोठ्या कष्टानं मुंबईला घडवलं. तुम्ही चित्रपट नगरी उभाराल. पण राज कपूर, देवानंद कुठून आणाल? असा सवाल राऊत यांनी विचारला. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यासारख्या कलाकारांनी इथेच नाव कमावलं. ही मंडळी चित्रपट नगरी सुरू झाली म्हणून उत्तर प्रदेशात जाणार नाहीत, असं राऊत म्हणाले.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत