शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Cabinet reshuffle: मोदींच्या कॅबिनेट विस्तारानंतर NDA मध्ये वादाची पहिली ठिणगी; मित्रपक्षाचा भाजपाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 11:59 IST

Narendra Modi Cabinet Reshuffle: उत्तर प्रदेशात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मोदी सरकारच्या कॅबिनेट विस्ताराकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली. परंतु निषाद पार्टीच्या हाती काहीच लागलं नाही. “दगाबाज सरकार का दर्द दिल मे है और दिल मुश्किल मै है” अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होतो मग प्रविण निषादचा का नाही?

लखनौ – मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार बुधवारी दिल्लीत पार पडला. तब्बल ४३ नव्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तारात नव्या नेत्यांना संधी देण्याबरोबरच मोदींनी काही दिग्गज नेत्यांचे राजीनामेही घेतल्याने अनेकांना धक्का बसला. रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, हर्षवर्धन यांच्यासह १२ मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले. नव्या मंत्रिमंडळात उत्तर प्रदेशच्या ७ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मोदी सरकारच्या कॅबिनेट विस्ताराकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. यात उत्तर प्रदेशातील अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली. परंतु निषाद पार्टीच्या हाती काहीच लागलं नाही. त्यामुळे भाजपाचा घटक पक्ष असलेली निषाद पार्टी नाराज झाली आहे. संजय निषाद यांनी थेट मोदी सरकारला दगाबाज सरकार म्हणून उल्लेख केला. “दगाबाज सरकार का दर्द दिल मे है और दिल मुश्किल मै है” अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारच्या कॅबिनेट विस्तारावर भाष्य केले आहे. निषाद पार्टीचे संस्थापक संजय निषाद यांनी त्यांचा मुलगा खासदार प्रविण निषादला केंद्रीय मंत्रिमंडळात न घेतल्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे.

संजय निषाद म्हणाले की, अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होतो मग प्रविण निषादचा का नाही? निषाद समुदायाचे लोक याआधीच भाजपापासून दूर जात आहेत. जर पक्षाने त्यांची चूक सुधारली नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम पाहायला मिळतील असा इशारा त्यांनी भाजपाला दिला आहे. प्रविण निषाद यांचा कॅबिनेटमध्ये समावेश नसल्याने निषाद समाजाची फसवणूक झाली आहे. १८ टक्के निषाद समाजाचा पुन्हा विश्वासघात झाला आहे. तर ४-५ टक्क्यावाल्यांना मंत्रिपद मिळालं असा आरोप त्यांनी केला.

संजय निषाद यांचे पुत्र खासदार प्रविण हे कबीर नगरमधून लोकसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. २०१७ मध्ये प्रविणने गोरखपूर पोटनिवडणुकीत सपा उमेदवार म्हणून विजय मिळवला होता. अनुप्रिया पटेल यांच्यावर निशाणा साधत निषाद पार्टीचे अध्यक्ष संजय निषाद म्हणाले की, जे लोक स्वत:ची जागा जिल्हा पंचायत अध्यक्ष निवडणुकीत जिंकवू शकत नाहीत. ज्या लोकांनी भाजपाचा पराभव करण्यासाठी काम केले अशांना मंत्रिपद दिलं. निषाद समाजाने एकगठ्ठा मतं देऊन उत्तर प्रदेश आणि केंद्रात भाजपाचं सरकार बनवलं असं संजय निषाद म्हणाले.

त्याचसोबत सध्या आम्ही भाजपासोबत आहोत परंतु भाजपाने आमच्याकडे दुर्लक्ष केल्याने आगामी काळात आम्ही आमच्या रणनीतीवर विचार करू. भाजपासोबत आघाडी करायची काही नाही हे ठरवू असं संजय निषाद म्हणाले. २०१७ च्या गोरखपूर पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाने संजय निषाद यांचे पुत्र प्रविण निषादला मैदानात उतरवलं. त्यांच्यासमोर भाजपाचे उपेंद्र दत्त शुक्ला उभे होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर गडात प्रविण निषादने विजय मिळवला. त्यानंतर ते चर्चेत आले. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी प्रविण निषाद यांनी भाजपात प्रवेश घेतला. त्यानंतर भाजपाने प्रविण निषाद यांना संत कबीर नगर लोकसभा जागेवरून तिकीट दिलं. या निवडणुकीत प्रविण निषाद जिंकले. प्रविण निषाद भाजपाचे खासदार आहेत. जर त्यांनी पक्ष सोडला तर त्यांची खासदारकी धोक्यात येऊ शकते. त्याचमुळे संजय निषाद भाजपासोबत दिसत आहेत.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदी