शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीवर अंकुश ठेवण्यासाठी काँग्रेसचं नाराजी नाट्य; अजित पवारांचा फोन जाताच उपोषण रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 06:48 IST

अनेक ठिकाणी निधी वाटप करत असताना ज्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सदस्य जास्त आहेत, त्यांना झुकते माप दिले गेले. यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता होती.

अतुल कुलकर्णी मुंबई : काँग्रेस आमदारांच्या कार्यक्षेत्रातील नगरपालिकांना निधी देण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करीत, काँग्रेसच्या ११ आमदारांनी उपोषणाचे अस्त्र उपसले होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करताच आ. कैलास गोरंट्याल यांनी आपले उपोषण मागे घेतले.

विकास निधीच्या माध्यमातून काँग्रेस दबाव गट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. जर राष्ट्रवादीकडून अशा पद्धतीने काँग्रेसच्या आमदारांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जाऊ लागले तर, हा दबाव गट कामाला येईल, असा प्रयत्न यामागे असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले. विविध मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी २५/१५ या नियमाखाली निधी दिला जातो. या निधीचे वाटप करताना राष्ट्रवादीच्या आमदारांना झुकते माप देण्यात आले. नगर विकास विभागाकडून देण्यात येणाऱ्या निधीमध्ये देखील शिवसेनेच्या आमदारांना झुकते माप दिले गेले. काँग्रेसचे आमदार ज्या मतदारसंघात आहेत तिथल्या नगरपालिकांना पुरेसा निधी मिळाला नाही.

अनेक ठिकाणी निधी वाटप करत असताना ज्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सदस्य जास्त आहेत, त्यांना झुकते माप दिले गेले. यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता होती. हा विषय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर घातला होता. थोरात म्हणाले, ठाकरे आणि अजित पवार दोघांशीही बोललो आहे.मधल्या काळात काही निधी कमी दिला गेला, पण पुरवणी मागण्यांमध्ये सगळ््यांना व्यवस्थित निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. आमदारांची नाराजी असणे समजू शकतो, कारण प्रत्येकाला आपल्या मतदारसंघासाठी विकास कामांकरता निधीला पाहिजे असतो. मात्र लगेच सरकारवर संकट आले, असा त्याचा अर्थ काढणे योग्य नाही, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.

उर्वरित दहा आमदार कोण आहेत असे विचारले असता आमदार गोरंट्याल म्हणाले, त्यांची नावे घेणे योग्य नाही. दरम्यान शिवसेनेच्या मुखपत्रात या अनुषंगाने खासदार निधी गोठण्याचा मुद्दा पुढे आणण्यात आला आहे. काँग्रेसचे आमदार उपोषण करत आहेत, लोकशाही वगैरे मान्य आहे, मात्र ज्यांनी सरकार स्थापन करण्यास परवानगी दिली त्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर अविश्वास व्यक्त केल्यासारखे होईल, असा नाराजीचा सूरही लावला आहे.नाईलाजाने उपोषणाचा मार्ग निवडलाआ. कैलास गोरंट्याल म्हणाले, माझ्या मतदारसंघात नगरपालिकेसाठी नगर विकास विभागाने निधी दिला नाही. माझ्यासोबत आणखी दहा आमदार असे आहेत, ज्यांना निधी मिळाला नाही. त्यामुळेच आम्ही नाईलाजाने उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: आपल्याला फोन केला आणि निधी देतो, पुरवणी मागण्यांत व्यवस्था करतो, असे सांगितले. आम्ही उपोषण करणार नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस