शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
5
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
6
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
7
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
8
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
9
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
10
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
11
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
12
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
13
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
14
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
15
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
16
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
17
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
18
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
19
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
20
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार

Rajiv Satav: २०१४ च्या मोदी लाटेतही फडकवला होता काँग्रेसचा झेंडा; राजीव सातव यांच्या विजयाची गोष्ट

By प्रविण मरगळे | Updated: May 16, 2021 13:26 IST

Congress MP Rajiv Satav Passed Away: राजीव सातव हे अत्यंत मनमिळाऊ आणि उमदं असं नेतृत्व होतं. सातव यांच्या साधेपणामुळे राष्ट्रीय पातळीवर पक्षाची इतकी मोठी जबाबदारी असूनही मतदारसंघात त्यांनी घट्ट पाय रोवले होते.

ठळक मुद्देमाजी मंत्री रजनी सातव यांचे पुत्र म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला. परंतु त्यानंतर राजीव सातव यांनी कधीही राजकारणात मागे वळून पाहिलं नाहीस्वकर्तृत्वावर राजीव सातव यांनी राजकारणात आपला ठसा उमटवला. २००९ मध्ये आमदार म्हणून कळमनुरी मतदारसंघात त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे त्यांच्या यशाचा आलेख चढता राहिला.

प्रविण मरगळे/विजय नपाते

मुंबई – काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे रविवारी पहाटे पुण्यातील जहाँगीर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. सातव यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी शोकप्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजीव सातव हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जायचे. राजीव सातव यांच्या जाण्यानं मी माझा मित्र गमावला अशा भावना व्यक्त करत राहुल गांधींना दु:ख अनावर झालं.

राजीव सातव हे अत्यंत मनमिळाऊ आणि उमदं असं नेतृत्व होतं. सातव यांच्या साधेपणामुळे राष्ट्रीय पातळीवर पक्षाची इतकी मोठी जबाबदारी असूनही मतदारसंघात त्यांनी घट्ट पाय रोवले होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राजीव सातव हे कळमनुरी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. माजी मंत्री रजनी सातव यांचे पुत्र म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला. परंतु त्यानंतर राजीव सातव यांनी कधीही राजकारणात मागे वळून पाहिलं नाही. स्वकर्तृत्वावर राजीव सातव यांनी राजकारणात आपला ठसा उमटवला. 

२००९ मध्ये आमदार म्हणून कळमनुरी मतदारसंघात त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे त्यांच्या यशाचा आलेख चढता राहिला. या निवडणुकीत राजीव सातव यांनी शिवसेनेच्या गजानन घुगेंचा ८ हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर राजीव सातव यांनी हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदारसंघात बांधणीला सुरूवात केली. याठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी काळात हिंगोली मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या वाट्याला येत होता. त्यामुळे राजीव सातव यांना उमेदवारी मिळेल का नाही? याबाबत विविध चर्चा रंगत होत्या. परंतु राजीव सातव यांनी या चर्चांकडे दुर्लक्ष करत मतदारसंघात लोकांच्या गाठीभेटी घेणे. संपर्क वाढवण्याचं काम सुरूच ठेवलं. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील या लोकसभेच्या खासदार होत्या. त्यानंतर शिवसेनेच्या सुभाष वानखेडेंनी त्यांचा पराभव केला होता. 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात मोदी लाट होती. या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तडजोडीत हिंगोली मतदारसंघ काँग्रेसने राष्ट्रवादीकडून मागून घेतला. तेव्हा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर पक्षातंर्गत टीकाही झाली होती. हिंगोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने राजीव सातव यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत राजीव सातव यांनी शिवसेनेच्या सुभाष वानखेडेंचा पराभव करत लोकसभेत विजय मिळवला. अवघ्या १ हजार ६३२ मतांनी राजीव सातव यांना विजय मिळाला होता. परंतु मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेसचे २ खासदार निवडून आले होते त्यात राजीव सातव यांचं नाव होतं. 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतून माघार   २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राजीव सातव यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. याचं कारण असं की, राजीव सातव हे राहुल गांधींचे विश्वासू शिलेदार होते. २०१९ च्या निवडणुकीत राजीव सातव यांच्यावर गुजरात, दीव दमण या राज्यांच्या प्रभारी पदाची जबाबदारी आली. त्याचसोबत पंजाब येथील निवडणुकीतही त्यांना लक्ष घालण्यास सांगितलं होतं. पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने राजीव सातव यांनी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. पक्षीय कामातून मतदारसंघाकडे दुर्लक्ष होऊ नये या विचाराने राजीव सातव यांनी पक्षसंघटनेला जास्त महत्त्व दिलं. गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी राजीव सातव यांनी केलेल्या कामाचं मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होमपिचवर सातव यांनी भाजपाला घाम फोडला होता. त्यामुळे राजीव सातव यांच्या अचानक जाण्याने काँग्रेससाठी खूप मोठी हानी म्हणता येईल.

टॅग्स :Rajeev Satavराजीव सातवcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाHingoliहिंगोली