शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Election 2020 : "डबल इंजिनचे नाही तर धोक्याचे सरकार, एक घोटाळेबाज अन् दुसरा धोकेबाज"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 15:43 IST

Bihar Election 2020 Randeep Singh Surjewala And Narendra Modi : रणदीप सिंह सुरजेवाला यांनी छपरा येथील प्रचार रॅलीत पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे.

पाटणा - विधानसभा निवडणुकीमुळे बिहारमधील वातावरण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री नितीश कुमार, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव झंझावाती प्रचारसभा घेत आहेत. राज्यभरात निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. याच दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी छपरा येथील प्रचार रॅलीत पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. "बिहारमध्ये डबल इंजिनचे नाही तर धोक्याचे सरकार, एक घोटाळेबाज अन् दुसरा धोकेबाज आहे" असं म्हटलं आहे.

सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. "मोदीजी, 2015 मधील निवडणुकीत नितीश कुमार यांना 18 व्या शतकातील मानसिकतेचे म्हणाले होते. आज त्यांना छपरा येथे डबल इंजिन म्हणत आहेत. मात्र सत्य हे आहे की, हे डबल धोक्याचे सरकार आहे. एक घोटाळेबाज आणि एक धोकेबाज, बिहारची जनता करणार दोघांचा उपचार!" असं सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच बोले बिहार बदलें सरकार हा हॅशटॅगही वापरला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छपरा येथील सभेत लालू-राबडी शासनकाळातील आठवण करून देत लोकांना म्हटलं की "तेव्हा बिहारमध्ये विकास होत नव्हता. कंत्राट निघाले तरी देखील अभियंता आणि ठेकेदार कामं करत नव्हते. कारण, त्यांच्याकडून अगोदर खंडणी मागितली जात होती. यामुळे कुणीच काम करत नव्हतं तसेच, आता राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे व राज्यात विकासाची चाकं धावत आहेत."  तसेच मोदींनी तेजस्वी यादव व राहुल गांधींवरही निशाणा साधला. 

"उत्तर प्रदेशमध्ये हरणाऱ्या युवराजने आता जंगलराजमधील युवराजाशी हात मिळवला"

"बिहारमध्ये एकीकडे डबल इंजिनचे सरकार आहे, तर दुसरीकडे डबल युवराज आहेत. त्यातील एक जंगलराजचे युवराज आहे. उत्तर प्रदेशमध्ये हरणाऱ्या युवराजने आता जंगलराजमधील युवराजाशी हात मिळवला आहे. त्यांना केवळ कुटुंबाची चिंता आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य गायब झालं आहे" असं देखील मोदींनी म्हटलं आहे. त्यावरून काँग्रेसने आता भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. तर दुसरीकडे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी पाटणा आणि गोपालगंजमधील निवडणूक सभांना संबोधित केलं. यावेळी राजनाथ सिंह यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

Bihar Election 2020 : "सगळं उघड केलं ना तर काँग्रेसला तोंड दाखवणंही अवघड होईल"

"सगळं उघड केलं ना तर काँग्रेसला तोंड दाखवणंही अवघड होईल" असं म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी अनेकदा भाजपावर यावरून टीका केली होती. त्यामुळे आता राजनाथ सिंह यांनी हल्लाबोल केला आहे. "काँग्रेससह काही राजकीय पक्ष देशाच्या सैन्याच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. चीनने भारताची 1200 चौरस किलोमीटर जमीन ताब्यात घेतली असं काँग्रेस म्हणत आहे. पण आपण जर सगळं उघड केलं ना तर काँग्रेसला तोंड दाखवणंही अवघड होईल" असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. तसेच "तुम्ही सुशिक्षित नागरिक आहात. 1962 ते 2013 दरम्यानचा इतिहास बघा. आपल्या सैन्यातील जवानांनी जे शौर्य दाखवले आहे त्याने अभिमानाने मान उंचावते. संरक्षणमंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो" असं देखील म्हटलं आहे. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहारElectionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी