शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Bihar Election 2020 : "डबल इंजिनचे नाही तर धोक्याचे सरकार, एक घोटाळेबाज अन् दुसरा धोकेबाज"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 15:43 IST

Bihar Election 2020 Randeep Singh Surjewala And Narendra Modi : रणदीप सिंह सुरजेवाला यांनी छपरा येथील प्रचार रॅलीत पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे.

पाटणा - विधानसभा निवडणुकीमुळे बिहारमधील वातावरण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री नितीश कुमार, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव झंझावाती प्रचारसभा घेत आहेत. राज्यभरात निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. याच दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी छपरा येथील प्रचार रॅलीत पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. "बिहारमध्ये डबल इंजिनचे नाही तर धोक्याचे सरकार, एक घोटाळेबाज अन् दुसरा धोकेबाज आहे" असं म्हटलं आहे.

सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. "मोदीजी, 2015 मधील निवडणुकीत नितीश कुमार यांना 18 व्या शतकातील मानसिकतेचे म्हणाले होते. आज त्यांना छपरा येथे डबल इंजिन म्हणत आहेत. मात्र सत्य हे आहे की, हे डबल धोक्याचे सरकार आहे. एक घोटाळेबाज आणि एक धोकेबाज, बिहारची जनता करणार दोघांचा उपचार!" असं सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच बोले बिहार बदलें सरकार हा हॅशटॅगही वापरला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छपरा येथील सभेत लालू-राबडी शासनकाळातील आठवण करून देत लोकांना म्हटलं की "तेव्हा बिहारमध्ये विकास होत नव्हता. कंत्राट निघाले तरी देखील अभियंता आणि ठेकेदार कामं करत नव्हते. कारण, त्यांच्याकडून अगोदर खंडणी मागितली जात होती. यामुळे कुणीच काम करत नव्हतं तसेच, आता राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे व राज्यात विकासाची चाकं धावत आहेत."  तसेच मोदींनी तेजस्वी यादव व राहुल गांधींवरही निशाणा साधला. 

"उत्तर प्रदेशमध्ये हरणाऱ्या युवराजने आता जंगलराजमधील युवराजाशी हात मिळवला"

"बिहारमध्ये एकीकडे डबल इंजिनचे सरकार आहे, तर दुसरीकडे डबल युवराज आहेत. त्यातील एक जंगलराजचे युवराज आहे. उत्तर प्रदेशमध्ये हरणाऱ्या युवराजने आता जंगलराजमधील युवराजाशी हात मिळवला आहे. त्यांना केवळ कुटुंबाची चिंता आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य गायब झालं आहे" असं देखील मोदींनी म्हटलं आहे. त्यावरून काँग्रेसने आता भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. तर दुसरीकडे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी पाटणा आणि गोपालगंजमधील निवडणूक सभांना संबोधित केलं. यावेळी राजनाथ सिंह यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

Bihar Election 2020 : "सगळं उघड केलं ना तर काँग्रेसला तोंड दाखवणंही अवघड होईल"

"सगळं उघड केलं ना तर काँग्रेसला तोंड दाखवणंही अवघड होईल" असं म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी अनेकदा भाजपावर यावरून टीका केली होती. त्यामुळे आता राजनाथ सिंह यांनी हल्लाबोल केला आहे. "काँग्रेससह काही राजकीय पक्ष देशाच्या सैन्याच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. चीनने भारताची 1200 चौरस किलोमीटर जमीन ताब्यात घेतली असं काँग्रेस म्हणत आहे. पण आपण जर सगळं उघड केलं ना तर काँग्रेसला तोंड दाखवणंही अवघड होईल" असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. तसेच "तुम्ही सुशिक्षित नागरिक आहात. 1962 ते 2013 दरम्यानचा इतिहास बघा. आपल्या सैन्यातील जवानांनी जे शौर्य दाखवले आहे त्याने अभिमानाने मान उंचावते. संरक्षणमंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो" असं देखील म्हटलं आहे. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहारElectionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी