शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

Parliament: “राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करा, संसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका”; राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 14:35 IST

Parliament: आताच्या घडीला केंद्रातील मोदी सरकार आणि विरोधक संसदेचे कामकाज सुरळीत सुरू राहावे, यासाठी एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देराहुल गांधींचे मोदी सरकारवर टीकास्त्रसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नकामोदी सरकार विरोधकांना काम करू देत नसल्याचा दावा

नवी दिल्ली:संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्यातही महागाई, इंधनदरवाढ, पॅगेसस हेरगिरी, केंद्रीय कृषी कायदे, शेतकरी आंदोलन प्रकरणी विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारविरोधात टीकास्त्र सोडले जात असून, गोंधळामुळे अनेकदा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले आहे. आताच्या घडीला केंद्रातील मोदी सरकार आणि विरोधक संसदेचे कामकाज सुरळीत सुरू राहावे, यासाठी एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यातच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करावी. संसदेचा आणखी वेळ फुकट घालवू नये, या शब्दांत टीका केली आहे. (congress rahul gandhi says do not waste time of parliament and discuss on national interest issue) 

मोदी सरकार देतेय १५ लाख कमावण्याची संधी; घरबसल्या करावं लागेल केवळ ‘हे’ काम

संसदेत विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. मोदी सरकारने पेगॅसस खरेदी केले की नाही आणि पेगॅसस हत्याराचा वापर आपल्याच लोकांविरुद्ध केला की नाही, या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. यानंतर पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

“मोदी सरकारने वेळीच पावले उचलली असती, तर कोरोनाचे सुमारे १ लाख मृत्यू टाळता आले असते”

संसदेचा वेळ वाया घालवू नका

खासदारांनी जनतेचा आवाज बनून राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली पाहिजे, असा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. मोदी सरकार विरोधकांना हेच काम करू देत नाही. संसदेचा आणखी वेळ वाया घालवू नका. महागाई, शेतकरी आंदोलन आणि पेगॅसस हेरगिरीवर चर्चा करावी, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. याआधी पेगॅससच्या माध्यमातून करण्यात आलेली हेरगिरी म्हणजे देशद्रोहच असल्याचे म्हणत काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला. 

राहुल गांधींची हेरगिरी कोण कशाला करेल?

राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेस मूळ मुद्द्यांपासून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधींची हेरगिरी कोण कशाला करेल? त्यांच्याकडून तर काँग्रेस पक्षही सांभाळला जात नाही, असा टोलाही पात्रा यांनी लगावला. राहुल गांधी यांनी एकदा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हातातून ज्या प्रकारे कागदपत्रे फाडली होती, तसेच काहीसे त्यांच्या सहकाऱ्यांनी संसदेत केले, असा चिमटाही संबित पात्रा यांनी काढला. 

टॅग्स :Parliamentसंसदcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकार