शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
5
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
6
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
7
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
8
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
9
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
10
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
11
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
12
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
13
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
14
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
15
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
16
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
17
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
18
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
19
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
20
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!

“भारत एवढा असुरक्षित यापूर्वी कधीच नव्हता”; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 14:37 IST

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर मोठी टीका केली आहे.

ठळक मुद्देराहुल गांधींचा पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणाराष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून केला मोठा आरोपमोदी सरकारने देशाच्या सुरक्षेचे राजकारण केल्याचा दावा

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशात दहशतवादविरोधी पथकाने दहशतवाद्यांना अटक मोठा कट उधळून लावल्यानंतर आता देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्येही काही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. यावरून आता काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली असून, भारत एवढा असुरक्षित यापूर्वी कधीच नव्हता, असा मोठा आरोप केला आहे. (congress rahul gandhi criticises pm modi govt over national security)

राम मंदिरासाठी योगदान दिलेल्या १२ कोटी कुटुंबांशी RSS संपर्क करणार; IT सेलही होणार सुरू

देशातील कोरोनाची परिस्थिती, कोरोना लसीकरण मोहीम, लसींची टंचाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई यांवरून सातत्याने केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी टीका करताना दिसत आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर मोठी टीका केली आहे.

भारत एवढा असुरक्षित यापूर्वी कधीच नव्हता

राहुल गांधी यांनी एक ट्विट केले असून, मोदी सरकारने परराष्ट्र आणइ संरक्षण धोरणाचे राजकारण करून देशाला कमकुवत करण्याचे काम केले. भारत एवढा असुरक्षित कधीच नव्हता, असा मोठा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरूनही राहुल गांधी यांनी टीका केली होती. मंत्र्यांची संख्या वाढली आहे, कोरोना लसीची नाही, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला होता.

“रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था नाना पटोलेंची झालीये”; भाजपचा खोचक टोला

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची गेल्या महिन्यात तीनवेळा भेट घेणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि वरिष्ठ नेते वेणुगोपालदेखील उपस्थित आहेत. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच आता राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे आव्हान उभे करणे आणि देशातील प्रमुख विरोधीपक्ष म्हणून काँग्रेसची मोर्चेबांधणी करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्यासोबतच्या भेटीत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.  

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा