शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

"मोदी म्हणतात सर्वांना लस मिळणार, सरकार म्हणतं म्हणालोच नाही; नक्की भूमिका काय?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 12:28 IST

Congress Rahul Gandhi And Modi Government Over Corona Vaccine : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - जगभरात कोरोनावर संशोधन सुरू असून नवनवीन माहिती समोर येत आहे. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे. केंद्र सरकारने कोरोनावरील कोणत्याही लसीला अद्याप मंजुरी दिलेली नाही. मात्र लसीकरणाची तयारी केली जात आहे. तब्बल 30 कोटी लोकांना कोरोनावरील लस देण्याची तयारी केली जात आहे. प्राथमिकतेनुसार ही लस देण्यात येणार आहे. मात्र आता आरोग्य मंत्रालयाने प्रत्येक भारतीयाला लस देण्याबद्दल सरकारकडून म्हटलं गेलेलं नाही, असं म्हटलं आहे. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

"सर्वांना कोरोना लस देणार असं मोदी म्हणाले पण सरकार म्हणतं म्हणालोच नाही; नक्की भूमिका काय?" असं म्हणत राहुल गांधींनी हल्लाबोल केला आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "पंतप्रधान म्हणतात सर्वांना लस मिळणार. बिहार निवडणुकांच्या वेळी बिहारमध्ये सर्वांना मोफत कोरोना लस दिली जाणार असल्याचं म्हटलं गेलं. आता केंद्र सरकार म्हणतं सर्वांना लस देणार असं कधी म्हटलंच नाही. पंतप्रधानांची नक्की भूमिका काय?" असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. 

सर्वप्रथम हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स, सीनियर सिटिझन्सना लसीचा डोस देण्याची तयारी केली जात आहे. लसीकरणासाठी नीती आयोगाने सुचवलेल्या प्लॅननुसार, निवडणुकीसाठी ज्याप्रमाणे पोलिंग बूथ तयार केले जातात. तसेच वॅक्सीन बूथ तयार केले जाणार आहेत. तेथे लसीचा डोस देण्यात येईल. नीती आयोगाचे सद्स्य व्ही. के. पॉल यांनी मुख्यमंत्र्यांना एक प्रेझेंटेशन दिलं. त्यामध्ये याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाच्या लसीकरणासाठी पोलिंग बूथप्रमाणेच टीम तयार कराव्या लागतील आणि ब्लॉक लेवलवर रणनीती तयार केली जाणार असल्याचं देखील पॉल यांनी म्हटलं आहे.

आशेचा किरण! 30 कोटी लोकांना कोरोना लस देण्यासाठी महातयारी; पोलिंग बूथसारखे "वॅक्सीन बूथ"

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, महाराष्ट्र, केरळ आणि राजस्थान या चार राज्यांना यासाठी तयारी करण्यास सांगितलं आहे. कारण या ठिकाणची परिस्थिती ही थोडी चिंताजनक आहे. चारही राज्यातमध्ये हाय पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्यूदर चिंतेत भर टाकणारा आहे. येथील रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तसेच कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. सुरुवातीला कोरोनाची लस ही आरोग्य कर्मचारी, कोरोना वॉरिअरना दिली जाणार आहे. यानंतर वरिष्ठ नागरिकांना दिली जाईल. या यादीत ज्यांची नावे असतील त्यांना एसएमएसद्वारे लसीकरणाची तारीख, वेळ आणि ठिकाण कळविले जाणार आहे. मेसेजमध्ये लसीकरण करणारी संस्था, आरोग्य सेवकाचे नाव असणार आहे. पहिला डोस दिल्य़ानंतर दुसरा डोस कधी मिळणार याचीही माहिती एसएमएसद्वारे दिली जाईल.

"झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार; मित्रांचं उत्पन्न झालं चौपट, शेतकऱ्यांचं मात्र अर्ध" 

गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी सरकार व शेतकरी नेत्यांची बैठक झाली. काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा एक व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी बुधवारी (2 डिसेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. "शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार असं सांगितलं गेलं. पण मित्रांचं उत्पन्न चौपट केलं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न अर्ध होणार. खोटं बोलणारं, लूटणारं आणि सूट-बूट वालं हे सरकार आहे" असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा एक व्हिडीओ देखील शेअर करत सरकारवर जोरदार निशाणा साधला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक