शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
2
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलिन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
3
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
4
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
5
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
7
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
8
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
9
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
10
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
11
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
12
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
13
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
14
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
15
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
16
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
17
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
18
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
19
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
Daily Top 2Weekly Top 5

नाना पटोलेंचा शिवसेना-राष्ट्रवादीला परखड इशारा; “काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे....”

By प्रविण मरगळे | Updated: February 25, 2021 18:24 IST

Congress Nana Patole Warns NCP ShivSena: काही महिन्यांपूर्वी मंत्री बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) आणि अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनीही याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची(CM Uddhav Thackeray) भेट घेतली होती

ठळक मुद्देएखादी गोष्ट कमी मिळत असेल तर ती बोलल्यास चूक म्हणता येणार नाहीमहाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर आहे, समान वाटप व्हावं इतकीच आमची अपेक्षाविधानसभा अध्यक्षपदाची निवड बिनविरोध नेमण्याची राज्याची परंपरा आहे

मुंबई – महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Congress Nana Patole) यांनी ठाकरे सरकारला थेट इशारा दिला आहे. काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे हे लक्षात ठेवा अशा शब्दात नाना पटोलेंनी परखड भूमिका मांडली आहे. काँग्रेस आमदारांना निधी कमी मिळत असल्याच्या तक्रारीवरून नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त केली.(Congress State President Nana Patole Warns NCP-Shivsena over Congress MLA complain of lack of funds)

काही महिन्यांपूर्वी मंत्री बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) आणि अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनीही याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची(CM Uddhav Thackeray) भेट घेतली होती, या भेटीनंतर या समस्येवर तोडगा निघेल अशी शक्यता होती, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) हे काँग्रेस आमदारांना निधी कमी देत असल्याची खंत पक्षातून व्यक्त होत आहे. यातच काँग्रेसला बेदखल करू नका असा इशाराच नाना पटोलेंनी शिवसेना(Shivsena)-राष्ट्रवादी(NCP) काँग्रेसला दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचं पुन्हा उघड झालं आहे.

याबाबत नाना पटोले म्हणाले की, एखादी गोष्ट कमी मिळत असेल तर ती बोलल्यास चूक म्हणता येणार नाही, महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर आहे, समान वाटप व्हावं इतकीच आमची अपेक्षा आहे, काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे लक्षात असू द्या असा अप्रत्यक्षपणे इशाराच त्यांनी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसला कठोर शब्दात दिला.

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसचेच

त्याचसोबत नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पद रिक्त आहे, यापदावर राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी दावा केला, परंतु विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील असं वारंवार सांगितलं जात आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवड बिनविरोध नेमण्याची राज्याची परंपरा आहे, ती सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र बसून कायम ठेवावी, या संविधानिक पदाची निवड करताना कोणताही वाद होऊ नये ही आमची भूमिका असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितले.

देशभरातील टोल बंद करावेत

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना देशात मात्र दररोज इंधनाचे दर वाढवून जनतेची लूट सुरु आहे. एकीकडे केंद्र सरकार पेट्रोल व डिझेलवर अवाजवी अबकारी कर लावून जनतेला लूटत आहे. त्यातच रस्ते विकास सेसच्या नावाखाली १८ रुपये आणि कृषी सेसच्या नावाखाली ४ रुपये असे तब्बल २२ रुपये प्रति लिटर सेस पेट्रोल, डिझेलवर आकारून दोन्ही हाताने जनतेची लूट सुरु केली आहे. त्यातच राष्ट्रीय महामार्गावरील टोलच्या माध्यमातूनही लूट सुरु आहे. केंद्रातील मोदी सरकारने एक तर रस्ते विकास सेस बंद करावा किंवा देशभरातील टोल बंद करावेत अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNana Patoleनाना पटोले