शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

“राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला?”; नाना पटोलेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 14:31 IST

राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला? राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना, असा खळबळजनक आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

ठळक मुद्देराहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला?राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना?काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

नाशिक:काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी नुकतेच जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. श्रीनगर येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांशी संवादही साधला. पण, राहुल गांधी थांबले होते, तिथपासून केवळ ५०० मीटरवर बॉम्ब हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. यावरून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शंका उपस्थित केली आहे. राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला? राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना, असा खळबळजनक आरोप नाना पटोले यांनी केला आहे. (congress nana patole alleged modi govt over rahul gandhi tour and jammu kashmir bomb blast)

स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी 'व्यर्थ न हो बलिदान' हा कार्यक्रम हुतात्मा स्मारकात घेण्यात आला. यावेळी पटोले बोलत होते. कार्यक्रमास राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. 

“BJP ला पराभूत करायचे असेल, तर काँग्रेसने सर्वांत आधी...”; सिब्बलांनी सांगितला रामबाण उपाय!

राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला

राहुल गांधी जम्मू काश्मीरमध्ये गेले आहेत. तिथे ते गेले अन् बॉम्बस्फोट झाला. ते तिथून गेले होते म्हणून बरे झाले. राहुल गांधी जिथे थांबले होते तिथून ५०० मीटर अंतरावर हा बॉम्बस्फोट झाला. जम्मू काश्मिरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू असून तेथील सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. राहुल हे देशभरातील जनतेचा आवाज बनले असून, हा हल्ला म्हणजे त्यांना संपविण्याचा कट तर नाही ना, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला.

“आरक्षणाच्या मुद्द्यावर नारायण राणे, रावसाहेब दानवे का बोलले नाहीत?”: संजय राऊत

भाजपपासून काँग्रेसच देशाला वाचवू शकते

नोटाबंदी झाल्यावर दहशतवाद संपेल असं यांनी सांगितलं होतं. पण मग दहशतवाद संपला का? नोटाबंदीचं सोडून द्या पण मग तुमच्याकडे इतकी मोठी यंत्रणा असताना दहशतवादी राहुल गांधी होते तिथपर्यंत कसे काय येऊ शकले, अशी विचारणा करत गांधी घराणे देशाचा आवाज बनले असून लोकशाहीची मूल्ये आणि संविधानाची मोडतोड करणाऱ्या भाजपपासून काँग्रेसच देशाला वाचवू शकते, असे नाना पटोले म्हणाले.

Air India चा टॉवर ठाकरे सरकार विकत घेणार? कंपनीशी खरेदीबाबत चर्चा सुरू 

दरम्यान, ब्रिटिश राजवटीत जालियनवाला बाग हत्याकांडात अनेकांचा बळी गेला. परंतु, कोरोना संकट काळात पवित्र गंगा नदीतून अनेक हिंदू बांधवांचे मृतदेह वाहून गेले. गंगा नदी मलिन करण्याचे काम सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये मश्गूल होते. देशात चाललेले मृत्यूचे तांडव बघत होते. जालियनावाला बागमध्ये जेवढे लोक मारले गेले नाहीत तेवढे बळी करोना काळात केंद्र सरकारने घेतल्याचा आरोपही पटोले यांनी केला. 

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेRahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीNashikनाशिकJammu Kashmirजम्मू-काश्मीर