शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

२०१४ पासून देशाला ग्रहण लागले; लोकशाहीच्या चारही स्तंभांचे स्वातंत्र्य धोक्यात- पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 08:50 IST

लोकशाही व्यवस्था वाचवायची वेळ आली असून त्यासाठी सर्वांनी या लढाईत सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी केले.

मुंबई : लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून देशाची प्रगती होत असताना मागील काही वर्षांत ही सर्व व्यवस्था मोडीत काढण्याचे काम सुरू आहे. २०१४ पासून देशाला ग्रहण लागले आहे. खोटी स्वप्ने दाखवून सत्तेत आलेले आज संविधान व्यवस्था बदलण्याचे काम करत आहेत. लोकशाहीच्या चारही स्तंभांचे स्वातंत्र्य आज धोक्यात आहे. लोकशाही व्यवस्था वाचवायची वेळ आली असून त्यासाठी सर्वांनी या लढाईत सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी केले.ऑगस्ट क्रांती मैदानात काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नाना पटोले बोलत होते. ते म्हणाले की, देशातील वंचित, शोषित, बहुजन समाजाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पाच हजार वर्षे संघर्ष करावा लागला. मोठ्या संघर्षानंतर स्वातंत्र्याची पहाट देशात आली. स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे; पण या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे योगदान नाही त्या विचारसणीचे लोक सध्या सत्तेत आहेत. स्वातंत्र्य व लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्याचे काम सध्या ते करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला.यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याची सुरुवात ऑगस्ट क्रांती मैदानातून झाली होती.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले; परंतु आज ती व्यवस्था मोडीत काढण्याचे काम केले जात आहे. तर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी झोकून देऊन लढा दिला. त्यांच्या निर्धारानेच आपल्याला आजचा हा दिवस पाहायला मिळत आहे.  मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, याच मैदानातून १९४२ साली जुलमी इंग्रज राजवटीला ‘चले जाव’चा नारा दिला गेला. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांत आज पुन्हा एकदा अन्यायाविरोधात आवाज बुलंद करण्याची वेळ आली आहे. आज देशातील मोदी सरकारचा अन्याय व अत्याचार पाहता ‘भाजप चले जाव’चा नारा देण्याची वेळ आली आहे.ऑगस्ट क्रांती मैदानात काँग्रेसच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. तसेच संविधान व देश वाचवण्यासाठी शपथ देण्यात आली. यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेस नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस