शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

Satish Sharma: सतीश शर्मा: पायलट ते खासदार; संकटसमयी गांधी घराण्याचे 'गड' राखणारे शिलेदार!

By प्रविण मरगळे | Published: February 18, 2021 11:23 AM

Veteran Congress leader Captain Satish Sharma dead: १९८० च्या दशकात कॅप्टन सतीश शर्मा यांना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी राजकारणात आणलं होतं

ठळक मुद्दे१९८४ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली, त्यानंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान बनलेराजीव गांधी यांनी आपला लोकसभा मतदारसंघ अमेठी सांभाळण्याची जबाबदारी विश्वासू मित्र कॅप्टन सतीश शर्माकडे दिली१९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली त्यानंतर अमेठीत त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी काँग्रेसने कॅप्टन सतीश शर्मा यांना मैदानात उतरवलं

नवी दिल्ली – काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कॅप्टन सतीश शर्मा(Congress Caption Satish Sharma) यांचं बुधवारी संध्याकाळी गोवा येथे निधन झालं, ७३ वर्षीय कॅप्टन शर्मा मागील काही काळापासून कॅन्सरने ग्रस्त होते, माजी पंतप्रधान राजीव गांधी(Rajiv Gandhi) यांचा सच्चा शिलेदार बनून अमेठी ते रायबरेलीपर्यंत गांधी कुटुंबासाठी नेहमी तत्पर असणारे सतीश शर्मा ३ वेळा लोकसभेत आणि ३ वेळा राज्यसभेचे सदस्य होते.

१९८० च्या दशकात कॅप्टन सतीश शर्मा यांना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी राजकारणात आणलं होतं, तेव्हा ते इंडियन एअरलाईन्समध्ये पायलट होते, त्याचवेळी राजीव गांधी हेदेखील पायलट होते, विमान उड्डाणाच्यावेळी कॅप्टन सतीश शर्मा आणि राजीव गांधी यांच्यात घट्ट मैत्री झाली. भाऊ संजय गांधी यांच्या निधनानंतर राजीव गांधी यांनी राजकारणात खऱ्या अर्थाने पाय रोवला. पण कॅप्टन शर्मा हे पायलट म्हणून नोकरी करत होते.

१९८४ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली, त्यानंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान बनले, अशातच राजीव गांधी यांनी आपला लोकसभा मतदारसंघ अमेठी सांभाळण्याची जबाबदारी विश्वासू मित्र कॅप्टन सतीश शर्माकडे दिली, तेव्हा कॅप्टन सतीश शर्मा यांनी नोकरीचा राजीनामा देत राजीव गांधी यांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या कोअर टीममध्ये प्रमुख सदस्य बनले.

राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या मतदारसंघाची जबाबदारी कॅप्टन सतीश शर्मा यांच्यावर होती, अमेठीमधील विकास कामांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कॅप्टन सतीश शर्मा यांची महत्त्वाची भूमिका ठरली, ८० च्या दशकाअखेर अनेक सहकारी राजीव गांधी यांची साथ सोडून जनता दलात सहभागी झाले, वीपी सिंहपासून अरूण नेहरू पर्यंत अनेकांनी राजीव गांधींविरोधात मोर्चा उघडला. परंतु कॅप्टन सतीश शर्मा यांनी शेवटपर्यंत राजीव गांधी यांची साथ सोडली नाही.

१९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली त्यानंतर अमेठीत त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी काँग्रेसने कॅप्टन सतीश शर्मा यांना मैदानात उतरवलं, १९९१ मध्ये राजीव गांधी यांनी अमेठीतून निवडणूक जिंकली होती, परंतु निकाल येण्यापूर्वीच त्यांची हत्या झाली. त्यामुळे १९९१ मध्ये पुन्हा घेतलेल्या पोटनिवडणुकीत कॅप्टन शर्मा विक्रमी मताधिक्याने निवडून आले. तत्पूर्वी कॅप्टन शर्मा हे मध्यप्रदेशातून राज्यसभेचे खासदार म्हणून काम करत होते. ११ ऑक्टोबर १९४७ मध्ये सतीश शर्मा यांचा जन्म तेलंगणाच्या सिकंदराबाद येथे झाला होता. देहराडून येथून त्यांनी कर्नल ब्राऊन कँब्रिज स्कूलमध्ये शिक्षण घेतले. शर्मा रायबरेली आणि अमेठीमधून ३ वेळा लोकसभेत निवडून गेले होते, तर मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश येथून ३ वेळा राज्यसभेचे खासदार बनले होते.

पीवी नरसिम्हराव सरकारमध्ये सतीश शर्मा हे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री होते, मात्र १९९८ मध्ये झालेल्या निवडणुकीत डॉ. संजय सिंह यांनी सतीश शर्मा यांचा पराभव केला. त्यानंतर सोनिया गांधी(Sonia Gandhi) सक्रीय राजकारणात आल्यानंतर कॅप्टन शर्मा यांना १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीची लोकसभेची जागा सोडावी लागली. रायबरेली येथून त्यांना उमेदवारी मिळाली, काँग्रेसच्या सतीश शर्मांविरोधात भाजपाने अरूण नेहरू यांना मैदानात उतरवले, अरूण नेहरू हे राजीव गांधी यांचे नात्याने भाऊ लागत होते, परंतु दोन्ही जागेवर काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला.

राहुल गांधी(Rahul Gandhi) जेव्हा पहिल्यांदा अमेठीतून निवडणूक लढवत होते, तेव्हा त्यांच्या प्रचाराची धुरा कॅप्टन सतीश शर्मा सांभाळत होते, राहुल गांधी भाषण करताना सतीश शर्मा पाठीमागून त्यांना मार्गदर्शन करत होते, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासाठी राजकीय मैदान तयार करण्याचं काम अमेठी आणि रायबरेली इथं सतीश शर्मा यांनी केले.

 

टॅग्स :congressकाँग्रेसRajiv Gandhiराजीव गांधीSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी