शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

काँग्रेसच्या कोपरकरांचा अर्ज मागे; विधान परिषदेसाठीच्या दोन जागांसाठी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 12:25 IST

विधान परिषदेच्या दोन जागांसाठी १० डिसेंबरला मतदानाचा कार्यक्रम जाहीर झाला. मुंबई महापालिकेतील नगरसेवक या निवडणुकीत मतदार असतात. पालिकेच्या सध्याच्या संख्याबळानुसार शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांचा विजय सहज  असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे मानले जात होते.

मुंबई  : विधान परिषदेसाठी मुंबई महापालिका मतदारसंघासाठीच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणारे काँग्रेस पदाधिकारी सुरेश कोपरकर यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे दोन जागांसाठीच्या या निवडणुकीत शिवसेनेचे सुनील शिंदे आणि भाजपचे राजहंस सिंह यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.विधान परिषदेच्या दोन जागांसाठी १० डिसेंबरला मतदानाचा कार्यक्रम जाहीर झाला. मुंबई महापालिकेतील नगरसेवक या निवडणुकीत मतदार असतात. पालिकेच्या सध्याच्या संख्याबळानुसार शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांचा विजय सहज  असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे मानले जात होते. मात्र, ऐनवेळी काँग्रेसचे कोपरकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. काँग्रेसने त्यांना अधिकृत उमेदवार घोषित केले नव्हते. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान होऊन फोडाफोडीचा खेळ रंगण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, संख्याबळ नसताना काँग्रेस पदाधिकाऱ्याकडून उमेदवारी आल्याने महाविकास आघाडीतील इतर पक्ष विशेषत: शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. 

- मुंबई काँग्रेसमधील अनेक नेत्यांनीही कोपरकर यांच्या उमेदवारीला विरोध केला. या पार्श्वभूमीवर कोपरकर यांनी काँग्रेस नेत्यांच्या भेटीही घेतल्या होत्या. अखेर काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची विशेष बैठक झाली. यात कोपरकरांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय झाला. - त्यानुसार गुरुवारी सायंकाळी कोपरकर यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे सिंह आणि शिवसेनेचे शिंदे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना