शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अन्यायाच्या जाणिवेतून काँग्रेसने न्याय योजना आणली; मोदींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 03:42 IST

१९८४ मध्ये झालेल्या शिख विरोधी दंगली, दलितांच्या विरोधीतील हिंसाचार, भोपाळ गॅस पीडितांच्याबाबत न्याय कोण करणार, असा प्रश्न विचारला आहे.

थेनी (तामिळनाडू) : अन्याय केल्याची जाणीव झाल्यानेच काँग्रेसने न्याय योजना जाहीर केल्याची टीका करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या काळात १९८४ मध्ये झालेल्या शिख विरोधी दंगली, दलितांच्या विरोधीतील हिंसाचार, भोपाळ गॅस पीडितांच्याबाबत न्याय कोण करणार, असा प्रश्न विचारला आहे.तामिळनाडूतील थेनी आणि रामानंथपूरम येथे झालेल्या निवडणुक रॅलीत मोदी यांनी मार्गदर्शन केले. काँग्रेस आणि बेईमानी यांची खास दोस्ती आहे, परंतु कधी-कधी चुकीने का होईना, ते वास्तव सांगून जातात. अब न्याय होगा या निवडणुकीच्या प्रचारासाठी सुरू असलेल्या मोहिमेतच त्यांनी हे मान्य केले आहे की, गेली ६0 वर्षे त्यांनी अन्यायच केला आहे. शिख विरोधी, दलित विरोधी हिंसाचाराबाबत कोण न्याय करणार, असा प्रश्न मोदी यांनी विचारला. तामिळनाडूला समृद्ध बनविण्यासाठी द्रमुक आणि काँग्रेसचे खेळ बंद करून टाका, भ्रष्ट परिवारातील घराणेशाहीचे शासन संपवून टाका, असे आवाहन करून मोदी यांनी श्रीलंकन तमिळ बंधूंच्या समृद्धीसाठी काम करणे सुरू ठेवू, असे सांगितले. या सभेत मुख्यमंत्री के. पालनीस्वामी यांनीही काँग्रेस आणि द्रमुक पक्षांच्या आघाडीवर टीका केली. काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांच्या राज्यातील आघाडीवरून शेजारच्या केरळ राज्यात एकमेकांविरोधात हे पक्ष काय भूमिका घेणार, असा प्रश्न त्यांनी केला.

वडील अर्थमंत्री होते, तेव्हाच मुलानेही देश लुटला अशी टीका नाव न घेता करत, मोदी यांनी द्रमुक, काँग्रेस आणि महाभेसळीत समाविष्ट असलेल्या पक्षांना जगाच्या नकाशावर भारताची झालेली प्रगती सहन होत नाही. जे एकमेकांचे शत्रू होते, त्यांनीच आता हातमिळविणी केली आहे. द्रमुकच्या प्रमुखांनी काही दिवसापूर्वी काँग्रेस अध्यक्षांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊ केला होता, परंतु आता एक झालेल्या विरोधकांना ते मान्य नव्हते, कारण ते प्रत्येक जण स्पर्धेत होते. या पक्षाने दक्षिणेतील सहकारी पक्षांचा अपमान केला होता, त्यांना द्रमुक पक्ष नको होता, असा आरोपही मोदी यांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीTamil Nadu Lok Sabha Election 2019तमिळनाडू लोकसभा निवडणूक 2019