शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस हायकमांडकडून जी-२३ ला वेसण घालण्याची तयारी, गुलाम नबी आझादांबाबत घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 15:04 IST

Ghulam Nabi Azad : काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांच्या गटाने पक्षातील धोरणांवर टीका करत थेट पक्षनेतृत्वालाच आव्हान दिल्याने गेल्या काही काळात काँग्रेसची चांगलीच गोची झालेली आहे.

ठळक मुद्देगुलाम नबी आझाद हे काँग्रेसच्या जी-२३ नेत्यांच्या गटामधील प्रमुख नेते गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवर होत असलेले काँग्रेसचे पतन रोखण्यासाठी काँग्रेसकडून संघटनात्मक सुधारणांची मागणी या गटाकडून करण्यात आली आहेया गटातील नेत्यांनी गांधी कुटुंबीयांचे नाव न घेता पक्षनेतृत्वाच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी केली आहे

नवी दिल्ली - काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांच्या गटाने पक्षातील धोरणांवर टीका करत थेट पक्षनेतृत्वालाच आव्हान दिल्याने गेल्या काही काळात काँग्रेसची चांगलीच गोची झालेली आहे. दरम्यान, जी-२३ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या ज्येष्ठ नेत्यांच्या गटाला वेसण घालण्याची तयारी काँग्रेस नेतृत्वाने केली आहे. त्याचाच भाग म्हणून काँग्रेस नेतृत्वाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी गुलाम नबी आझाद यांचा समावेश आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीत केलेला नाही.  मात्र जी-२३ च्या गटात असलेल्या नेत्यांपैकी मनीष तिवारी आणि भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या पुत्राला स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. त्या माध्यमातून या नेत्यांच्या गटामध्ये फूट पाडण्याची तयारी काँग्रेस नेतृत्वाने केली आहे.  (Congress high command prepares to encircle G-23, takes big decision regarding Ghulam Nabi Azad)

गुलाम नबी आझाद हे काँग्रेसच्या जी-२३ नेत्यांच्या गटामधील प्रमुख नेते आहेत. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवर होत असलेले काँग्रेसचे पतन रोखण्यासाठी काँग्रेसकडून संघटनात्मक सुधारणांची मागणी या गटाकडून करण्यात आली आहे. तसेच या गटातील नेत्यांनी गांधी कुटुंबीयांचे नाव न घेता पक्षनेतृत्वाच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.  काही दिवसांपूर्वी २८ फेब्रुवारी रोजी गुलाम नबी आझाद यांच्यासोबत भूपेंद्र हुड्डा, मनीष तिवारी, राज बब्बर, कपिल सिब्बल यांच्यासह काही नेत्यांनी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात गांधी कुटुंबीयांचे नाव न घेता पक्ष नेतृत्वाला आव्हान दिले होते. त्यानंतर गुलाम नबी आझाद आणि त्यांच्या निकटवर्तीयांचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसला एकजूट ठेवण्यासाठी काँग्रेसच्या जम्मू काश्मीरच्या प्रभारी रजनी पाटली ह्या जम्मू काश्मीरच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आल्या आहेत.  त्यांच्याकडून जम्मू काश्मीरमधील गुलाम नबी आझाद यांचा प्रभाव कमी करण्यासाठी स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी आणि बैठका सुरू आहेत.  

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliticsराजकारण