शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

"हनुमानाचा राजकीय वध होत असताना राम शांत बसणार नाहीत असा विश्वास"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 20:55 IST

Chirag Paswan And Narendra Modi : चिराग पासवान यांनी स्वत:ला हनुमान म्हणतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रामाची उपमा दिली आहे.

नवी दिल्ली - लोक जनशक्ती पक्षात (एलजीपी) काका पशुपती पारस आणि पुतण्या चिराग पासवान यांच्यातील वादानंतर पक्षात आता घमासान सुरू झालं आहे. पशुपती पारस यांनी मंगळवारी चिराग पासवान यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं तर दुसरीकडे चिराग पासवान यांनी पक्षाच्या पाचही खासदारांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. बिहारमधीलराजकारणाला आता वेगळच वळण मिळताना दिसत आहे. कारण चिराग पासवान यांनीही आता आक्रमक भूमिका घेत राजकीय खेळी खेळली आहे. याच दरम्यान चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी स्वत:ला हनुमान म्हणतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना रामाची उपमा दिली आहे.

"हनुमानाचा राजकीय वध होत असताना राम शांत बसणार नाहीत असा विश्वास मला वाटतोय" असं चिराग पासवान यांनी म्हटलं आहे. "मी आजपर्यंत हनुमानाप्रमाणे पंतप्रधानांना प्रत्येक अडचणीच्या काळात साथ दिली. आज जेव्हा हनुमानाचा राजकीय वध करण्याचा प्रयत्न होत असताना मला विश्वास आहे की अशा परिस्थितीत राम शांत बसणार नाहीत. मी प्रत्येक मुद्द्यावर भाजपाच्या सोबत उभा राहिलो. मग तो सीएए, एनआरसीचा मुद्दा का असेना. पण नितिश कुमार यांनी त्याला विरोध केला. आता भाजपाला निर्णय घ्यायचाय की त्यांनी मला पाठिंबा द्यायचा की नितिश कुमार यांना" असं देखील पासवान यांनी म्हटलं आहे. 

"माझे वडील आणि लालू प्रसाद यादव हे नेहमीच चांगले मित्र राहिले आहेत. राजदचे नेते तेजस्वी यादव आणि मी एकमेकांना लहानपणापासून ओळखतो. आमची घट्ट मैत्री होती. ते माझे लहान बंधू आहेत. जेव्हा निवडणुका येतील, तेव्हा आघाडीसंदर्भात पक्ष अंतिम निर्णय घेईल" असंही चिराग पासवान यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. चिराग पासवान यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवणं काही सोपं काम नसल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली आहे. शांत असलेल्या चिराग पासवान यांनी आता डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. 

"पक्षाच्या संविधानानुसार पक्षाचा अध्यक्ष स्वेच्छेनं किंवा त्यांचं निधन झाल्यानंतरच बदलता येऊ शकतं", असं पक्षाचे प्रवक्ते अशरफ अन्सारी यांनी सांगितलं. त्यामुळे चिराग पासवान हेच पक्षाचे अध्यक्षपदी अजूनही कायम आहेत असा दावा करण्यात आला आहे. चिराग पासवान यांच्याविरोधात बंडखोरी केलेल्या पाच खासदारांबाबत निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेतलं आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण चिराग पासवान यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या अधिकारांचा वापर करुन तांत्रिकदृष्ट्या बंडखोरी केलेल्या खासदारांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे पाचही खासदार निवडणूक आयोगाकडे गेले तरी चिराग पासवान यांच्याकडे पक्षाच्या बहुमतानं खासदारांना पक्षातून काढण्यात आल्याचं तगडं कारण हाताशी आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणIndiaभारतTejashwi Yadavतेजस्वी यादव