शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

छत्तीसगड: भाजप आणि काँग्रेसचेही नवे चेहरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 03:39 IST

काँग्रेस हायकमांडने राज्याला दिले सर्वाधिकार

- हरीश गुप्तानवी दिल्ली : छत्तीसगडची जनता ११ खासदार निवडून देते. अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकांत दारुण पराभवानंतर भाजपने विद्यमान १० खासदारांचे तिकीट कापले आहे. भाजपला सर्व जागा टिकवायच्या आहेत, तर विधानसभा विजयाने काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.काँग्रेसनेही ११ नवे चेहरे दिले आहेत. त्यामुळे नव्या रूपातील भाजप व काँग्रेसची लढाई पाहायला मिळेल. भाजपने रमणसिंग यांच्या खासदारपुत्राला संधी दिलेली नाही. रमेश बैस यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे. काँग्रेसही मोठ्या तयारीत आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि काँग्रेसचे सरचिटणीस पी. एल. पुनीया यांनी पक्षाचा तोंडावळा बदलून टाकला आहे. लोकसभेला सामोरे जाताना भाजपपुढे खूप आव्हाने आहेत. अजित जोगी यांच्या पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसचा प्रचार करीत आहेत. नव्या दमाच्या काँग्रेसचा सामना करीत असताना भाजपला नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.काँग्रेसच्या बघेल सरकारने शेतकऱ्यांकडून ८० लाख टन तांदळाची खरेदी केली आहे. या तांदळाचे काय करायचे, हे सरकारला ठरवता आले नाही. परंतु यामुळे काँग्रेसला विजय मिळाला होता. बसपचे ११ उमेदवार आहेत. परंतु बसपचे मतदान २ ते ३ टक्केच आहे. राज्यातील नक्षलवाद्यांनी आदिवासींना खुलेपणाने मतदान करण्याची मोकळीक दिली आहे, हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. यामुळेच बस्तरसारख्या परिसरात सर्वाधिक ६६ टक्के मतदान झाले होते.खरेतर छत्तीसगड हे असे एकमेव राज्य आहे जिथे पक्षश्रेष्ठींनी उमेदवारांची निवड आणि प्रचाराची रणनीती ठरवण्याचे अधिकार पूर्णपणे राज्यातील नेत्यांना दिले आहेत. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे हा बदल झालेला दिसतो. या निवडणुकीत पक्षाने एकूण ४३ टक्के मते मिळविली होती. जवळपास दोन दशकांनी पक्षाला राज्यात असे यश संपादन करता आले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकChhattisgarh Lok Sabha Election 2019छत्तीसगढ लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसBJPभाजपा