शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
5
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
6
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
7
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
8
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
9
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
10
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
11
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
12
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
13
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
14
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
15
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
16
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
17
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
18
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
19
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
20
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

"छत्रपती संभाजी महाराजांचं नाव मोठं, विरोध करण्याचं कारण नाही,’’ पक्षाचा विरोध असताना काँग्रेसच्या या मंत्र्याने मांडलं वेगळं मत

By बाळकृष्ण परब | Published: January 07, 2021 5:30 PM

Vijay Vadettiwar : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतराविरोधात पुन्हा एकदा स्पष्ट मत मांडलं असताना राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वेगळी भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देछत्रपती संभाजी महाराजांचं नाव मोठं आहे. त्याला विरोध करण्याचं कारण नाहीमात्र सामाजिक सलोखा बिघडता कामा नयेऔरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून सध्या महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे खडाखडी

मुंबई - औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून सध्या महाविकास आघाडीमध्ये खडाखडी सुरू आहे. एकीकडे शिवसेनेने नामांतरावरून आग्रही भूमिका घेतली असताना काँग्रेसने मात्र सुरुवातीपासून नामांतराला विरोध केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतराविरोधात पुन्हा एकदा स्पष्ट मत मांडलं असताना राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव मोठं आहे. त्याला विरोध करण्याचं कारण नाही, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याबाबत आपली भूमिका मांडताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव मोठं आहे. त्याला विरोध करण्याचं कारण नाही. मात्र सामाजिक सलोखा बिघडता कामा नये, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतराबाबत आज पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली होती. महाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहोत, पण नामांतराला आमचा विरोध राहील, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितलं. महाविकास आघाडीमध्ये किमान समान कार्यक्रम ठरलेला आहे, त्यामुळे जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहील. पण, अद्याप तसा कुठलाही प्रस्ताव समोर नसल्याचंही थोरात यांनी स्पष्ट केलंय. राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची अवहेलना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही त्याचा आधारावर निर्माण झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहील, असे बाळासाहेब थोरात यांनी ठामपणे सांगितलं होतं. शिवसेना नेत्यांकडून औरंगाबादचा उल्लेख नेहमीच संभाजीनगर असाच केला जातो. विशेष म्हणजे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक बातमी शेअर करताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला होता. तर, उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनीही आपल्या पत्रावर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केला होता. त्यामुळे, सरकारकडून औरंगाबादचे नामकरण करुन संभाजीनगर हे नवीन नाव ठेवण्याच्या हालचाली होत असल्याचं चर्चा होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारPoliticsराजकारण