शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

“१४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा काय?”; भाजपची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 17:31 IST

भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले असून, १४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा काय, असा थेट सवाल विचारला आहे.

बुलढाणा: महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि भाजप यांमध्ये अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. अलीकडेच एका सर्व्हेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशातील टॉप-५ मध्ये असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले होते. यावरूनही भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले असून, १४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा काय, असा थेट सवाल विचारला आहे. (chandrashekhar bawankule question how can a cm who has not been in the ministry for 14 months be excellent)

Vi चे आता BSNL मध्ये विलिनीकरण होणार? मोदी सरकारने स्पष्ट केली भूमिका

माजी मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. कोरोना काळात मुख्यमंत्री १४ महिने मंत्रालयात आले नाहीत. मात्र, तरीही त्यांना उत्कृष्ट मुख्यमंत्री कसे म्हणता, अशी विचारणा केली आहे. उद्धव ठाकरेंना उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणाणारा सर्व्हे कुणी केला माहिती नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक विकासाची कामे केली, असेही बावनकुळे म्हणाले.

“महाराष्ट्रात कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही”; केंद्रीय मंत्र्यांचा दावा

राज्यातील जनतेला विचारा, उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण 

राज्यातील १२ कोटी जनतेला विचारा, उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण ते, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आपल्या जनआशिर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. आता तुम्ही मातोश्रीला घरी बसलेले आहेत, कायम घरीच बसा, असा टोला राणे यांनी लगावला.

“आता सामनाचे नाव बदलावे आणि पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करावे”; भाजपची टीका

दरम्यान, मागील महिन्यात प्रश्नम या संस्थेने आपल्या त्रैमासिक अहवाल जाहीर केला होता. त्यात देशातील १३ राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले. प्रश्नमकडून देशातील १३ राज्ये निवडण्यात आली होती. त्यात बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश होता. या सर्वेक्षणात सर्वाधिक पसंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाल्याचे पाहायला मिळाले. ४९ टक्के मतदारांनी उद्धव ठाकरे यांची कामगिरी चांगली असल्याचे मत नोंदवले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना