शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

"विमानतळ, रेल्वे विकून बैलगाडी खरेदी करायचा प्लॅन आहे का?"; राष्ट्रवादीचा नरेंद्र मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 09:08 IST

भाजपा अशा लोकांना प्रोत्साहन देत आहे आणि जनतेच्या पैशातून त्यांना सुरक्षा देत आहेत असं सांगत राष्ट्रवादीचे माजी खासदार माजिद मेमन यांनी कंगना राणौत आणि भाजपाला फटकारलं आहे.

ठळक मुद्देभाजपा अशा लोकांना प्रोत्साहन देत आहे आणि जनतेच्या पैशातून त्यांना सुरक्षा देत आहेतकंगनाने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत केलेल्या तुलनेचा माजिद मेमन यांनी समाचार घेतलासुशांत राजपूत, रिया आणि कंगना या सगळ्यातून बाहेर पडा, आसपास आणखी गंभीर समस्या आहेत

मुंबई – अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरण आणि सरकारी संस्थांचे खासगीकरण यावरुन राष्ट्रवादीचे माजी खासदार माजिद मेमन यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. आपल्या आजूबाजूला अनेक गंभीर समस्या आहेत, त्याकडे लक्ष द्या, सुशांत सिंग राजपूत, रिया चक्रवर्ती आणि कंगना राणौत या वादातून बाहेर पडा असं त्यांनी म्हटलं आहे.

याबाबत माजिद मेमन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, एअरपोर्ट, रेल्वे यांचे खासगीकरण केले जात आहे. केंद्र सरकार बैलगाडी खरेदी करण्याचा प्लॅन करत आहे का? जे लोक सध्या सत्तेत आहेत त्यांना देशाला पुन्हा मागे घेऊन जायचं आहे. पैशाच्या बळावर त्यांना सुट्ट्या एन्जॉय करायच्या आहेत. सुशांत राजपूत, रिया आणि कंगना या सगळ्यातून बाहेर पडा, आसपास आणखी गंभीर समस्या आहेत त्याकडे लक्ष द्या अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारला फटकारलं आहे.

तसेच कंगनाने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत केलेल्या तुलनेचा माजिद मेमन यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, ज्या कोणाला मुंबई, महाराष्ट्र POK सारखा वाटत असेल, तसेच तालिबान राज्य चाललं आहे असं वाटतंय त्यांनी स्वत:हून अशा धोकादायक ठिकाणाहून लांब गेले पाहिजे. भाजपा अशा लोकांना प्रोत्साहन देत आहे आणि जनतेच्या पैशातून त्यांना सुरक्षा देत आहेत असं सांगत राष्ट्रवादीचे माजी खासदार माजिद मेमन यांनी कंगना राणौत आणि भाजपाला फटकारलं आहे.

कंगनाला Y दर्जाची सुरक्षा

मुंबई पोलिसांसंदर्भातील वक्तव्य आणि त्यावरून सुरू झालेल्या वादानंतर आता, केंद्र सरकारने कंगनाच्या संरक्षणात वाढ केली आहे. आता कंगनाला Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगना रणौतने मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त केला होता. यानंतर तिला मुंबईत येण्यासंदर्भात धमक्या दिल्या गेल्या होत्या. यासंर्व पार्श्वभूमीवर कंगनाच्या वडिलांनी हिमाचल पोलिसांकडे कंगनाच्या सुरक्षिततेसंदर्भात मागणी केली होती. कंगना ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. हिंमत असेल तर मला अडवून दाखवा, असे थेट आव्हान तिने शिवसेनेला दिले आहे.

कंगना-शिवसेना वादाची सुरुवात कशी झाली?

कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. याबाबत कंगनानं ट्विट करुन म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी मला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे नारे लावले जात होते आणि आता उघडपणे धमकी मिळत आहे. मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं तिने म्हटलं होतं.

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने अनेक कलाकारांपासून नेटिझन्सने कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. यादरम्यान कंगनानं शुक्रवारी ट्विट केले, त्यात लिहिलं की, मी बघत आहे, अनेक लोक मला मुंबईत येण्यापासून धमकी देत आहेत. त्यामुळे मी आता ९ सप्टेंबरला मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्या वेळी येणार हे मी पोस्ट करेन, कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असं तिने थेट आव्हान दिले होते. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी कंगना राणौतच्या पोस्टर्सला जोडेमारो आंदोलन केले होते

टॅग्स :Majid Memonमाजिद मेमनNCPराष्ट्रवादी काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारKangana Ranautकंगना राणौत