शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

'जवानांच्या शौर्यावर संशय घेणाऱ्या वाचाळवीराला आता घरी बसवा'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 5:51 AM

जनतेने आपला रोष त्याला मतदानातून दाखवून द्यावा आणि त्याला घरी बसवावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबई : देशातील जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केले, ते सर्व जगाने पाहिले. मात्र, काँग्रेसच्या एका वाचाळवीराने जवानांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. तो वाचाळवीर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतोय. जनतेने आपला रोष त्याला मतदानातून दाखवून द्यावा आणि त्याला घरी बसवावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी अंधेरी (पूर्व) सुभाषनगर येथे आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते. युती सरकारने गेल्या साडेचार वर्षांत केलेल्या विकासकामांचा आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईचा गतिमान विकास होतो आहे. मुंबईत एक लाख कोटी रुपये खर्च करून २०० किमीचे मेट्रोचे जाळे उभे राहात आहे. रेल्वेच्या विकासासाठी केंद्र सरकारने साठ हजार कोटी निधी दिला आहे. ५०० फूट घरांना मालमत्ता करात सूट, २०११ पर्यंतच्या पात्र झोपड्यांना ३०० फुटांचे मोफत घर, कोस्टल रोडची निर्मिती याचा मोठा फायदा मुंबईतील नागरिकांना होणार आहे.काँग्रेसचा अर्धा वेळ मोदींवर टीका करण्यातनिवडणुका जवळ आल्या की, काँग्रेस ‘गरिबी हटाव’चा नारा देते, पण सामान्य माणसांची गरिबी त्यांनी हटविली नाही. राहुल गांधी म्हणतात, ७२ हजार रुपये देणार. त्यांना विचारले कसे देणार? तर त्यांचे उत्तर त्यांच्याकडे नाही. काँग्रेसची भाषणे आणि आश्वासने पोकळ आहेत. त्यांचा अर्धा वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात जातो, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या प्रचारार्थ दहिसरमधील अशोकवन येथे मुख्यमंत्री बोलत होते.‘आमच्या काळात मुंबईकर सुरक्षित’२००८ साली आघाडी सरकारच्या काळात मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाने मुंबई हादरली होती. मात्र, आमच्या गेल्या साडेचार वर्षांच्या काळात मुंबईकर सुरक्षित राहून मुंबईत एकही बॉम्बस्फोट झाला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmumbai-north-west-pcमुंबई उत्तर पश्चिम