शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

शेतकरी आंदोलन भाजपाला भोवणार; हरियाणातील खट्टर सरकार संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 08:53 IST

Farmers Protest, Haryana Government: उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांची जेजेपी सत्तास्थापनेसाठी दिलेला टेकू काढून घेण्याच्या विचारात आहेत. यासाठी ८ डिसेंबरला आमदारांची मोठी बैठक झाली असून यामध्ये शेतकरी आंदोलनाच्या त्यांच्या मतदारसंघात बसणारा फटका यावर चर्चा करण्यात आली. 

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन आता उग्र होऊ लागले असून याचा परिणाम आजुबाजुच्या राज्यांमधील राजकारणावरही जाणवू लागला आहे. हरियाणामध्ये बहुमतापासून दूर असलेल्या भाजपाचे मनोहरलाल खट्टर सरकार संकटात आले आहे. उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांची जेजेपी सत्तास्थापनेसाठी दिलेला टेकू काढून घेण्याच्या विचारात आहेत. यासाठी ८ डिसेंबरला आमदारांची मोठी बैठक झाली असून यामध्ये शेतकरी आंदोलनाच्या त्यांच्या मतदारसंघात बसणारा फटका यावर चर्चा करण्यात आली. 

जननायक जनता पार्टी (JJP) मध्ये खट्टर सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 'द इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार चौटाला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आमदारांच्या बैठकीत सरकारचे समर्थन काढून घेण्याची जोरदार मागणी करण्यात आली. या बैठकीत आमदारांच्या मतदारसंघात शेतकरी आंदोलनाचा होणारा परिणाम, राज्यातील लोकांचे मत आदी बाबींचा विचार करण्यात आला.

ही बैछक एका विमानतळावर झाली आहे. मात्र, शहराचा खुलासा झालेला नाही. जेजेपीचे आमदार देवेंदर बबली यानी सांगितले की, सरकारने एवढेही ताणू नये की ही वेळ यावी. आम्ही शेतकऱ्याच्या हिताला आधीपासूनच प्राधान्य देत आहोत. शेतकऱ्यांनी, हरियाणाच्या मतदारांनी आम्हाला इथे पाठविले आहे. आज सहकारी पक्ष म्हणून सरकारमध्ये काम करत आहोत. उद्या जर कोणाचे शोषण झाले तर डोळे बंद करू शकत नाही, असा इशारा दिला आहे. 

शेतकऱी आंदोलनावर लवकरच तोडगा काढावाबबली यांनी सांगितले की, ही बैठक शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेली परिस्थीतीवर होती. आमचा पक्ष हा शेतकरी आणि मजूरांचा आहे. आमचा मतदारही हाच आहे. यामुळे आमच्यावर दबाव असून शेतकरी आंदोलनावर लवकरच तोडगा काढायला हवा. 

जेजेपीचे आमदार किती?हरियाणामध्ये जेजेपीचे १० आमदार आहेत. हरियाणात २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. ९० जागा असलेल्या या विधानसभेत भाजपाला बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. यामुळे जेजेपीने हात पुढे करत पाठिंबा दिला होता. जेजेपीच्या पाठिंब्याने भाजपाचे मनोहरलाल खट्टर पुन्हा मुख्यमंत्री झाले होते. शेतकरी आंदोलनावरून पहिली ठिणगी पंजाबमध्ये पडली होती. शिरोमणि अकाली दलाने सप्टेंबरमध्येच केंद्रातील मंत्रीपद सोडत काडीमोड घेतला होता.  

टॅग्स :Haryanaहरयाणाharyana election 2019हरियाणा निवडणूकBJPभाजपाFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरी