शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकरी आंदोलन भाजपाला भोवणार; हरियाणातील खट्टर सरकार संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 08:53 IST

Farmers Protest, Haryana Government: उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांची जेजेपी सत्तास्थापनेसाठी दिलेला टेकू काढून घेण्याच्या विचारात आहेत. यासाठी ८ डिसेंबरला आमदारांची मोठी बैठक झाली असून यामध्ये शेतकरी आंदोलनाच्या त्यांच्या मतदारसंघात बसणारा फटका यावर चर्चा करण्यात आली. 

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन आता उग्र होऊ लागले असून याचा परिणाम आजुबाजुच्या राज्यांमधील राजकारणावरही जाणवू लागला आहे. हरियाणामध्ये बहुमतापासून दूर असलेल्या भाजपाचे मनोहरलाल खट्टर सरकार संकटात आले आहे. उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांची जेजेपी सत्तास्थापनेसाठी दिलेला टेकू काढून घेण्याच्या विचारात आहेत. यासाठी ८ डिसेंबरला आमदारांची मोठी बैठक झाली असून यामध्ये शेतकरी आंदोलनाच्या त्यांच्या मतदारसंघात बसणारा फटका यावर चर्चा करण्यात आली. 

जननायक जनता पार्टी (JJP) मध्ये खट्टर सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 'द इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार चौटाला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आमदारांच्या बैठकीत सरकारचे समर्थन काढून घेण्याची जोरदार मागणी करण्यात आली. या बैठकीत आमदारांच्या मतदारसंघात शेतकरी आंदोलनाचा होणारा परिणाम, राज्यातील लोकांचे मत आदी बाबींचा विचार करण्यात आला.

ही बैछक एका विमानतळावर झाली आहे. मात्र, शहराचा खुलासा झालेला नाही. जेजेपीचे आमदार देवेंदर बबली यानी सांगितले की, सरकारने एवढेही ताणू नये की ही वेळ यावी. आम्ही शेतकऱ्याच्या हिताला आधीपासूनच प्राधान्य देत आहोत. शेतकऱ्यांनी, हरियाणाच्या मतदारांनी आम्हाला इथे पाठविले आहे. आज सहकारी पक्ष म्हणून सरकारमध्ये काम करत आहोत. उद्या जर कोणाचे शोषण झाले तर डोळे बंद करू शकत नाही, असा इशारा दिला आहे. 

शेतकऱी आंदोलनावर लवकरच तोडगा काढावाबबली यांनी सांगितले की, ही बैठक शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेली परिस्थीतीवर होती. आमचा पक्ष हा शेतकरी आणि मजूरांचा आहे. आमचा मतदारही हाच आहे. यामुळे आमच्यावर दबाव असून शेतकरी आंदोलनावर लवकरच तोडगा काढायला हवा. 

जेजेपीचे आमदार किती?हरियाणामध्ये जेजेपीचे १० आमदार आहेत. हरियाणात २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. ९० जागा असलेल्या या विधानसभेत भाजपाला बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. यामुळे जेजेपीने हात पुढे करत पाठिंबा दिला होता. जेजेपीच्या पाठिंब्याने भाजपाचे मनोहरलाल खट्टर पुन्हा मुख्यमंत्री झाले होते. शेतकरी आंदोलनावरून पहिली ठिणगी पंजाबमध्ये पडली होती. शिरोमणि अकाली दलाने सप्टेंबरमध्येच केंद्रातील मंत्रीपद सोडत काडीमोड घेतला होता.  

टॅग्स :Haryanaहरयाणाharyana election 2019हरियाणा निवडणूकBJPभाजपाFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरी