शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
2
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
3
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
4
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
5
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
6
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
7
पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
8
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
9
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
10
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
11
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
12
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
13
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
14
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
15
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
16
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
17
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
18
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
19
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
20
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य

शेतकरी आंदोलन भाजपाला भोवणार; हरियाणातील खट्टर सरकार संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 08:53 IST

Farmers Protest, Haryana Government: उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांची जेजेपी सत्तास्थापनेसाठी दिलेला टेकू काढून घेण्याच्या विचारात आहेत. यासाठी ८ डिसेंबरला आमदारांची मोठी बैठक झाली असून यामध्ये शेतकरी आंदोलनाच्या त्यांच्या मतदारसंघात बसणारा फटका यावर चर्चा करण्यात आली. 

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन आता उग्र होऊ लागले असून याचा परिणाम आजुबाजुच्या राज्यांमधील राजकारणावरही जाणवू लागला आहे. हरियाणामध्ये बहुमतापासून दूर असलेल्या भाजपाचे मनोहरलाल खट्टर सरकार संकटात आले आहे. उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांची जेजेपी सत्तास्थापनेसाठी दिलेला टेकू काढून घेण्याच्या विचारात आहेत. यासाठी ८ डिसेंबरला आमदारांची मोठी बैठक झाली असून यामध्ये शेतकरी आंदोलनाच्या त्यांच्या मतदारसंघात बसणारा फटका यावर चर्चा करण्यात आली. 

जननायक जनता पार्टी (JJP) मध्ये खट्टर सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 'द इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार चौटाला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आमदारांच्या बैठकीत सरकारचे समर्थन काढून घेण्याची जोरदार मागणी करण्यात आली. या बैठकीत आमदारांच्या मतदारसंघात शेतकरी आंदोलनाचा होणारा परिणाम, राज्यातील लोकांचे मत आदी बाबींचा विचार करण्यात आला.

ही बैछक एका विमानतळावर झाली आहे. मात्र, शहराचा खुलासा झालेला नाही. जेजेपीचे आमदार देवेंदर बबली यानी सांगितले की, सरकारने एवढेही ताणू नये की ही वेळ यावी. आम्ही शेतकऱ्याच्या हिताला आधीपासूनच प्राधान्य देत आहोत. शेतकऱ्यांनी, हरियाणाच्या मतदारांनी आम्हाला इथे पाठविले आहे. आज सहकारी पक्ष म्हणून सरकारमध्ये काम करत आहोत. उद्या जर कोणाचे शोषण झाले तर डोळे बंद करू शकत नाही, असा इशारा दिला आहे. 

शेतकऱी आंदोलनावर लवकरच तोडगा काढावाबबली यांनी सांगितले की, ही बैठक शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेली परिस्थीतीवर होती. आमचा पक्ष हा शेतकरी आणि मजूरांचा आहे. आमचा मतदारही हाच आहे. यामुळे आमच्यावर दबाव असून शेतकरी आंदोलनावर लवकरच तोडगा काढायला हवा. 

जेजेपीचे आमदार किती?हरियाणामध्ये जेजेपीचे १० आमदार आहेत. हरियाणात २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. ९० जागा असलेल्या या विधानसभेत भाजपाला बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. यामुळे जेजेपीने हात पुढे करत पाठिंबा दिला होता. जेजेपीच्या पाठिंब्याने भाजपाचे मनोहरलाल खट्टर पुन्हा मुख्यमंत्री झाले होते. शेतकरी आंदोलनावरून पहिली ठिणगी पंजाबमध्ये पडली होती. शिरोमणि अकाली दलाने सप्टेंबरमध्येच केंद्रातील मंत्रीपद सोडत काडीमोड घेतला होता.  

टॅग्स :Haryanaहरयाणाharyana election 2019हरियाणा निवडणूकBJPभाजपाFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरी