शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

भाजप घेणार सहा, तर शिवसेनेला देणार दोन विधानसभा निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:39 IST

श्रीनिवास नागे । सांगली : लोकसभा निवडणुकीनंतर लगेच विधानसभेच्या तयारीला लागलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या नेत्यांकडून सांगली जिल्ह्यातील जागावाटपावर अंतिम हात ...

ठळक मुद्देयुतीचे सांगली जिल्ह्यातील जागावाटप निश्चित

श्रीनिवास नागे ।सांगली : लोकसभा निवडणुकीनंतर लगेच विधानसभेच्या तयारीला लागलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या नेत्यांकडून सांगली जिल्ह्यातील जागावाटपावर अंतिम हात फिरवण्यात येत आहे. आठपैकी सहा मतदारसंघ भाजपला, तर दोन शिवसेनेला देण्यात येणार आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत दक्षिण महाराष्टत लक्षणीय यश मिळवल्याने भाजप आणि शिवसेनेने उचल खाल्ली आहे. तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीतही एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. लोकसभेवेळी सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, माढा, सोलापूर हे पाच मतदारसंघ युतीकडे खेचून आणण्याची कामगिरी महसूलमंत्री पाटील यांनी फत्ते केली. त्यामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील विधानसभेच्या जागांची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.

युतीच्या २००९ मधील जागावाटपाच्या सूत्रानुसार जिल्ह्यातील आठपैकी तीन मतदारसंघ भाजपकडे होते. त्यात सांगली, मिरज, जतचा समावेश होता, तर खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ, इस्लामपूर, शिराळा, पलूस-कडेगाव हे पाच मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आले होते. २०१४ मध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी खानापुरातून शिवसेनेचा, तर सांगली, मिरज, जत, शिराळ्यातून भाजपचे आमदार निवडून आले.

गेल्या पाच वर्षांत ही राजकीय परिस्थिती आणखी बदलली असून पक्षाचे वर्चस्व वाढल्याचा दावा भाजप करत आहे. त्यामुळे सांगली, मिरज, जत, शिराळ्यासह पलूस-कडेगाव आणि इस्लामपूर हे सहा मतदारसंघ भाजपने मागितले आहेत. जागांच्या तडजोडीमध्ये युतीच्या नेत्यांकडून त्यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री पाटील यांनी या सहा जागांवरील इच्छुकांना तयारीचा वेग वाढवण्यास सांगितले आहे. सांगलीतून सुधीर गाडगीळ, मिरजेतून सुरेश खाडे या विद्यमान आमदारांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.जतमध्ये आमदार विलासराव जगताप यांना पक्षांतर्गत विरोध आहे.

मात्र जगताप यांचे ‘इलेक्टिव्ह मेरिट’ सर्वाधिक असल्याचे पक्षांतर्गत अहवालात म्हटले आहे. शिराळ्यातून आ. शिवाजीराव नाईक आणि सम्राट महाडिक इच्छुक आहेत. आ. नाईक यांच्या संस्था अडचणीत आल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे या उमेदवारीवर सर्वाधिक खल सुरू आहे.

आता ‘लक्ष्य’ : इस्लामपूर, पलूस-कडेगावमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी इस्लामपूर आणि पलूस-कडेगाववर लक्ष केंद्रित केले असून, दोन्ही जागा भाजपसाठी मागून घेण्यात येत आहेत. इस्लामपुरात भाजपकडून नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राहूल महाडिक, गौरव नायकवडी इच्छुक आहेत. युतीतील घटकपक्ष रयत क्रांती संघटना भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढविणार असल्याने त्यांच्याबाबतही चर्चा सुरू आहे. पलूस-कडेगावमधून संग्रामसिंह देशमुख यांचे नाव आधीच जाहीर करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर लगेच विधानसभेच्या तयारीला लागलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या नेत्यांकडून सांगली जिल्ह्यातील जागावाटपावर अंतिम हात फिरवण्यात येत आहे. आठपैकी सहा मतदारसंघ भाजपला, तर दोन शिवसेनेला देण्यात येणार आहेत.

अजितराव घोरपडेंचे काय?खानापूर आणि तासगाव-कवठेमहांकाळ या दोन जागा शिवसेनेला सोडण्यात येणार असून खानापुरातून अनिल बाबर यांची उमेदवारी निश्चित आहे. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे प्रबळ दावेदार असले तरी त्यांनी भाजपकडूनच लढणार, शिवसेनेकडून नाही, असे सांगितले आहे. तथापि घोरपडेंना शिवसेनेत पाठवून उमेदवारी दिली जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगलीchandrakant patilचंद्रकांत पाटील