शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
5
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
6
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
7
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
8
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
9
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
10
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
11
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
12
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
13
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
14
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
15
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
16
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
17
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
18
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
19
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
20
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!

Corona Vaccine: “राज्यात ९ लाख डोस फुकट घालवायचे अन् मोदी सरकारकडे लसींची मागणी करायची”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 08:48 IST

Corona Vaccine: एकीकडे राज्यात लसींचे ९ लाख डोस फुकट घालवले आहेत आणि दुसरीकडे आता केंद्रातील मोदी सरकारकडे आणखी कोरोना लसींची मागणी करायची, अशी टीका करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसरकारने राज्यात राबवलेली धोरणे पक्षपातीसरकारी यंत्रणांच्या फोलपणाचे खापर केंद्रातील मोदी सरकारवर फोडले जातेयसरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम राज्यातील १० कोटी जनतेवर

कोलकाता: देशात कोरोनाची दुसरी लाट अद्यापही पूर्णपणे ओसरलेली नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशाराही देण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे. लसींच्या कमतरतेमुळे देशव्यापी लसीकरण मोहिमेचा वेग मंदावल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक राज्यांकडून केंद्र सरकारला लसींच्या पुरवठ्याबाबत विनंती केली जात असताना, एकीकडे राज्यात लसींचे ९ लाख डोस फुकट घालवले आहेत आणि दुसरीकडे आता केंद्रातील मोदी सरकारकडे आणखी कोरोना लसींची मागणी करायची, अशी टीका करण्यात आली आहे. (bjp suvendu adhikari criticised mamata banerjee govt over corona vaccine)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुन्हा एकदा कोरोना लसीसंदर्भात तक्रार केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिले आहे. पश्चिम बंगालमध्ये लसीचा पुरवठा वाढविला गेला नाही, तर कोरोना महामारी अधिक गंभीर होऊ शकते. एवढेच नाही, तर पश्‍चिम बंगालला कोरोना लसीच्या जवळपास १४ कोटी डोसची आवश्यकता आहे, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. यावरून भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर निशाणा साधला आहे.

सावधान! डेल्टापेक्षाही अधिक घातक कोरोनाचा व्हेरिएंट येणार? लसीही निष्प्रभ ठरणार

ममता बॅनर्जी यांची धोरणे पक्षपाती

ममता बॅनर्जी यांच्या सरकारने राज्यात राबवलेली धोरणे पक्षपाती आहेत. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. नागरिकांना लस घेण्यात मोठ्या अडचणी येत आहेत, असे सांगत ममता बॅनर्जी सरकारने कोरोना लसीचे ९ लाख डोस फुकट घालवल्याचा दावाही सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे. तसेच आपल्या आधीच्या दाव्यांपासून ममता बॅनर्जी यांनी घुमजाव केले आहे. सरकारी यंत्रणांच्या फोलपणाचे खापर केंद्रातील मोदी सरकारवर फोडले जात आहे, अशी टीकाही अधिकारी यांनी केली. तृणमूल काँग्रेसच्या सरकारने काही लाख लसी खरेदी केल्या आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम राज्यातील १० कोटी जनतेवर पडत आहे. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि जवळच्या लोकांना लसींसाठी पायघड्या घातल्या जात आहेत, तर सामान्य जनता रांगेत ताटकळत उभी राहते, असा दावा अधिकारी यांनी केला आहे.

काय सांगता! वय वर्षे १२ अन् जेवणात खातो तब्बल ४० चपात्या; डॉक्टरही चक्रावले

दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अलीकडेच पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीतही कोरोना लसीचा मुद्दा उपस्थित केला होता. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत, आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ग्लोबल अॅडव्हायजरी बोर्डाची बैठक घेतली. यावेळी नोबेल विजेते अभिजित बॅनर्जीही उपस्थित होते. गुजरात, यूपी आणि कर्नाटक या राज्यांना मुबलक प्रमाणात कोरोना लसी मिळाल्या आहेत. मी लोकांमध्ये भेदभाव करत नाही. पश्चिम बंगालला लोकसंख्येच्या घनतेनुसार कमी लसी मिळाल्या आहेत. मी केंद्र आणि पंतप्रधान मोदींना विनंती करते, की राज्या-राज्यांमध्ये भेदभाव करू नका, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार