शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

Corona Vaccine : "राहुल गांधींनी अद्याप कोरोना लस का नाही घेतली, की त्यांना घ्यायचीच नाही?", भाजपाचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 15:44 IST

BJP Slams Congress Rahul Gandhi Over Corona Vaccine : भाजपाने राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मोदी सरकारवर निशाणा साधत असतात. मात्र आता भाजपाने राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. "पार्ट-टाईम राजकीय नेते म्हणून अपयशी झाल्यानंतर आता राहुल गांधींनी फुल टाइम लॉबिंग सुरू केली आहे का?" असं म्हणत राहुल यांनी जोरदार निशाणा साधला आहे. तसेच राहुल गांधी अद्याप कोरोनावरील लस का घेतली नाही? राहुल गांधींना लस घ्यायची नाही का?" असा सवाल देखील विचारला आहे. 

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. "पार्ट-टाईम राजकीय नेते म्हणून अपयशी झाल्यानंतर आता राहुल गांधी यांनी फुल टाइम लॉबिंग सुरू केली आहे का? आधी त्यांनी राफेल विमान खरेदीच्या प्रक्रियेला खीळ बसवण्यासाठी इतर विमान कंपन्यांसाठी लॉबिंग केले. आता विदेशी औषध कंपन्यांच्या लसींसाठी लॉबिंग करत आहेत" असा आरोप रविशंकर यांनी केला आहे. तसेच त्यांनी कोरोना लसीकरणावरून देखईल सणसणीत टोला लगावला आहे. 

"काँग्रेसशासित राज्यांमध्ये कोरोनावरील लसीचा तुटवडा नाही तर योग्य आरोग्य सेवा देण्याचा तुटवडा आहे. त्यांनी आपल्या राज्यांना पत्र लिहिलं पाहिजे. वसुली मोहीम थांबवा आणि लसींचे लाखो डोस दडवून ठेवण्यापेक्षा नागरिकांना देण्यासाठी लक्ष केंद्रीत करा असं राहुल गांधींनी सांगितलं पाहिजे. भारतात लसींचा तुटवडा नाही. पण राहुल यांना मात्र आपल्यावरील दुर्लक्षाचा सामना करावा लागतो. राहुल गांधी अद्याप कोरोनावरील लस का घेतली नाही? राहुल गांधींना लस घ्यायची नाहीए का? की त्यांनी आधीच लस घेतली आहे? जसे ते विदेशात गुपचुप दौरे करून येतात आणि उघड करत नाहीत, तसंच लसीबाबत आहे का?" असं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.

"केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट, अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी" 

"केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी" आहे असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची भयंकर अशी दुसरी लाट आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतत आहेत. सर्वसामान्यांचं जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणं देखील अत्यंत आवश्यक आहे. मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतcongressकाँग्रेसBJPभाजपाRavi Shankar Prasadरविशंकर प्रसाद