शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : "राहुल गांधींनी अद्याप कोरोना लस का नाही घेतली, की त्यांना घ्यायचीच नाही?", भाजपाचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 15:44 IST

BJP Slams Congress Rahul Gandhi Over Corona Vaccine : भाजपाने राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मोदी सरकारवर निशाणा साधत असतात. मात्र आता भाजपाने राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. "पार्ट-टाईम राजकीय नेते म्हणून अपयशी झाल्यानंतर आता राहुल गांधींनी फुल टाइम लॉबिंग सुरू केली आहे का?" असं म्हणत राहुल यांनी जोरदार निशाणा साधला आहे. तसेच राहुल गांधी अद्याप कोरोनावरील लस का घेतली नाही? राहुल गांधींना लस घ्यायची नाही का?" असा सवाल देखील विचारला आहे. 

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. "पार्ट-टाईम राजकीय नेते म्हणून अपयशी झाल्यानंतर आता राहुल गांधी यांनी फुल टाइम लॉबिंग सुरू केली आहे का? आधी त्यांनी राफेल विमान खरेदीच्या प्रक्रियेला खीळ बसवण्यासाठी इतर विमान कंपन्यांसाठी लॉबिंग केले. आता विदेशी औषध कंपन्यांच्या लसींसाठी लॉबिंग करत आहेत" असा आरोप रविशंकर यांनी केला आहे. तसेच त्यांनी कोरोना लसीकरणावरून देखईल सणसणीत टोला लगावला आहे. 

"काँग्रेसशासित राज्यांमध्ये कोरोनावरील लसीचा तुटवडा नाही तर योग्य आरोग्य सेवा देण्याचा तुटवडा आहे. त्यांनी आपल्या राज्यांना पत्र लिहिलं पाहिजे. वसुली मोहीम थांबवा आणि लसींचे लाखो डोस दडवून ठेवण्यापेक्षा नागरिकांना देण्यासाठी लक्ष केंद्रीत करा असं राहुल गांधींनी सांगितलं पाहिजे. भारतात लसींचा तुटवडा नाही. पण राहुल यांना मात्र आपल्यावरील दुर्लक्षाचा सामना करावा लागतो. राहुल गांधी अद्याप कोरोनावरील लस का घेतली नाही? राहुल गांधींना लस घ्यायची नाहीए का? की त्यांनी आधीच लस घेतली आहे? जसे ते विदेशात गुपचुप दौरे करून येतात आणि उघड करत नाहीत, तसंच लसीबाबत आहे का?" असं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.

"केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट, अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी" 

"केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी" आहे असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची भयंकर अशी दुसरी लाट आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतत आहेत. सर्वसामान्यांचं जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणं देखील अत्यंत आवश्यक आहे. मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतcongressकाँग्रेसBJPभाजपाRavi Shankar Prasadरविशंकर प्रसाद