शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

Corona Vaccine : "राहुल गांधींनी अद्याप कोरोना लस का नाही घेतली, की त्यांना घ्यायचीच नाही?", भाजपाचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 15:44 IST

BJP Slams Congress Rahul Gandhi Over Corona Vaccine : भाजपाने राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मोदी सरकारवर निशाणा साधत असतात. मात्र आता भाजपाने राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. "पार्ट-टाईम राजकीय नेते म्हणून अपयशी झाल्यानंतर आता राहुल गांधींनी फुल टाइम लॉबिंग सुरू केली आहे का?" असं म्हणत राहुल यांनी जोरदार निशाणा साधला आहे. तसेच राहुल गांधी अद्याप कोरोनावरील लस का घेतली नाही? राहुल गांधींना लस घ्यायची नाही का?" असा सवाल देखील विचारला आहे. 

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. "पार्ट-टाईम राजकीय नेते म्हणून अपयशी झाल्यानंतर आता राहुल गांधी यांनी फुल टाइम लॉबिंग सुरू केली आहे का? आधी त्यांनी राफेल विमान खरेदीच्या प्रक्रियेला खीळ बसवण्यासाठी इतर विमान कंपन्यांसाठी लॉबिंग केले. आता विदेशी औषध कंपन्यांच्या लसींसाठी लॉबिंग करत आहेत" असा आरोप रविशंकर यांनी केला आहे. तसेच त्यांनी कोरोना लसीकरणावरून देखईल सणसणीत टोला लगावला आहे. 

"काँग्रेसशासित राज्यांमध्ये कोरोनावरील लसीचा तुटवडा नाही तर योग्य आरोग्य सेवा देण्याचा तुटवडा आहे. त्यांनी आपल्या राज्यांना पत्र लिहिलं पाहिजे. वसुली मोहीम थांबवा आणि लसींचे लाखो डोस दडवून ठेवण्यापेक्षा नागरिकांना देण्यासाठी लक्ष केंद्रीत करा असं राहुल गांधींनी सांगितलं पाहिजे. भारतात लसींचा तुटवडा नाही. पण राहुल यांना मात्र आपल्यावरील दुर्लक्षाचा सामना करावा लागतो. राहुल गांधी अद्याप कोरोनावरील लस का घेतली नाही? राहुल गांधींना लस घ्यायची नाहीए का? की त्यांनी आधीच लस घेतली आहे? जसे ते विदेशात गुपचुप दौरे करून येतात आणि उघड करत नाहीत, तसंच लसीबाबत आहे का?" असं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.

"केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट, अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी" 

"केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी" आहे असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची भयंकर अशी दुसरी लाट आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतत आहेत. सर्वसामान्यांचं जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणं देखील अत्यंत आवश्यक आहे. मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतcongressकाँग्रेसBJPभाजपाRavi Shankar Prasadरविशंकर प्रसाद