शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

“रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था नाना पटोलेंची झालीये”; भाजपचा खोचक टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 20:36 IST

नाना पटोले यांची अवस्था रोज मरे त्याला कोण रडे, अशी झाल्याचे भाजपने म्हटले आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यांत अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधक भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला होता. मात्र, काही वेळातच त्यांनी त्यावरून यु टर्न घेतला. यावरून भाजपने नाना पटोले यांच्यावर खोचक टीका केली असून, नाना पटोले यांची अवस्था रोज मरे त्याला कोण रडे, अशी झाल्याचे म्हटले आहे. (bjp pravin darekar criticised nana patole over phone tapping case)

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात फोन टॅपिंग प्रकरणी तीव्र आक्षेप घेत खळबळ उडवून दिली होती. त्या मुद्द्यावरून राजकारण सुरू असतानाच राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपल्या हालचालींवर पाळत ठेवत आहेत, असे मोठे आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही नाना पटोले यांना टोला लगावला. यानंतर आता भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नाना पटोलेंना टोला लगावला आहे. 

“जनगणनेत ८ कोटी चुका नाहीत, फडणवीस दिशाभूल करतायत”; चव्हाणांनी केली पोलखोल

कदाचित त्यांच्या भावना खऱ्या असतील

कदाचित नाना पटोले यांच्या भावना खऱ्या असतील. ते येतात जोरात, पण त्यांनी एकदाच नाही, तर अनेक वेळा तलवार म्यान केली आहे. अजित पवारांची नाराजी आणि मुख्यमंत्र्यांनी दट्ट्या दिला असेल, असा दावा करत नाना पटोले यांची अवस्था रोज मरे, त्याला कोण रडे अशी झाली आहे, असा टोला दरेकरांनी लगावला. 

ते महाराष्ट्राच्या जनतेला काय विश्वास देणार

सरकार टिकणे ही सगळ्यांची गरज असल्यामुळेच नाना पटोले यांनी आपली तलवार म्यान केली असेल. भावना तर त्यांनी प्रकट केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय चालले आहे, हे जनतेसमोर आले आहे. त्यामुळे जे एकमेकांवर विश्वास ठेऊ शकत नाहीत, ते महाराष्ट्राच्या जनतेला काय विश्वास देणार, असे चित्र राज्यात उभे राहाताना दिसत आहे, असे दरेकर यांनी म्हटले आहे. 

झोटिंग समिती फास होता, एकनाथ खडसेंना केवळ त्रास होता; नाना पटोलेंची फडणवीसांवर टीका

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये एकमत आहे. माझे वाक्य तोडून मोडून दाखवले. मी काही चुकीचे बोललो नाही. पक्षप्रमुख म्हणून बोलणे हे काम आहे. कार्यकर्त्याचे गाऱ्हाणे ऐकणे माझे काम आहे, असे सांगत पण मला विरोध का होतो, हे माहिती नाही. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्व सुरळीत सुरु आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाpravin darekarप्रवीण दरेकर