शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

“दाऊदच्या फोटोला काळे फासून चप्पला मारण्याचा कार्यक्रम लाचार सेनेकडून साजरा व्हायला हवा होता”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 08:48 IST

पोस्टमॉर्टेम दिवसाढवळ्या करण्याचा कायदा असतानाही सुशांत सिंग राजपूतचं शवविच्छेदन मात्र आपल्या राज्यात रात्रीच्या अंधारातच झालं असा टोला आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला लगावला आहे.

ठळक मुद्देसुशांत सिंग राजपूतचं शवविच्छेदन रात्रीच्या अंधारातच झालं भाजपा आमदाराचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला अग्रलेखात लफंगे, हिजडे असे शब्द वापरणारे अर्णबवर आक्षेप कसा घेऊ शकतात???

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाला आता राजकीय वळण लागलं आहे. सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपाचा खरपूस समाचार घेतल्यानंतर भाजपानेही त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदकडून मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानी धमकीचे फोन आल्याचा हवाला देत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मातोश्री बॉम्बने उडवून द्यायची धमकी मिळाल्यावर कमीत कमी दाऊदच्या फोटोला काळे फासून त्याला चपला मारण्याचा एखादा ब्रम्हांड व्यापी कार्यक्रम लाचार सेनेकडून साजरा व्हायला हवा होता अशा शब्दात त्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी कामं करायची ती आम्ही दिवसा-ढवळ्या करतो, रात्रीच्या अंधारात नाही हे विधान करुन अप्रत्यक्षपणे भाजपाला टोला लगावला होता.

मुख्यमंत्र्यांच्या या विधानवरुनही भाजपाने उत्तर देत पोस्टमॉर्टेम दिवसाढवळ्या करण्याचा कायदा असतानाही सुशांत सिंग राजपूतचं शवविच्छेदन मात्र आपल्या राज्यात रात्रीच्या अंधारातच झालं असा टोला आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला लगावला आहे.

सामना अग्रलेखातून शिवसेनेची भाजपावर टीका

राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंतांच्या राजद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा हरामखोरीच म्हणजे मातीशी बेईमानीच आहे. महाराष्ट्रातील बेईमानांच्या पाठीशी जे उभे आहेत, त्यांना १०६ हुतात्म्यांचे तळतळाट लागतील. मुंबाई मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये, असा टोला शिवसेनेने सामनातील अग्रलेखामधून भाजपाला लगावला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आज प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखातून भाजपाचे नाव न घेता टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत. मुंबई कुणाची? हा प्रश्नच कुणी विचारू नये. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहेच पण देशाचे सर्वात मोठे आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे. याच मुंबईसाठी १०६ मराठी माणसांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे मुंबई महाराष्टाचीच आहे. ती मुंबईत इमानाने राहणाऱ्या सर्वांची आहे. कारण ती भारताची आहे. पण ती आधी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची आहे. म्हणूनच ती भारताची आहे. त्यामुळे मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे आणि मुंबई पोलिसांना माफिया वगैरे हिणवून खाकी वर्दीचा अवमान करणे हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.

कंगनाच्या निषेधाचा ठराव; विरोधी पक्षनेत्याचा सरकारला टोला

मुंबई पोलीस आणि महाराष्ट्रबद्दल अनुद्गार काढल्याबद्दल अभिनेत्री कंगना रनौत हिच्या निषेधाचा ठराव विधानसभेत मांडला गेला. आपण देखील कंगनाच्या विधानाचे समर्थन करत नाही, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच प्रसार माध्यमे जर विरोधात बोलत असतील, मुख्यमंत्र्यांचे उल्लेख चुकीच्या पद्धतीने करत असतील, तर त्याचे समर्थन कदापि केले जाणार नाही. मात्र छगन भुजबळ ज्या पोटतिडकीने उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याविषयी बोलले त्याच पोटतिडकीने त्यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे उल्लेख कसे केले जातात हे देखील तपासून पहावे. वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गळे काढणारे आज गप्प आहेत? कोणाचाही एकेरी उल्लेख चुकीचा आहे. मात्र हाच निकष सर्व माध्यमांना लागू असला पाहिजे असे सांगून फडणवीस म्हणाले, कंगना रणौतच्या विधानाचा आम्ही तीव्र निषेध करतो, त्यामुळे महाराष्ट्रातल्या पोलिसांचा नक्कीच अपमान झाला आहे. पण या सभागृहाचे नेते उद्धव ठाकरे यांनी कल्याणच्या सभेत पोलीस भांडी घासायच्या लायकीचे आहेत, असे विधान केले होते. भूमिका बदलल्या की आपण कसे बदलतो याचे हे उत्तम उदाहरण आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकरDawood Ibrahimदाऊद इब्राहिम