शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
4
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
5
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
6
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
7
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
8
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
9
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
10
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
11
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
12
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
13
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
14
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
15
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
16
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
17
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
18
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
19
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
20
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण

Mumbai Rain: "आता ठाकरे सरकार मुंबईतील पावसाची जबाबदारीही मोदींवरच ढकलेल", भाजपाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 4:49 PM

Mumbai rain Politics: पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची तुंबई झाल्यानंतर आता राजकारणालाही जोर आला आहे. पहिल्याच पावसात मुंबईत साठलेल्या पाण्यावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने मुंबई महानगरपालिका तसेच ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

मुंबई - आज पावसाने मुंबई आणि आसपासच्या परिसराला झोडपून काढले आहे. अनेक सखल भागात पाणी साठल्याने रस्ते वाहतूक तसेच रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी घरांमध्येही पाणी शिरले आहे. दरम्यान, पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची तुंबई झाल्यानंतर आता राजकारणालाही जोर आला आहे. पहिल्याच पावसात मुंबईत साठलेल्या पाण्यावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने मुंबई महानगरपालिका तसेच ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तसेच आता राज्य सरकार बहुतेक पावसाची जबाबदारीही मोदींवरच ढकलेल, असा टोला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. 

मुंबईत मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राज्य सरकारवर टीका करताना अतुल भातखळकर म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेने आज मुंबई तुंबवून दाखवली आहे. मुंबईतील नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आम्ही आधीपासून सांगत होतो. ती बाब आता आज उघड झाली आहे. आता राज्य सरकारकडून पावसाची जबाबदारीही आता बहुतेक मोदींवर ढकलली जाईल. आता मोदींनीच त्यातून मार्ग काढावा, असे राज्य सरकारने म्हणू नये अशी आमची अपेक्षा आहे, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला. आज सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईसह आसपासच्या परिसरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या आहेत. मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकाजवळ पाणी साठल्याने उपनगरीय वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच अंधेरीसह, हिंदमाता परिसरातही पाणी साठल्यामुळे रस्ते वाहतूक बाधित झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. हवामान विभागाने मान्सूनचे आगमन जाहीर केले असून पुढील तीन दिवस मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.  अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन परवाच मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते त्याप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांनी सकाळी संबंधित विभागाकडून माहिती घेतली व मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांना असुविधा होणार नाही यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत व जेथे

टॅग्स :Mumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेटAtul Bhatkalkarअतुल भातखळकरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाNarendra Modiनरेंद्र मोदी