शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"मर्दाला मर्द असल्याचे सांगावे लागत नाही", नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 18:58 IST

Narayan Rane News : भाजपा नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज प्रसिद्ध झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवरून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देमुलाखतीत मी मर्द आहे, मी मर्द आहे असं सांगताहेत. मर्दाला मर्द असल्याचं सांगावं लागल नाहीहात धुवत होतो आता हात धुवून मागे लागेन हे वाक्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला शोभत नाहीअधोगतीकडे नेणारा कारभार, कोणत्याही विषयाचं ज्ञान नसलेले मुख्यमंत्री यामुळे महाराष्ट्र अधोगतीकडे चालला आहे

सिंधुदुर्ग/मुंबई - महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आज प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीवरून आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, भाजपा नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी या मुलाखतीवरून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. मर्दाला मर्द असल्याचे सांगायची गरज लागत नाही, असा टोला नारायण राणेंनी लगावला आहे.नारायण राणे म्हणाले की, मुलाखतीत मी मर्द आहे, मी मर्द आहे असं सांगताहेत. मर्दाला मर्द असल्याचं सांगावं लागल नाही. आता यांची पण एकदा चाचणी करावी लागेल, असेही नारायण राणे म्हणाले. सरकार पाडून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे देताहेत. मात्र हे स्वत:च पडणार आहेत, असे भाकितही नारायण राणे यांनी केले.आजच्या मुलाखतीमध्ये विरोधकांना धमक्या देणं, ईडी, सीबीआयला धमक्या देण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आतापर्यंत हात धुवत होतो आता हात धुवून मागे लागेन हे वाक्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला शोभत नाही. हात धुवून कुणाच्या मागे लागणार ईडीच्या, सीबीआयच्या की भाजपाच्या नेत्यांच्या? तुमचं ५६ आमदारांचं सरकार किती दिवस चालेल. केंद्राच्या अखत्यारीतील संस्थांवर राज्य सरकार काय कारवाई करू शकते, अशी विचारणाही नारायण राणेंनी केली.मुख्यमंत्र्यांनी लोकहितासाठी, हिंदुत्वासाठी काय केलं . शेतकऱ्यांसाठी काय केलं, हा प्रश्न आहे. कोरोनाचे बळी आणि रुग्णांच्याबाबतीत महाराष्ट्र राज्य एक नंबर वर आहे. कामामध्ये शून्य आणि याबाबतीत एक नंबर, अशी परिस्थिती आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली. तसेच सुशांत सिंह राजपूत आणि दीशा सालियन यांचं प्रकरण आम्ही विसरलेलो नाही, असा इशाराही नारायण राणे यांनी दिला. आपल्याला प्रशासकीय ज्ञान नाही असे उद्धव ठाकरे यांनी कबूल केले आहे, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री स्वत: कार चालवत मंत्रालयात गेल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं आहे. मात्र महाराष्ट्राला कर्तृत्ववान मुख्यमंत्री हवा आहे, ड्रायव्हर नको, असा टोला नारायण राणे यांनी लगावला. एक वर्षाचा निष्क्रिय कारभार, अधोगतीकडे नेणारा कारभार, कोणत्याही विषयाचं ज्ञान नसलेले मुख्यमंत्री यामुळे महाराष्ट्र अधोगतीकडे चालला आहे. याला शिवसेनेसोबतच अन्य दोन घटकपक्षही जबाबदार आहे, असा आरोपही नारायण राणेंनी केला.हात धुवून मागे लागण्याच्या धमक्या देऊ नका, कोण कुणाच्या मागे लागेल हे कळेल. आम्ही मागे लागलो तर झोप येऊ देणार नाही. १०० जणांच्या कुंडल्या माहिती आहेत. बंद दरवाजा आडच्या मातोश्रीच्या आतल्या आणि बाहेरच्याही अनेक गोष्टी ठावूक आहेत, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण