शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

नवाब मलिक, आपल्याच तोंडाने आपल्याच अपयशाचे गोडवे गाण्यासाठी हिंमत लागते; भाजपचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 17:26 IST

राज्यात सर्वाधिक कोरोनामृत्यू झाले त्याचेही कारण संख्या कमी दिसण्यासाठी कमी केलेल्या चाचण्या आहेत का?, भाजपचा सवाल

ठळक मुद्देराज्यात सर्वाधिक कोरोनामृत्यू झाले त्याचेही कारण संख्या कमी दिसण्यासाठी कमी केलेल्या चाचण्या आहेत का?, भाजपचा सवालमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची भाजपची मागणी

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका महाराष्ट्रालाही बसला होता. दरम्यान, सर्वाधिक रुग्णसंख्याही महाराष्ट्रात नोंदवण्यात येत होती. गेल्या काही दिवसांपासून देशातील आणि राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. परंतु दुसरीकडे मृत्यूंच्या प्रमाणातही वाढ झालेली दिसत आहे. भाजप महाराष्ट्र मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा एक व्हिडीओ शेअर करत निशाणा कोरोनाच्या परिस्थिवरून निशाणा साधला आहे. 

“महाराष्ट्रात देशांतील सर्वाधिक कोरोनामृत्यू झाले त्याचेही कारण संख्या कमी दिसण्यासाठी कमी केलेल्या चाचण्या आहेत का? नवाब मलिक प्रकरण गंभीर आहे. मुख्यमंत्री महोदय चौकशी करा,” अशी मागणी केशव उपाध्ये यांनी केली आहे. “नवाब मलिक आपल्याच तोंडाने आपल्याच अपयशाचे गोडवे गाण्यासाठी हिंमत लागते. चाचण्या वाढविल्यामुळे करोना संख्या वाढून सरकारची बदनामी होत असल्याचा सल्ला देणारे पत्रकार आणि त्यांच्या इशाऱ्यावर चालणारे राज्य सरकार असे एकाच दगडात दोन पक्षी मारणारे मलिक कुणाची बदनामी करत आहेत?,” असा सवालही त्यांनी केला. केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर टीका केली. तसंच आपल्या ट्वीटसह त्यांनी एक व्हि़डीओदेखील शेअर केला आहे.  “हा तर आपल्याच सरकारला दिलेला घरचा आहेर आहे. नवाब मलिक महाराष्ट्राचे कोरोनाचे आकडे कमी दिसावेत म्हणून चाचण्या कमी केल्याची लोकांची शंका जुनीच आहे. तुमचे हे वक्तव्य त्याची कबुली दिसते. खरे काय ते सांगा. उगाच पत्रकारांच्या मागे लपू नका. सरकार पत्रकार चालवतात का?,” असंही त्यांनी नमूद केलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBJPभाजपाnawab malikनवाब मलिक