शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इच्छा तिथे मार्ग, टाईमपास तिथे कांजुरमार्ग; 'मेट्रो'वरून फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

By कुणाल गवाणकर | Updated: November 18, 2020 20:29 IST

मेट्रो कारशेड प्रकल्प आरेतून कांजुरमार्गला नेण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाचा फडणवीस यांच्याकडून समाचार

मुंबई: आरेतीलमेट्रोचं कारशेड कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय घेणाऱ्या ठाकरे सरकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. इच्छा तिथे मार्ग, असा एक वाकप्रचार आहे. मात्र आता इच्छा तिथे मार्ग, टाईमपास तिथे कांजुरमार्ग असं म्हणायला हवं, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते.मेट्रोचं कारशेड आरेमध्ये करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी घेतला. मेट्रो प्रकल्प भूमिगत करण्याचं तेव्हाच ठरलं होतं. काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार जाण्याआधी हा निर्णय घेण्यात आला. आमचं सरकार आल्यानंतर आरेतील केवळ २५ एकर जागा घेऊन कारशेड करण्याचा निर्णय घेतला गेला, असं फडणवीस यांनी सांगितलं. आरेतील कारशेडला विरोध होऊ लागल्यानं आमच्या सरकारनं कारशेडला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. एक समिती स्थापन केली. कांजुरमार्गची जागा मिळत असेल तर प्रकल्पाचा खर्च वाढेल. कांजूरमार्गची जागा लिटिगेशनमध्ये असल्यानं ती जागा मिळवण्यासाठी बराच अवधी जाईल. कांजूरमार्गची जागा ३ महिन्यांत मिळणार नसेल, तर मग आरे हाच पर्याय उत्तम पर्याय असल्याचा अहवाल समितीनं दिला होता, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. यानंतर आरेतील कारशेडचं प्रकरण उच्च न्यायालयात गेलं. २६०० कोटी रेडी रेकनरप्रमाणे जमा करणाच्या सूचना न्यायालयानं दिल्या. या सगळ्यामुळे ९ महिन्यांचा विलंब झाला. त्यावेळी मेट्रो प्रकल्पातल्या ४० ते ४५ टक्के बोगद्यांचं काम झालं होतं. त्यामुळे प्रकल्पाला दिलेली स्थगिती आम्ही हटवली. महाविकास आघाडी सरकारनं स्थापन केलेल्या समितीनंदेखील कांजूरमार्गला कारशेड केल्यास प्रकल्प पूर्ण करण्यास उशीर होईल आणि खर्चही वाढेल, असा अहवाल दिला आहे. आरेत कारशेड झाल्यास २०२१ पर्यंत मेट्रो धावू लागेल. पण कारशेड कांजूरला गेल्यास २०२४ पर्यंतही प्रकल्प पूर्ण होऊ शकणार नाही. यासोबतच दर दिवशी व्याजापोटी ५ कोटींचा बोजा पडेल, अशी आकडेवारी फडणवीसांनी दिली.  ठाकरे सरकारनं केवळ आणि केवळ अहंकारापोटी कारशेडचा प्रकल्प आरेतून कांजूरला नेल्याचं फडणवीस म्हणाले. प्रकल्प कांजूरला नेल्यानं एक पैसा अधिक खर्च होणार नाही हे मुख्यमंत्री कोणत्या आधारावर बोलतात. आरेमध्ये तुम्ही बांधकामच करणार नाहीत का, याचं उत्तर सरकारनं द्यावं. कारण तिथे बांधकाम होणारच आहे. ग्रीन डेपो उभारला जाणार आहे. कांजूरला प्रकल्प नेल्यानं खर्च वाढेल असा अहवाल सरकारनं नेमलेल्या समितीनेच दिला आहे. हा पैसा तुमच्या घरचा आहे का? जनतेच्या पैशाची लूट करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?, असे सवाल फडणवीस यांनी उपस्थित केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMetroमेट्रोUddhav Thackerayउद्धव ठाकरेAarey Coloneyआरे