शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भावना ताई, ७ कोटींची कॅश आली कुठून?; चोरीच्या तक्रारीवरून भाजपा नेत्याचा मार्मिक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 11:13 IST

मुंबई: गेल्या काही काळापासून सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत ...

मुंबई: गेल्या काही काळापासून सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच आता केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामात शिवसैनिक खोडा घालत असल्याबाबत पत्र लिहिल्याने भर पडली आहे. यानंतर आता शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या कार्यालयातून ७ कोटींची कॅश चोरीला गेल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. यावरून भाजपच्या एका नेत्याने टीकास्त्र सोडले असून, भावना ताई, ७ कोटींची कॅश आली कुठून, असा मार्मिक सवाल केला आहे. (bjp kirit somaiya criticised bhavana gawali on 7 crore cash stolen complaint in police)

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी वाशिम पोलिस ठाण्यात कार्यालयातून ७ कोटी रुपयांची रक्कम पहाटे ५ वाजता चोरीला गेल्याची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवालाची नोंद केली. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत असून, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर निशाणा साधला आहे. 

अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?

एवढी रोख रक्कम आली कुठून?

खासदार भावना गवळी यांचा कार्यालयातून पहाटे ५ वाजता ₹ ७ कोटी रोख नगदी चोरी? शिवसेना भावना गवळी त्यांचा कार्यालयातून, त्यांचा उपस्थितीत ७/७/२०१९ रोजी सकाळी ५ वाजता ₹ ७ कोटी नगदी रोख, ११ लोकांनी चोरले, अशी तक्रार १२/५/२०२० रोजी वाशीम पोलीस ठाण्यात केली. एवढी रोख रक्कम आली कुठून?, असा मार्मिक सवाल ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. दरम्यान, जुलै २०१९ मध्ये झालेल्या ७ कोटीच्या रोख रकमेच्या चोरीची तक्रार मे २०२० मध्ये पोलीस ठाण्यात नोंदवली गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

दरम्यान, नितीन गडकरी यांच्या पत्रावर भावना गवळी यांनी प्रतिक्रिया दिली असून, पुलाचे काम आहेत तर ते कोर्टात गेले आहेत. रस्ता चिरलेला आहे. काम खराब झाले आहे. अशा कामांची चौकशी करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. नितीन गडकरी वाशीम जिल्ह्यात आले होते, तेव्हा रेल्वेच्या उड्डाणपूलासाठी मदतीचे आश्वासन दिले होते. निधी देतो असे म्हटले होते. मी त्यांच्या कानावर काही गोष्टी टाकल्या आहेत. पण त्यात काय चुकीची माहिती गेली हे मी त्यांना भेटून सांगणार आहे, असे भावना गवळी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणBhavna Gavliभावना गवळीKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाShiv Senaशिवसेना