शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

“आधी काँग्रेसला स्वतःचं नाव बदलावं लागेल”: ज्योतिरादित्य शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 22:09 IST

काँग्रेस नामदारांचा पक्ष आहे तर भाजपा कामगारांचा पक्ष आहे, असे ज्योतिरादित्य शिंदे यावेळी म्हणाले. 

ठळक मुद्देआधी काँग्रेसला स्वतःचं नाव बदलावं लागेलकाँग्रेस नामदारांचा तर भाजप कामगारांचा पक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांची काँग्रेसवर टीका

ग्वाल्हेर: कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरताना पाहायला मिळत आहे. कोरोना संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हाच उत्तम उपाय असल्याचे सांगितले जात आहे. देशभरात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू असून, मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. मात्र, यातही राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. एका लसीकरण मोहिमेचा शुभारंभ भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला असून, काँग्रेसला स्वतःच्या नावात बदल करावा लागेल, असे म्हटले आहे. (bjp jyotiraditya scindia criticised congress over name change issue)

देशभरामध्ये आजपासून व्हॅक्सिन फॉर ऑल म्हणजेच सर्वांसाठी मोफत लस मोहिम सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून ज्योतिरादित्य शिंदे यांनी ग्वाल्हेरमध्ये या मोहिमेचा शुभारंभ केला. हजीरा येथील प्रशासकीय रुग्णालयामधील लसीकरण केंद्रामध्ये लोकांना लसीकरण करुन घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ते हजर झाले होते. जागतिक योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली १० लाख लोकांचे लसीकरण केले जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. काँग्रेस नामदारांचा पक्ष आहे तर भाजपा कामगारांचा पक्ष आहे, असे ज्योतिरादित्य शिंदे यावेळी म्हणाले. 

कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्णय

काँग्रेसला नाव बदलावं लागेल

देशात आणि मध्य प्रदेशात कोरोनाच्या महामारीचा फैलाव होत होता, तेव्हा काँग्रेसने राजकारण केले. काँग्रेस कधी लसीकरण करणार नाही असे सांगते, तर कधी लसींमध्ये मांस असल्याचं सांगते, आता ते स्वत:च लस घेण्यासाठी धावपळ करत आहेत. काँग्रेसला ग्वाल्हेरचे नाव बदलण्याची एवढीच इच्छा आहे, तर त्यांना आधी स्वत:चे नाव बदलावे लागले. लोकांच्या मनामध्ये पुन्हा स्थान मिळवण्यासाठी काँग्रेसला नाव बदलावे, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले आहे. 

कोरोना संकटातही एप्रिल महिन्यात मोठी नोकरभरती; १२.७६ लाख नवे रोजगार!

दरम्यान, एकाच दिवसात ६९ लसींचा रेकॉर्डब्रेक कार्यक्रम पूर्ण करण्यात आला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलेय. तसेच, उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही शाबास इंडिया... म्हणत लसीकरण मोहिमेचे कौतुक केले. वेल डन इंडिया. देशात एकाच दिवसांत रेकॉर्डब्रेक लसीकरण करण्यात आले आहे. कोरोनाच्या लढाईत लसीकरण हेच सर्वात मोठे शस्त्र आहे. ज्यांनी लस घेतली त्या सर्वांचे अभिनंदन, तसेच सर्वच फ्रंटलाईन वर्कर्संचेही कौतुक, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसBJPभाजपाJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेPoliticsराजकारण