शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

Narayan Rane: “सरकार हमसे डरती है… पुलिस को आगे करती है…”; भाजपचा ठाकरे सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 21:50 IST

Narayan Rane: सरकार हमसे डरती है… पुलिस को आगे करती है…, असा टोला लगावण्यात आला आहे.

अहमदनगर: केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी संगमेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. नारायण राणे यांना घेऊन संगमेश्वर पोलीस महाडला रवाना झाले आहेत. नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. दरम्यान, नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी राज्यभरात अनेकविध ठिकाणी आंदोलने, निदर्शने केली. यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी या प्रकरणावर टीका केली असून, सरकार हमसे डरती है… पुलिस को आगे करती है…, असा टोला लगावण्यात आला आहे. (bjp chitra wagh criticised thackeray govt over narayan rane arrest)

अटकेनंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले...

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नारायण राणेंच्या अटकेनंतर राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. त्या अहमदनगरला माध्यमांशी बोलत होत्या. अटक करण्याची आणि गुन्हे दाखल करण्याची तत्परता ही फक्त भाजप नेत्यांसाठी आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. नारायण राणे यांच्या अटेकसाठी तत्परता दाखवणे आणि इतर प्रकरणी तत्परता न दाखवणे हीच तुमची शिवशाही आहे का? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. 

“ठाकरे सरकारचा धिक्कार, सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करु”; भाजपचा शिवसेनेला इशारा

सरकार हमसे डरती है आणि पुलिस को आगे करती है

नारायण राणे यांच्या अटकेसाठी जी तत्परता दाखवली ती तत्परता अन्य प्रकरणाबाबत कुठे गेली आहे. पुणे, औरंगाबाद आणि पारनेरमध्ये ती का नाही दाखवली, कायदे आणि नियम फक्त भाजपसाठी आहे, सत्ताधाऱ्यांना लागू होत नाही का, अशी विचारणा चित्रा वाघ यांनी केली आहे. सरकार हमसे डरती है आणि पुलिस को आगे करती है, असे एक ट्विटही चित्रा वाघ यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक आठवण करुन देत आहे की तमाम हिंदू समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा शर्जिल उस्मानी अजून मोकाट हुंदडतोय, असे एक ट्विटही भाजपकडून करण्यात आले आहे.

“छत्रपती संभाजी महाराजांनाही संगमेश्वरात अटक झाली होती आणि औरंगजेब सरकार संपलं होतं”

दरम्यान, उद्धव ठाकरेंना जे करायचे आहे ते करू दे, मला जे करायचे आहे ते मी करेन. ते कायम थोडी मुख्यमंत्री राहणार आहेत, अशाप्रकारे ते कायद्याचा गैरवापर करणार असतील तर आम्ही सुद्धा राजाकरणामध्ये आहोत, असे सांगत गोळवली येथील गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प येथे मी जेवत असतानाच अचानक तिथे डीसीपी आले आणि तुम्हाला अटक करण्यात येत आहे असे मला सांगितले. मी त्यांना नोटीस दाखवा असे म्हटले. तर त्यांच्याकडे नोटीस वगैरे नव्हती. त्यांनी जबरदस्तीने मला अटक करुन इथे संगमेश्वर पोलीस स्थानकामध्ये आणले. त्यानंतर ते एका रुममध्ये गेले आणि दोन तास बाहेर आले नाहीत. मला त्यांचा हेतू चांगला वाटला नाही. माझ्या जीवाला धोका असल्याप्रमाणे त्याच्या हलचाली होत्या. नंतर तिथे अनेक अधिकारी आले, असा घटनाक्रम नारायण राणे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितला.  

टॅग्स :PoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेChitra Waghचित्रा वाघ