शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

Narayan Rane: “सरकार हमसे डरती है… पुलिस को आगे करती है…”; भाजपचा ठाकरे सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 21:50 IST

Narayan Rane: सरकार हमसे डरती है… पुलिस को आगे करती है…, असा टोला लगावण्यात आला आहे.

अहमदनगर: केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी संगमेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. नारायण राणे यांना घेऊन संगमेश्वर पोलीस महाडला रवाना झाले आहेत. नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. दरम्यान, नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी राज्यभरात अनेकविध ठिकाणी आंदोलने, निदर्शने केली. यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी या प्रकरणावर टीका केली असून, सरकार हमसे डरती है… पुलिस को आगे करती है…, असा टोला लगावण्यात आला आहे. (bjp chitra wagh criticised thackeray govt over narayan rane arrest)

अटकेनंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले...

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नारायण राणेंच्या अटकेनंतर राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. त्या अहमदनगरला माध्यमांशी बोलत होत्या. अटक करण्याची आणि गुन्हे दाखल करण्याची तत्परता ही फक्त भाजप नेत्यांसाठी आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. नारायण राणे यांच्या अटेकसाठी तत्परता दाखवणे आणि इतर प्रकरणी तत्परता न दाखवणे हीच तुमची शिवशाही आहे का? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. 

“ठाकरे सरकारचा धिक्कार, सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करु”; भाजपचा शिवसेनेला इशारा

सरकार हमसे डरती है आणि पुलिस को आगे करती है

नारायण राणे यांच्या अटकेसाठी जी तत्परता दाखवली ती तत्परता अन्य प्रकरणाबाबत कुठे गेली आहे. पुणे, औरंगाबाद आणि पारनेरमध्ये ती का नाही दाखवली, कायदे आणि नियम फक्त भाजपसाठी आहे, सत्ताधाऱ्यांना लागू होत नाही का, अशी विचारणा चित्रा वाघ यांनी केली आहे. सरकार हमसे डरती है आणि पुलिस को आगे करती है, असे एक ट्विटही चित्रा वाघ यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक आठवण करुन देत आहे की तमाम हिंदू समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा शर्जिल उस्मानी अजून मोकाट हुंदडतोय, असे एक ट्विटही भाजपकडून करण्यात आले आहे.

“छत्रपती संभाजी महाराजांनाही संगमेश्वरात अटक झाली होती आणि औरंगजेब सरकार संपलं होतं”

दरम्यान, उद्धव ठाकरेंना जे करायचे आहे ते करू दे, मला जे करायचे आहे ते मी करेन. ते कायम थोडी मुख्यमंत्री राहणार आहेत, अशाप्रकारे ते कायद्याचा गैरवापर करणार असतील तर आम्ही सुद्धा राजाकरणामध्ये आहोत, असे सांगत गोळवली येथील गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प येथे मी जेवत असतानाच अचानक तिथे डीसीपी आले आणि तुम्हाला अटक करण्यात येत आहे असे मला सांगितले. मी त्यांना नोटीस दाखवा असे म्हटले. तर त्यांच्याकडे नोटीस वगैरे नव्हती. त्यांनी जबरदस्तीने मला अटक करुन इथे संगमेश्वर पोलीस स्थानकामध्ये आणले. त्यानंतर ते एका रुममध्ये गेले आणि दोन तास बाहेर आले नाहीत. मला त्यांचा हेतू चांगला वाटला नाही. माझ्या जीवाला धोका असल्याप्रमाणे त्याच्या हलचाली होत्या. नंतर तिथे अनेक अधिकारी आले, असा घटनाक्रम नारायण राणे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितला.  

टॅग्स :PoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेChitra Waghचित्रा वाघ