शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Result: बिहारमध्ये महाआघाडीची सत्ता स्थापनेची तयारी; मात्र तेजस्वींना काँग्रेस आमदार फुटण्याची भीती

By प्रविण मरगळे | Updated: November 12, 2020 16:19 IST

Bihar Result, Tejashwi Yadav, Congress, RJD News: मंत्रिमंडळात जीतनराम मांझी, मुकेश सहनी यांच्या पक्षाला किती टक्के वाटा मिळणार? याकडे महाआघाडीचे लक्ष आहे.

ठळक मुद्देनितीश कुमार यांनी विश्वासघातकी सरकार बनवलं आहे. अनेक ठिकाणी मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोपबिहारमध्ये महाआघाडीला ११० जागा मिळाल्या आहेत, त्यात राजदने ७५ जागा जिंकल्या आहेतकाँग्रेसमुळे महाआघाडीचा विजय झाला नाही हे सत्य पक्षाने स्वीकारलं पाहिजं - काँग्रेस नेते तारिक अन्वर

पटणा – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात भलेही एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गुरुवारी पटणा येथे माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्या निवासस्थानी महाआघाडीच्या नेत्यांची बैठक झाली, या बैठकीत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी आमदारांना संबोधित करताना बिहारमध्ये महाआघाडीचं सरकार बनेल असा दावा केल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

याबाबत तेजस्वी यादवांनी आमदारांना सूचना केल्या की, पुढील महिनाभर तुम्ही सगळ्यांनी पटणामध्येच राहा. महाआघाडीतील काँग्रेसचे काही आमदार फुटण्याची भीती तेजस्वी यादव यांना आहे. त्यामुळे तेजस्वी यादव पूर्णपणे सतर्क राहत आहेत. या बैठकीत महाआघाडीचा नेता म्हणून तेजस्वी यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिहारमध्ये राजद पाठोपाठ भाजपाला सर्वाधिक ७४ जागा मिळाल्या आहेत आणि जदयूला ४३ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. यातच भाजपातील काही नेते मुख्यमंत्रिपदाची मागणी करत आहेत, त्यामुळे एनडीएत काही आलबेल नसल्याने महाआघाडीला अद्यापही आशा कायम आहे.

मंत्रिमंडळात जीतनराम मांझी, मुकेश सहनी यांच्या पक्षाला किती टक्के वाटा मिळणार? याकडे महाआघाडीचे लक्ष आहे. त्यामुळे एनडीए जर काही बिनसलं तर महाआघाडी त्याचा फायदा घेत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहे. या बैठकीत तेजस्वी यादव म्हणाले की, जनतेने महाआघाडीला समर्थन दिलं आहे. आपल्याला जवळपास १३० जागा मिळाल्या असत्या. पण नितीश कुमार यांनी विश्वासघातकी सरकार बनवलं आहे. अनेक ठिकाणी मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोप तेजस्वीने केला आहे.

बिहारमध्ये महाआघाडीला ११० जागा मिळाल्या आहेत, त्यात राजदने ७५ जागा जिंकल्या आहेत. राजदकडून सरकारवर उमेदवारांना हरवण्याचा आरोप करण्यात येत आहे. डाव्यांना १६ जागा मिळाल्या असून महाआघाडीतील काँग्रेसच्या कामगिरीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. खुद्द काँग्रेस नेते तारिक अन्वर यांनी काँग्रेसमुळे महाआघाडीचा विजय झाला नाही हे सत्य पक्षाने स्वीकारलं पाहिजं असं म्हटलंय. तर काँग्रेसचा स्ट्राइक रेट खूप कमी राहिला, जर या जागा डावे आणि राजदा मिळाल्या असत्या तर निकाल वेगळा लागला असता अशीही चर्चा बैठकीत झाली. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने ७० जागा लढवून अवघ्या १९ जागांवर विजय मिळवला आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाTejashwi Yadavतेजस्वी यादवcongressकाँग्रेस