शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Bihar Election Result Live: रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरु राहणार; NDA ला धाकधूक अन् महाआघाडीला आशा कायम

By प्रविण मरगळे | Updated: November 10, 2020 14:37 IST

Bihar Election Result Live, BJP, RJD, JDU, Congress News: मतदान केंद्रांची संख्या ६३ टक्क्यांनी जास्त होती, २०१५  मध्ये ३८ ठिकाणी मतदान केंद्रे बांधली गेली होती

ठळक मुद्देसुमारे ४.१० कोटी लोकांनी मतदान केले आहे. आतापर्यंत १ कोटींहून अधिक मतमोजणी झाली आहेमतमोजणी १९ ते ५१ फेऱ्यात होऊ शकतात, हे मतदानाच्या मोजणीवर अवलंबून असेलकाही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी १९ फेऱ्यांमध्ये संपू शकते

नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत, मात्र अद्यापही निकालांच्या आकड्यात काहीही होऊ शकतं अशी स्थिती आहे. बिहारमध्ये एनडीएला १३० जागांची आघाडी मिळाली आहे तर महाआघाडीला १०२ जागांवर आघाडी आहे. यात भाजपाला सर्वाधिक ७४ जागांवर आघाडी मिळाली आहे तर त्यापाठोपाठ ६५ जागांवर तेजस्वी यादव यांच्या राजद पक्षाला आघाडी आहे.

याचवेळी बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, यंदा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल. आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त मतांची मोजणी झाली आहे. यावेळी मतदान केंद्रांची संख्या ६३ टक्क्यांनी जास्त होती, २०१५  मध्ये ३८ ठिकाणी मतदान केंद्रे बांधली गेली होती पण यावेळी ५८ ठिकाणी मतदान केंद्रे होती असं डीईसी चंद्रभूषण यांनी सांगितले.

तर यावेळी सुमारे ४.१० कोटी लोकांनी मतदान केले आहे. आतापर्यंत १ कोटींहून अधिक मतमोजणी झाली आहे. यापूर्वी २५-२६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होत होती, यावेळी किमान ३५ फेऱ्या मतमोजणी होण्याची शक्यता आहे. यामुळे रात्री उशीरापर्यंत मतमोजणी चालू राहू शकते असं बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी एचआर श्रीनिवास यांनी सांगितले आहे.

निवडणूक आयोगाचा अंदाज आहे की, मतमोजणी १९ ते ५१ फेऱ्यात होऊ शकतात, हे मतदानाच्या मोजणीवर अवलंबून असेल. आयोगाने अंदाजे ३५ फेऱ्यांचा अंदाज लावला आहे. काही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी १९ फेऱ्यांमध्ये संपू शकते तर काहींमध्ये ५१ फेऱ्यांपर्यंत मतमोजणी जाऊ शकते. तसेच काँग्रेसने केलेल्या आरोपावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. आयोगाने पुन्हा एकदा ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर भाष्य केले आणि म्हटले की, ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि त्यात छेडछाड करता येणार नाही असा विश्वास निवडणूक आयोगाने व्यक्त केला.

काँग्रेसने घेतली ईव्हीएमवर शंका

महाविकास आघाडी पिछाडीवर पडत असल्याचा कल समोर आल्यानंतर काँग्रेस नेते उदित राज यांनी ट्विट करत ईव्हीएमवर शंका घेतली ते म्हणाले. जर मंगळ ग्रह आणि चंद्रावर जाणाऱ्या उपग्रहाची दिशा पृथ्वीवरून नियंत्रित करता येत असेल तर ईव्हीएम हॅक का करता येणार नाही? अमेरिकेत जर ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान झालं असतं तर ट्रम्प पराभूत झाले असते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बिहारमधील मतमोजणीच्या सध्याच्या कलांमध्ये एनडीए १३० जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडी ही १०० ते १०५ जागांवर आघाडीवर आहे. पक्षवार विचार केल्यास निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपा ७२, जनता दल युनायटेड ४८, राष्ट्रीय जनता दल ६५, काँग्रेस २१ आणि लोकजनशक्ती पार्टी २ जागांवर आघाडीवर आहे. तर डावे पक्ष १९ जागांवर आघाडीवर आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादवElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग