शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

Bihar Election Result Live: रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरु राहणार; NDA ला धाकधूक अन् महाआघाडीला आशा कायम

By प्रविण मरगळे | Updated: November 10, 2020 14:37 IST

Bihar Election Result Live, BJP, RJD, JDU, Congress News: मतदान केंद्रांची संख्या ६३ टक्क्यांनी जास्त होती, २०१५  मध्ये ३८ ठिकाणी मतदान केंद्रे बांधली गेली होती

ठळक मुद्देसुमारे ४.१० कोटी लोकांनी मतदान केले आहे. आतापर्यंत १ कोटींहून अधिक मतमोजणी झाली आहेमतमोजणी १९ ते ५१ फेऱ्यात होऊ शकतात, हे मतदानाच्या मोजणीवर अवलंबून असेलकाही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी १९ फेऱ्यांमध्ये संपू शकते

नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत, मात्र अद्यापही निकालांच्या आकड्यात काहीही होऊ शकतं अशी स्थिती आहे. बिहारमध्ये एनडीएला १३० जागांची आघाडी मिळाली आहे तर महाआघाडीला १०२ जागांवर आघाडी आहे. यात भाजपाला सर्वाधिक ७४ जागांवर आघाडी मिळाली आहे तर त्यापाठोपाठ ६५ जागांवर तेजस्वी यादव यांच्या राजद पक्षाला आघाडी आहे.

याचवेळी बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, यंदा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल. आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त मतांची मोजणी झाली आहे. यावेळी मतदान केंद्रांची संख्या ६३ टक्क्यांनी जास्त होती, २०१५  मध्ये ३८ ठिकाणी मतदान केंद्रे बांधली गेली होती पण यावेळी ५८ ठिकाणी मतदान केंद्रे होती असं डीईसी चंद्रभूषण यांनी सांगितले.

तर यावेळी सुमारे ४.१० कोटी लोकांनी मतदान केले आहे. आतापर्यंत १ कोटींहून अधिक मतमोजणी झाली आहे. यापूर्वी २५-२६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होत होती, यावेळी किमान ३५ फेऱ्या मतमोजणी होण्याची शक्यता आहे. यामुळे रात्री उशीरापर्यंत मतमोजणी चालू राहू शकते असं बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी एचआर श्रीनिवास यांनी सांगितले आहे.

निवडणूक आयोगाचा अंदाज आहे की, मतमोजणी १९ ते ५१ फेऱ्यात होऊ शकतात, हे मतदानाच्या मोजणीवर अवलंबून असेल. आयोगाने अंदाजे ३५ फेऱ्यांचा अंदाज लावला आहे. काही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी १९ फेऱ्यांमध्ये संपू शकते तर काहींमध्ये ५१ फेऱ्यांपर्यंत मतमोजणी जाऊ शकते. तसेच काँग्रेसने केलेल्या आरोपावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. आयोगाने पुन्हा एकदा ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर भाष्य केले आणि म्हटले की, ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि त्यात छेडछाड करता येणार नाही असा विश्वास निवडणूक आयोगाने व्यक्त केला.

काँग्रेसने घेतली ईव्हीएमवर शंका

महाविकास आघाडी पिछाडीवर पडत असल्याचा कल समोर आल्यानंतर काँग्रेस नेते उदित राज यांनी ट्विट करत ईव्हीएमवर शंका घेतली ते म्हणाले. जर मंगळ ग्रह आणि चंद्रावर जाणाऱ्या उपग्रहाची दिशा पृथ्वीवरून नियंत्रित करता येत असेल तर ईव्हीएम हॅक का करता येणार नाही? अमेरिकेत जर ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान झालं असतं तर ट्रम्प पराभूत झाले असते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बिहारमधील मतमोजणीच्या सध्याच्या कलांमध्ये एनडीए १३० जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडी ही १०० ते १०५ जागांवर आघाडीवर आहे. पक्षवार विचार केल्यास निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपा ७२, जनता दल युनायटेड ४८, राष्ट्रीय जनता दल ६५, काँग्रेस २१ आणि लोकजनशक्ती पार्टी २ जागांवर आघाडीवर आहे. तर डावे पक्ष १९ जागांवर आघाडीवर आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादवElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग