शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

Bihar Election Result Live: रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरु राहणार; NDA ला धाकधूक अन् महाआघाडीला आशा कायम

By प्रविण मरगळे | Updated: November 10, 2020 14:37 IST

Bihar Election Result Live, BJP, RJD, JDU, Congress News: मतदान केंद्रांची संख्या ६३ टक्क्यांनी जास्त होती, २०१५  मध्ये ३८ ठिकाणी मतदान केंद्रे बांधली गेली होती

ठळक मुद्देसुमारे ४.१० कोटी लोकांनी मतदान केले आहे. आतापर्यंत १ कोटींहून अधिक मतमोजणी झाली आहेमतमोजणी १९ ते ५१ फेऱ्यात होऊ शकतात, हे मतदानाच्या मोजणीवर अवलंबून असेलकाही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी १९ फेऱ्यांमध्ये संपू शकते

नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत, मात्र अद्यापही निकालांच्या आकड्यात काहीही होऊ शकतं अशी स्थिती आहे. बिहारमध्ये एनडीएला १३० जागांची आघाडी मिळाली आहे तर महाआघाडीला १०२ जागांवर आघाडी आहे. यात भाजपाला सर्वाधिक ७४ जागांवर आघाडी मिळाली आहे तर त्यापाठोपाठ ६५ जागांवर तेजस्वी यादव यांच्या राजद पक्षाला आघाडी आहे.

याचवेळी बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, यंदा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल. आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त मतांची मोजणी झाली आहे. यावेळी मतदान केंद्रांची संख्या ६३ टक्क्यांनी जास्त होती, २०१५  मध्ये ३८ ठिकाणी मतदान केंद्रे बांधली गेली होती पण यावेळी ५८ ठिकाणी मतदान केंद्रे होती असं डीईसी चंद्रभूषण यांनी सांगितले.

तर यावेळी सुमारे ४.१० कोटी लोकांनी मतदान केले आहे. आतापर्यंत १ कोटींहून अधिक मतमोजणी झाली आहे. यापूर्वी २५-२६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होत होती, यावेळी किमान ३५ फेऱ्या मतमोजणी होण्याची शक्यता आहे. यामुळे रात्री उशीरापर्यंत मतमोजणी चालू राहू शकते असं बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी एचआर श्रीनिवास यांनी सांगितले आहे.

निवडणूक आयोगाचा अंदाज आहे की, मतमोजणी १९ ते ५१ फेऱ्यात होऊ शकतात, हे मतदानाच्या मोजणीवर अवलंबून असेल. आयोगाने अंदाजे ३५ फेऱ्यांचा अंदाज लावला आहे. काही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी १९ फेऱ्यांमध्ये संपू शकते तर काहींमध्ये ५१ फेऱ्यांपर्यंत मतमोजणी जाऊ शकते. तसेच काँग्रेसने केलेल्या आरोपावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. आयोगाने पुन्हा एकदा ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर भाष्य केले आणि म्हटले की, ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि त्यात छेडछाड करता येणार नाही असा विश्वास निवडणूक आयोगाने व्यक्त केला.

काँग्रेसने घेतली ईव्हीएमवर शंका

महाविकास आघाडी पिछाडीवर पडत असल्याचा कल समोर आल्यानंतर काँग्रेस नेते उदित राज यांनी ट्विट करत ईव्हीएमवर शंका घेतली ते म्हणाले. जर मंगळ ग्रह आणि चंद्रावर जाणाऱ्या उपग्रहाची दिशा पृथ्वीवरून नियंत्रित करता येत असेल तर ईव्हीएम हॅक का करता येणार नाही? अमेरिकेत जर ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान झालं असतं तर ट्रम्प पराभूत झाले असते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बिहारमधील मतमोजणीच्या सध्याच्या कलांमध्ये एनडीए १३० जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडी ही १०० ते १०५ जागांवर आघाडीवर आहे. पक्षवार विचार केल्यास निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपा ७२, जनता दल युनायटेड ४८, राष्ट्रीय जनता दल ६५, काँग्रेस २१ आणि लोकजनशक्ती पार्टी २ जागांवर आघाडीवर आहे. तर डावे पक्ष १९ जागांवर आघाडीवर आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादवElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग