शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

Bihar Election 2020 : "भाजपा-आरएसएसचे काम हे द्वेष पसरवणं आणि फूट पाडण्याचं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 09:43 IST

Bihar Election 2020 And Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - बिहारमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी किशनगंजमध्ये जाहीर सभा घेतली. राहुल यांनी यावेळी केंद्रातील मोदी सरकार आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांनी एकत्र बिहारची लूट सुरू केली आहे. बिहारमधील शेतकरी, कामगार, छोट्या दुकानदारांना संपवलं आहे. यामुळे बिहारच्या तरुणांनी आणि शेतकऱ्यांनी आता महाआघाडीला विजयी करून बिहारमध्ये सत्ता बदलाचं काम करावं आहे" असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे. 

"छत्तीसगडमधील सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करते आणि बिहार सरकार शेतकर्‍यांचे पैसे लाटते. पंतप्रधान मोदींनी एक नवीन कृषी कायदे केले. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. हे कायदे मोदींनी त्यांच्या काही मित्रांसाठी केले आहेत. अंबानी आणि अदानी यांच्याशी शेतकरी व्यवहार करू शकतील का? एक गुजरातमध्ये, एक मुंबईत आणि तुम्ही बिहारमध्ये. छत्तीसगडप्रमाणे बिहारमधील शेतकऱ्यांनाही थेट खात्यात 2500 रुपये मिळावेत, असा आमचा विचार आहे" असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

"भाजपा-आरएसएसचे काम हे द्वेष पसरवणं आणि फूट पाडण्याचं"

राहुल गांधी यांनी "पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शेतकरी आणि गरिबांवर सर्वाधिक हल्ला केला आहे. भाजपा-आरएसएसचे काम हे द्वेष पसरवणं आणि फूट पाडण्याचं आहे. भाजपाचा बी-टीम सतत द्वेष पसरवत आहे. यामुळे आम्ही भाजपाच्या ए आणि बी या दोन्ही टीमशी लढत आहोत" असं म्हटलं आहे. नितीश कुमार यांनी तरुणांना नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण तरुणांनी त्यांना नोकरीबद्दल विचारल्यावर ते शिवीगाळ करतात. रोजगार उपलब्ध करण्यात अपयशी ठरलो असं नितीश कुमार यांनी म्हटलं पाहिजे. देशात ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे तिथे शेतकरी, गरीब आणि रोजगार निर्मितीसाठी काम केलं जातं असंही ते म्हणाले. 

"जेव्हा तुम्हाला त्यांची गरज होती तेव्हा ते कुठे होते? "

"लॉकडाऊन दरम्यान तुम्ही अन्न-पाण्यावाचून रस्त्यावरून चालत आपल्या गावी निघाला होतात. त्यावेळी नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांनी तुम्हाला मदत केली नाही. काँग्रेस पक्षाने मजूर आणि कामगारांना आपल्या घरी पाठवण्याची व्यवस्था केली. आणि आता ते तुमच्याकडे मत मागत आहेत. त्यांना कोणतीही लाज वाटत नाही. जेव्हा तुम्हाला त्यांची गरज होती तेव्हा ते कुठे होते? त्यावेळी ते भारतातील श्रीमंतांचे कर माफ करत होते" असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहारElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाcongressकाँग्रेस