शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेचा विसर, 'कमळा'चे चिन्ह असलेले मास्क परिधान करून भाजपा उमेदवार पोहोचले मतदान केंद्रावर!

By ravalnath.patil | Updated: October 28, 2020 14:14 IST

bihar elections : कमळ चिन्ह असलेले मास्क परिधान केल्यामुळे प्रेम कुमार यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

ठळक मुद्देप्रेम कुमार यांनी परिधान केलेल्या मास्कवर भाजपाचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाचे चित्र होते. तेच मास्क परिधान करून प्रेम कुमार मतदान केंद्रावर पोहोचले होते.

पटना : बिहारमधील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील ७१ जागांसाठी आज बिहारमधील लोक आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. या टप्प्यात अनेक बड्या मंत्र्यांचे आणि नेत्यांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे. दरम्यान, भाजपाचे उमेदवार आणि नितीश सरकारमधील मंत्री. डॉ प्रेम कुमार आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाच्या चित्राचा मास्क परिधान करत मतदान केंद्रावर दाखल झाले. यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

भाजपाचे उमेदवार प्रेम कुमार यांच्या गया शहर मतदारसंघातही आज मतदान होत आहे. प्रेम कुमार सकाळी मतदान करण्यासाठी देण्यासाठी बाहेर गेले. प्रेम कुमार हे ज्येष्ठ नेते आहेत, परंतु ते मतदान करण्यासाठी सायकलवरून मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी प्रेम कुमार यांनी परिधान केलेल्या मास्कवर भाजपाचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाचे चित्र होते. तेच मास्क परिधान करून प्रेम कुमार मतदान केंद्रावर पोहोचले होते.

कमळ चिन्ह असलेले मास्क परिधान केल्यामुळे प्रेम कुमार यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर प्रेम कुमार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, "मास्क परिधान करणे आवश्यक असल्यामुळे वापरले. ज्या मास्कचा आम्ही वापर करत होतो, त्याचाच वापर इथेही झाला. मतदान केंद्राच्या ठिकाणी दुसऱ्या मास्कची व्यवस्था नव्हती. त्यामुळे माझ्याजवळ जे मास्क होते, तेच वापरून मी गेलो. मी काही हे जाणून बुजून केले नाही. फक्त सुरक्षेच्या कारणास्तव हे मास्क परिधान केले होते"

दरम्यान, कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर निवडणूक आयोगाने दिशानिर्देश आधीच जारी केलेले आहेत. या निर्देशानुसार, कोरोना क्वारंटाईन मतदारांना शेवटच्या तासात मतदानाची सुविधा दिली जाईल. तसेच मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्हज यांचा वापर करणे आवश्यक असेल. मतदानासाठी एक तासाची वेळ वाढवून देण्यात आली आहे.  ७.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. या निवडणुकीसाठी ७ लाख हँड सॅनिटायझर, ४६ लाख हून अधिक मास्क, ६ लाक पीपीई कीटस, ७.६ लाख बोडशीट, २३ लाख हँड ग्लोव्ह्ज यांची तयारी करण्यात आली आहे.

तीन टप्प्यात मतदान होणारबिहार विधानसभा निवडणूक २०२० साठी होणाऱ्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात १६ जिल्ह्यातील ७१ मतदारसंघात मतदान समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात १७ जिल्ह्यातील ९४ मतदारसंघांचा तर तिसऱ्या टप्प्यात १५ जिल्ह्यातील ७८ मतदारसंघांचा समावेश आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी अनुक्रमे १९ ऑक्टोबर आणि ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर होईल.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपा