शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

नारायण राणेंनी शपथ घेताच आमच्यासाठी मोठा दिवस म्हणत राणेपुत्रांची पहिली प्रतिक्रिया, शिवसेनेबाबत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 19:13 IST

Narayan Rane News: नारायण राणेंचा शपथविधी झाल्यानंतर त्यांचे पुत्र निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नवी दिल्ली - अनेक बड्या मंत्र्यांचा राजीनामा, काही मंत्र्यांचा खांदेपाटल आणि तब्बल ४३ मंत्र्यांचा शपथविधी यामुळे दिल्लीत सुरू असलेल्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच महाराष्ट्रामधून माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे शपथ घेत असल्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांचेही या शपथविधीकडे लक्ष होते. दरम्यान, नारायण राणेंचा (Narayan Rane) शपथविधी झाल्यानंतर त्यांचे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राणे कुटुंबीयांसाठी आजचा दिवस मोठा आणि सुवर्णक्षण आहे, अशी प्रतिक्रिया निलेश आणि नितेश राणे यांनी दिली आहे. तसेच नारायण राणेंवर सोपवलेल्या केंद्रीय मंत्रिपदाच्या जबाबदारीसाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा आणि भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले आहेत. (This is big day for us, Nilesh and Nitesh Rane reacted as soon as Narayan Rane took oath)

नारायण राणे यांच्या शपथविधीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निलेश राणे म्हणाले की, हा राणे कुटुंबीयांसाठी मोठा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे, त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो. एखादी जबाबदारी सोपवल्यावर नारायण राणे हे ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी १०० टक्के प्रयत्न करतात. ही जबाबदारीही ते उत्तमपणे पार पाडतील.

नारायण राणे यांना अचानक केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे. त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही बाळासाहेब ठाकरे यांनी अचानकपणे सोपवली होती. मात्र अजूनही अधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाची आठवण काढतात. आताही तसंच होईल. ते जबाबदारी चोखपणे बजावतील. मंत्रिपद ही जबाबदारी आहे, असे निलेश राणे म्हणाले. यावेळी निलेश राणे  यांना प्रसारमाध्यमांनी शिवसेनेबाबत नाव न घेता विचारले असता ते म्हणाले की, तुम्ही ज्यांना आमचा शत्रू म्हणून सांगत आहात त्यांना आम्ही किंमत देत नाही. नारायण राणेंचा नगरसेवकापासून केंद्रीय मंत्र्यापर्यंतचा प्रवास सोपा नाही आहे. आता जे मिळेल त्यावर आम्ही समाधानी आहोत.

तर नितेश राणे म्हणाले की, नारायण राणेंचा शपथविधी हा राणे कुटुंबीयांसाठी सुवर्णक्षण आहे. तसेच भाजपाचा कार्यकर्ता म्हणूनही हा महत्त्वाचा क्षण आहे. नारायण राणेंची प्रशासनावरील पकड चांगली आहे. तसेच राज्यभरात कार्यकर्त्यांचे जाळे आहे. त्यामुळे भाजपाला पुढील प्रत्येक निवडणूकीत १ नंबरचा पक्ष ठेवण्यासाठी प्रयत्न करतील. राणेंच्या मंत्रिपदाचा संघटन म्हणून पक्षाला फायदा होईल. नारायण राणेंबाबत जे काँग्रेसला १२ वर्षांत कळलं नाही. ते भाजपाला कळलं. कार्यकर्त्यांची जाणीव असलेला भाजपा हा पक्ष आहे. त्याचा भाजपाला फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असेही नितेश राणे यांनी सांगितले.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Nilesh Raneनिलेश राणे Nitesh Raneनीतेश राणे BJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण