शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

...तर मी विधानसभेचे अध्यक्षपद आनंदाने स्वीकारेन; भास्कर जाधवांची रोखठोक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 18:32 IST

Bhaskar Jadhav Politics Ratnagiri : जर तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सन्मानाने अध्यक्षपद शिवसेनेला दिले आणि ती जबाबदारी माझ्याकडे आली तर मी आनंदाने स्वीकारेन, अशी स्पष्ट आणि रोखठोक शब्दात आमदार भास्कर जाधव यांनी आपली भूमिका व्यक्त केली.

ठळक मुद्देमंत्रीपदाचा बळी देऊन अध्यक्षपद नकोईडी-फिडीला मी भीक घालत नाही

चिपळूण : विधानसभा अध्यक्ष पदाबद्दल काही चर्चा माझ्या कानावर येत आहेत. पण माझी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विनंती आहे की, मंत्रिपदाचा बळी देऊन विधानसभेचे अध्यक्षपद नको. जर तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सन्मानाने अध्यक्षपद शिवसेनेला दिले आणि ती जबाबदारी माझ्याकडे आली तर मी आनंदाने स्वीकारेन, अशी स्पष्ट आणि रोखठोक शब्दात आमदार भास्कर जाधव यांनी आपली भूमिका व्यक्त केली. बाकी भाजपच्या ईडी-फिडीला मी भीकदेखील घालत नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपलाही थेट सुनावले.विधानसभेचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन तालिका अध्यक्ष म्हणून गाजवल्यानंतर आमदार जाधव हे शुक्रवारी चिपळूणमध्ये आले. यावेळी शिवसैनिकांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. मोठ्या संख्येने शिवसैनिक त्यांच्या कार्यालयात जमा झाले होते.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले गेले की, कित्येक वर्षाची इच्छा होती की एक दिवस तरी अध्यक्ष पदावर बसावे आणि नियमाप्रमाणे कामकाज करून दाखवावे. ही इच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केली. त्याबद्दल आपण त्यांचे आभारी असल्याचे ते म्हणाले.मुळात मी अध्यक्ष पदावर बसावे आणि भाजपचे १२ आमदार निलंबित करावे असे काहीच नव्हते. मला त्याठिकाणी बसून पूर्ण नियमप्रमाणे सभागृहाचे कामकाज करून सभागृहाची शिस्त आणि परंपरा राखायची होती. परंतु भाजपचे आमदार आणि विशेष करून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीच ते सर्व घडवून आणले. स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. भाजपने स्वतः ओढवून घेतलेले ते संकट होते, असेही ते म्हणाले.

आमदारांचे निलंबन हे कधीही ठरवून केले जात नाही. त्यावेळच्या परिस्थितीनुसार ते निर्णय घेतले जातात. १२ आमदारच निलंबित का ? हा एक वेगळा मुद्दा आता उपस्थित केला जात आहे. पण त्यावेळी ज्या आमदारांनी गैरवर्तन केले, त्यामध्ये १२ आमदारच दिसून आले. जर जास्त सापडले असते, तर आणखी आमदार निलंबित झाले असते.एखादे मंत्रिपद सोडून त्याऐवजी शिवसेनेला अध्यक्षपद मिळणार असेल तर ते आपल्याला नको आहे. मंत्रिपदाचा बळी देऊन अध्यक्षपद नको, अशी आपली स्पष्ट भूमिका असल्याचेही ते म्हणाले.ईडी-फिडीला भीक घालत नाहीभाजपला थेट अंगावर घेतल्यानंतर आता ईडी किंवा आणि यंत्रणेकडून चौकशीची भीती वाटते का? या प्रश्नावर संतप्तपणे आमदार जाधव म्हणाले की, मी अशा ईडी-फिडीला भीक घालत नाही. माझा मी खमका आहे. अशी किती आव्हाने मी अंगावर घेतली आणि झेपवली आहेत. कोणाला वाटत असेल भास्कर जाधव घाबरले तर तो त्यांचा भ्रम आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपला थेट सुनावले. 

टॅग्स :PoliticsराजकारणBhaskar Jadhavभास्कर जाधवRatnagiriरत्नागिरीChiplunचिपळुण