शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

...तर मी विधानसभेचे अध्यक्षपद आनंदाने स्वीकारेन; भास्कर जाधवांची रोखठोक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 18:32 IST

Bhaskar Jadhav Politics Ratnagiri : जर तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सन्मानाने अध्यक्षपद शिवसेनेला दिले आणि ती जबाबदारी माझ्याकडे आली तर मी आनंदाने स्वीकारेन, अशी स्पष्ट आणि रोखठोक शब्दात आमदार भास्कर जाधव यांनी आपली भूमिका व्यक्त केली.

ठळक मुद्देमंत्रीपदाचा बळी देऊन अध्यक्षपद नकोईडी-फिडीला मी भीक घालत नाही

चिपळूण : विधानसभा अध्यक्ष पदाबद्दल काही चर्चा माझ्या कानावर येत आहेत. पण माझी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विनंती आहे की, मंत्रिपदाचा बळी देऊन विधानसभेचे अध्यक्षपद नको. जर तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सन्मानाने अध्यक्षपद शिवसेनेला दिले आणि ती जबाबदारी माझ्याकडे आली तर मी आनंदाने स्वीकारेन, अशी स्पष्ट आणि रोखठोक शब्दात आमदार भास्कर जाधव यांनी आपली भूमिका व्यक्त केली. बाकी भाजपच्या ईडी-फिडीला मी भीकदेखील घालत नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपलाही थेट सुनावले.विधानसभेचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन तालिका अध्यक्ष म्हणून गाजवल्यानंतर आमदार जाधव हे शुक्रवारी चिपळूणमध्ये आले. यावेळी शिवसैनिकांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. मोठ्या संख्येने शिवसैनिक त्यांच्या कार्यालयात जमा झाले होते.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले गेले की, कित्येक वर्षाची इच्छा होती की एक दिवस तरी अध्यक्ष पदावर बसावे आणि नियमाप्रमाणे कामकाज करून दाखवावे. ही इच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केली. त्याबद्दल आपण त्यांचे आभारी असल्याचे ते म्हणाले.मुळात मी अध्यक्ष पदावर बसावे आणि भाजपचे १२ आमदार निलंबित करावे असे काहीच नव्हते. मला त्याठिकाणी बसून पूर्ण नियमप्रमाणे सभागृहाचे कामकाज करून सभागृहाची शिस्त आणि परंपरा राखायची होती. परंतु भाजपचे आमदार आणि विशेष करून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीच ते सर्व घडवून आणले. स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. भाजपने स्वतः ओढवून घेतलेले ते संकट होते, असेही ते म्हणाले.

आमदारांचे निलंबन हे कधीही ठरवून केले जात नाही. त्यावेळच्या परिस्थितीनुसार ते निर्णय घेतले जातात. १२ आमदारच निलंबित का ? हा एक वेगळा मुद्दा आता उपस्थित केला जात आहे. पण त्यावेळी ज्या आमदारांनी गैरवर्तन केले, त्यामध्ये १२ आमदारच दिसून आले. जर जास्त सापडले असते, तर आणखी आमदार निलंबित झाले असते.एखादे मंत्रिपद सोडून त्याऐवजी शिवसेनेला अध्यक्षपद मिळणार असेल तर ते आपल्याला नको आहे. मंत्रिपदाचा बळी देऊन अध्यक्षपद नको, अशी आपली स्पष्ट भूमिका असल्याचेही ते म्हणाले.ईडी-फिडीला भीक घालत नाहीभाजपला थेट अंगावर घेतल्यानंतर आता ईडी किंवा आणि यंत्रणेकडून चौकशीची भीती वाटते का? या प्रश्नावर संतप्तपणे आमदार जाधव म्हणाले की, मी अशा ईडी-फिडीला भीक घालत नाही. माझा मी खमका आहे. अशी किती आव्हाने मी अंगावर घेतली आणि झेपवली आहेत. कोणाला वाटत असेल भास्कर जाधव घाबरले तर तो त्यांचा भ्रम आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपला थेट सुनावले. 

टॅग्स :PoliticsराजकारणBhaskar Jadhavभास्कर जाधवRatnagiriरत्नागिरीChiplunचिपळुण