शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

बैलगाडीवरून पडल्याने खिल्ली उडवणाऱ्या भाजपा नेत्यांना भाई जगताप यांनी दिलं खरमरीत उत्तर, म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 23:41 IST

Bhai Jagtap gave a harsh answer to the BJP: आंदोलन करत असताना बैलगाडी मोडून सर्व नेते खाली पडल्याने विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी दिवसभर शेलक्या शब्दात या आंदोलनाची खिल्ली उडवली. मात्र अखेरीस भाई जगताप यांनी भाजपाच्या नेत्यांना खरमरीत शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई - इंधन दरवाढीविरोधात आज काँग्रेसने राज्याच्या विविध भागांत आंदोलन केले. मात्र मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांनी केलेले आंदोलन एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले. मुंबईमध्ये मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अनेक नेते दरवाढी विरोधात आंदोलन करत असताना बैलगाडी मोडून सर्व नेते खाली पडल्याने विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी दिवसभर शेलक्या शब्दात या आंदोलनाची खिल्ली उडवली. मात्र अखेरीस भाई जगताप यांनी भाजपाच्या नेत्यांना खरमरीत शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. (Bhai Jagtap gave a harsh answer to the BJP leaders who mocked him for falling from a bullock cart)

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या आंदोलनात बैलगाडी मोडल्याने हसणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना भाई जगताप यांनी ट्विटरवरून खडेबोल सुनावले. या ट्विटमध्ये भाई जगताप म्हणतात की, माझ्या पडण्याच्या व्हिडिओसाठी उत्सुक असलेले भाजपाचे सर्व नेते जर देशाची अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्यसेवा यासाठी तितकेच उत्सुक असते, तर आज देशाची अशी स्थिती झाली नसती, असा टोला भाई जगताप यांनी लगावला आहे.

दरम्यान, इंधन दरवाढीविरोधात आज मुंबई काँग्रेसचं आंदोलन सुरू होतं. मोदी सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि अन्य नेते बैलगाडीवरून आंदोलनात सहभागी झाले होते. बैलगाडीवर जास्त नेते झाल्यानं ती कोसळली आणि भाई जगताप यांच्यासह सगळे नेते खाली कोसळले.

या घटनेच्या व्हिडीओवरून राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला होता. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्ही काँग्रेसच्या आंदोलनाचा व्हिडीओ लक्षपूर्वक ऐकला तर लक्षात येईल की, आंदोलनादरम्यान, नेते देश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो, अशा घोषणा देत होते. कदाचित राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांनाही आवडलेलं नसावं, त्यामुळे ती बैलगाडी मोडली, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी त्या व्हिडिओवरून काँग्रेसला लगावला होता.

तर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला होता. तोल सांभाळा भाई जगताप. महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळलात तसे राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावे याचा आधीच विचार करा, असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले होते.  

टॅग्स :bhai jagtapअशोक जगतापcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण