शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

"निवडणूक आयोग निवडणूक घेण्यासाठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाट पाहतंय का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 10:11 IST

Bengal Bypolls Trinamool Criticizes Election Commission For Delay : तृणमूल काँग्रेसचे नेते सुखेंदू शेखर रे यांनी निवडणूक आयोगाला सवाल विचारत निशाणा साधला आहे.

कोलकाता - तृणमूल काँग्रेसने (TMC) पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या 7 जागांच्या निवडणुका आणि पोटनिवडणुका घेण्यात दिरंगाई होत असल्यावरून आपली नाराजी आता व्यक्त केली आहे. तृणमूल काँग्रेसचे एक शिष्टमंडळ गुरुवारी निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदावर कायम राहण्यासाठी ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांना पोटनिवडणूक लढणं अत्यंत गरजेचं आहे. यावरून तृणमूल काँग्रेसचे नेते सुखेंदू शेखर रे यांनी निवडणूक आयोगाला सवाल विचारत निशाणा साधला आहे. निवडणूक आयोग निवडणूक घेण्यासाठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाट पाहतंय का? असा प्रश्न सुखेंदू यांनी विचारला आहे. 

सुखेंदू शेखर रे यांनी देशातील कोरोनाचा संसर्ग हा सध्या बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. परिस्थिती निवडणुका घेण्यासाठी अनुकूल आहे. राज्यातील पाच रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. तसंच उमेदवारांच्या निधनामुळे दोन जागांवरील मतदान रद्द करण्यात आले आहे. अशा एकूण सात जागांवर पोटनिवडणूक होणं अपेक्षित आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदारसंघात पराभव झाला. भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला होता. 

"निवडणूक आयोग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाट पाहतंय का?"

ममता बॅनर्जी यांच्यासाठी अशा परिस्थितीत पोटनिवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचं म्हटलं आहे. निवडणूक आयोग पोटनिवडणुका घेण्यास दिरंगाई करत आहे. निवडणूक आयोग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाट पाहतंय का? आयोगाने लवकरात लवकर पोटनिवडणुका घ्याव्यात, अशी मागणी सुखेंदू शेखर रे यांनी केली आहे. दिनहाटा आणि शांतीपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेले भाजपा नेते निशीथ प्रामाणिक आणि जगन्नाथ सरकार यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी त्यांची खासदारकी कायम ठेवली आहे.

...म्हणून ममता बॅनर्जींनी पोटनिवडणूक लढणं अत्यंत गरजेचं 

मुर्शिदाबादमधील शमशेरगंज आणि जंगीपूरमधील दोन उमेदवारांच्या निधनामुळे दोन जागांवरील मतदान रद्द करण्यात आले आणि त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निवडणुका अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अर्थमंत्री अमित मित्रा हे दोघं विधानसभेचे सदस्य म्हणजेच आमदार नाहीत. मित्रा यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण ममता बॅनर्जींना मात्र विधानसभेत जाण्यासाठी पोटनिवडणूक जिंकणं गरजेचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीIndiaभारतwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकcorona virusकोरोना वायरस बातम्याTrinamool Congressतृणमूल काँग्रेस