शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

"निवडणूक आयोग निवडणूक घेण्यासाठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाट पाहतंय का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 10:11 IST

Bengal Bypolls Trinamool Criticizes Election Commission For Delay : तृणमूल काँग्रेसचे नेते सुखेंदू शेखर रे यांनी निवडणूक आयोगाला सवाल विचारत निशाणा साधला आहे.

कोलकाता - तृणमूल काँग्रेसने (TMC) पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या 7 जागांच्या निवडणुका आणि पोटनिवडणुका घेण्यात दिरंगाई होत असल्यावरून आपली नाराजी आता व्यक्त केली आहे. तृणमूल काँग्रेसचे एक शिष्टमंडळ गुरुवारी निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदावर कायम राहण्यासाठी ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांना पोटनिवडणूक लढणं अत्यंत गरजेचं आहे. यावरून तृणमूल काँग्रेसचे नेते सुखेंदू शेखर रे यांनी निवडणूक आयोगाला सवाल विचारत निशाणा साधला आहे. निवडणूक आयोग निवडणूक घेण्यासाठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाट पाहतंय का? असा प्रश्न सुखेंदू यांनी विचारला आहे. 

सुखेंदू शेखर रे यांनी देशातील कोरोनाचा संसर्ग हा सध्या बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. परिस्थिती निवडणुका घेण्यासाठी अनुकूल आहे. राज्यातील पाच रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. तसंच उमेदवारांच्या निधनामुळे दोन जागांवरील मतदान रद्द करण्यात आले आहे. अशा एकूण सात जागांवर पोटनिवडणूक होणं अपेक्षित आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदारसंघात पराभव झाला. भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला होता. 

"निवडणूक आयोग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाट पाहतंय का?"

ममता बॅनर्जी यांच्यासाठी अशा परिस्थितीत पोटनिवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचं म्हटलं आहे. निवडणूक आयोग पोटनिवडणुका घेण्यास दिरंगाई करत आहे. निवडणूक आयोग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाट पाहतंय का? आयोगाने लवकरात लवकर पोटनिवडणुका घ्याव्यात, अशी मागणी सुखेंदू शेखर रे यांनी केली आहे. दिनहाटा आणि शांतीपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेले भाजपा नेते निशीथ प्रामाणिक आणि जगन्नाथ सरकार यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी त्यांची खासदारकी कायम ठेवली आहे.

...म्हणून ममता बॅनर्जींनी पोटनिवडणूक लढणं अत्यंत गरजेचं 

मुर्शिदाबादमधील शमशेरगंज आणि जंगीपूरमधील दोन उमेदवारांच्या निधनामुळे दोन जागांवरील मतदान रद्द करण्यात आले आणि त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निवडणुका अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अर्थमंत्री अमित मित्रा हे दोघं विधानसभेचे सदस्य म्हणजेच आमदार नाहीत. मित्रा यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण ममता बॅनर्जींना मात्र विधानसभेत जाण्यासाठी पोटनिवडणूक जिंकणं गरजेचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीIndiaभारतwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकcorona virusकोरोना वायरस बातम्याTrinamool Congressतृणमूल काँग्रेस