शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

"निवडणूक आयोग निवडणूक घेण्यासाठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाट पाहतंय का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 10:11 IST

Bengal Bypolls Trinamool Criticizes Election Commission For Delay : तृणमूल काँग्रेसचे नेते सुखेंदू शेखर रे यांनी निवडणूक आयोगाला सवाल विचारत निशाणा साधला आहे.

कोलकाता - तृणमूल काँग्रेसने (TMC) पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या 7 जागांच्या निवडणुका आणि पोटनिवडणुका घेण्यात दिरंगाई होत असल्यावरून आपली नाराजी आता व्यक्त केली आहे. तृणमूल काँग्रेसचे एक शिष्टमंडळ गुरुवारी निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदावर कायम राहण्यासाठी ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांना पोटनिवडणूक लढणं अत्यंत गरजेचं आहे. यावरून तृणमूल काँग्रेसचे नेते सुखेंदू शेखर रे यांनी निवडणूक आयोगाला सवाल विचारत निशाणा साधला आहे. निवडणूक आयोग निवडणूक घेण्यासाठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाट पाहतंय का? असा प्रश्न सुखेंदू यांनी विचारला आहे. 

सुखेंदू शेखर रे यांनी देशातील कोरोनाचा संसर्ग हा सध्या बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. परिस्थिती निवडणुका घेण्यासाठी अनुकूल आहे. राज्यातील पाच रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. तसंच उमेदवारांच्या निधनामुळे दोन जागांवरील मतदान रद्द करण्यात आले आहे. अशा एकूण सात जागांवर पोटनिवडणूक होणं अपेक्षित आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदारसंघात पराभव झाला. भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला होता. 

"निवडणूक आयोग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाट पाहतंय का?"

ममता बॅनर्जी यांच्यासाठी अशा परिस्थितीत पोटनिवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचं म्हटलं आहे. निवडणूक आयोग पोटनिवडणुका घेण्यास दिरंगाई करत आहे. निवडणूक आयोग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाट पाहतंय का? आयोगाने लवकरात लवकर पोटनिवडणुका घ्याव्यात, अशी मागणी सुखेंदू शेखर रे यांनी केली आहे. दिनहाटा आणि शांतीपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेले भाजपा नेते निशीथ प्रामाणिक आणि जगन्नाथ सरकार यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी त्यांची खासदारकी कायम ठेवली आहे.

...म्हणून ममता बॅनर्जींनी पोटनिवडणूक लढणं अत्यंत गरजेचं 

मुर्शिदाबादमधील शमशेरगंज आणि जंगीपूरमधील दोन उमेदवारांच्या निधनामुळे दोन जागांवरील मतदान रद्द करण्यात आले आणि त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निवडणुका अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अर्थमंत्री अमित मित्रा हे दोघं विधानसभेचे सदस्य म्हणजेच आमदार नाहीत. मित्रा यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण ममता बॅनर्जींना मात्र विधानसभेत जाण्यासाठी पोटनिवडणूक जिंकणं गरजेचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीIndiaभारतwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकcorona virusकोरोना वायरस बातम्याTrinamool Congressतृणमूल काँग्रेस