शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लढाई गांधी-गोडसे यांच्यातील, सिद्धूंचा मोदींवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 04:44 IST

लोकसभा निवडणुका म्हणजे कृष्ण आणि कंस, राम आणि रावण यांच्यातील तसेच गांधी व गोडसे यांच्यातील युद्ध आहे, असे काँग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिद्धू सभेत म्हणाले.

अहमदाबाद : लोकसभा निवडणुका म्हणजे कृष्ण आणि कंस, राम आणि रावण यांच्यातील तसेच गांधी व गोडसे यांच्यातील युद्ध आहे, असे काँग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिद्धू सभेत म्हणाले. राफेल सौदा, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या यावरून सिद्धू यांनी मोदी यांच्यावर घणाघाती हल्ला चढविला. ते म्हणाले की, चीन समुद्राखाली रेल्वे सुरू करत आहे पण भारतात मोदी मात्र चौकीदार तयार करत आहेत. तत्पूर्वी काँग्रेस नेते आणि पंजाबमधील मंत्री नवजोत सिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांना त्यांच्या होमपीचमध्ये टीकेचं लक्ष्य केलं होतं.

गुजरातमधील अहमदाबाद येथे नवजोत सिंग सिद्धू यांनी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली होती. त्यामध्ये नवजोत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधानांवर टीका करताना म्हणाले आहे की होती, मोदी सांगतात मी फकीर आहे, मी स्वयंसेवक आहे, मी चौकीदार आहे पण तुम्ही हे का सांगत नाही मी पंतप्रधान आहे. मी ठामपणे सांगतो मोदी चोर आहेत अशी घणाघाती टीका नवजोत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्यावर केली. अहमदाबादमधील धोलका येथील जाहीर सभेत ते बोलत होते. 

२०१४ साली नरेंद्र मोदी देशाला जगात सर्वश्रेष्ठ बनविण्याच्या नावाखाली सत्तेवर आले मात्र आज ते सर्वांना चौकीदार बनवत आहेत. लोकशाही आज गुंडशाही झाली आहे. जे मोदींची भक्ती करतील ते देशभक्त आणि त्यांचा विरोध करतील ते देशद्रोही ठरतात. आम्हाला पंतप्रधान आणि भाजपाच्या समर्थकांकडून देशभक्तीचं प्रमाणपत्र नको असा टोलाही नवजोत सिंग सिद्धू यांनी लगावला. इथे लोकांच्या एकवेळ जेवण मिळत नाही. उपाशी पोटी तुम्ही लोकांना योगा करायला सांगता? सर्वांना बाबा रामदेव बनवायचा आहे का? लोकांचे खिसे रिकामे अन् खाते उघडले जात आहेत असा चिमटा नवजोत सिंग सिद्धू यांनी त्यांच्या खास शैलीत काढला.

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGujarat Lok Sabha Election 2019गुजरात लोकसभा निवडणूक 2019