शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

भगवा गुंडाळून ठेवल्यानेच ठाण्याला तोकडी मदत, अतुल भातखळकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 19:06 IST

Atul Bhatkhalkar : ठाणे महापालिकेसह इतर महापालिकांवर देखील भाजपाचा झेंडा फडकेल असा दावा अतुल भातखळकरांनी केला.

ठळक मुद्देमदत ही शासनाची ती वाटतांना ती स्वत:च्या नावावर वाटण्यात आली. त्यातही ५० टक्केच मदत सुद्धा जनतेपर्यंत पोहोचलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे  : कोव्हिडच्या काळात ठाणे  महापालिकेला फक्त ६८ कोटी राज्य शासनाने दिले. ज्या महापालिकोवर सर्वात पहिला मुंबईच्याही आधी शिवसेनेचा झेंडा फडकला. त्या ठाणे महापालिकेला कोव्हिडच्या काळात मोठी मदत राज्य सरकारकडून केली जाईल, अशी आशा होती. परंतु भगवाच गुंडाळून ठेवल्याने ठाणे महापालिकेच्या वाटेला देखील सावत्र भावाची वागणूक आली असल्याची टिका भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली.

ठाण्यात महाविकास आघाडीच्या वर्षपुर्ती निमित्ताने विविध विषयांवर झालेल्या बिघाडीच्या विषयी ते बोलत होते. कोव्हिडच्या काळात ठाणे महापालिकेला अतिशय छोटी रक्कम मिळाली. २०११ च्या जागतिक लोकसंख्येचा विचार केला तर ठाणे शहराच्या लोकसंख्येला, त्यानुसार कोव्हिडच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या मागे राज्य सरकाराने ६०० रुपये सुद्धा खर्च करण्याचे औदार्य दाखविले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. 

कोव्हिडच्या काळात राज्य शासनाकडून मदत मिळावी या हेतून ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे २५० कोटींची मदत मागितली होती. परंतु आता राज्यशासनाने ठाण्याच्या तोंडाला या अशा परिस्थितीतही पाने पुसण्याचाच प्रकार केल्याची टीका त्यांनी केली. अतिशय वाईट अवस्था राज्य शासनाने ठाणे महापालिकेची करुन ठेवली आहे. त्यातही कोव्हिडच्या काळात फक्त राज्य सरकार आणि महापालिकेने जे काही धान्य दिले. ते धान्य मात्र आपआपल्या भागामध्ये स्वत:चा फोटो लावून स्वत:च्या पक्षाचे चिन्ह लावून, ते वाटण्याचा कार्यक्रम याच मंडळींनी ठाण्यात केला आहे.

आयजीच्या जीवावर बायजी उधार तसाच काहीसा हा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केली. परंतु या सर्व प्रकरणात देखील मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. मदत ही शासनाची ती वाटतांना ती स्वत:च्या नावावर वाटण्यात आली. त्यातही ५० टक्केच मदत सुद्धा जनतेपर्यंत पोहोचलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करावी ही मागणी त्यांनी यावेळी केली. 

मुंबईत कोरोना आल्यानंतर तेथील परिस्थिती हातळताना कशा प्रकारे सामना करावा लागला याची जाण राज्यशासनाला होती. परंतु एवढे असतांनाही ठाणे  आणि एमएमआर रिझनमध्ये कोव्हिडची परिस्थिती हातळण्यास त्यांना जमले नाही. मुंबईत ज्या पद्धतीने कोव्हिडच्या काळात अॅम्ब्युलेन्स न मिळणे, मृतदेहांची आदलाबदल होणे, वेळवर उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यु असे प्रकार घडले. तेच प्रकार पार्ट टू मध्ये ठाणे आणि एमएमआर रिझनमध्येही घडल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणारठाणे महापालिकेचा कारभारही सध्या चुकीच्या पद्धतीने सुरु आहे. त्यांच्या अनेक चुका भाजपाने दाखवून दिलेल्या आहेत. कोव्हिडच्या काळात महापालिकेत आयुक्त दोन दोनदा बदलणे, मदतीचा आभाव, दोन मंत्र्यांच्या अलौकीक कथा चर्चील्या जात आहेत. नागरी सोई सुविधा कमी पडलेल्या आहेत. त्यामुळे ठाण्यात किंवा कल्याण डोंबिवली महापालिका, नवी मुंबई महापालिका असो कुठेही आम्ही कमी पडणार नसून भाजपा या सर्वच ठिकाणी स्वबळावर लढणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. तसेच ठाणे महापालिकेसह इतर महापालिकांवर देखील भाजपाचा झेंडा फडकेल असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरBJPभाजपाShiv Nadarशिव नाडरUddhav Thackerayउद्धव ठाकरेthaneठाणे