शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Assam Assembly Election Results: भाजपानं आसाममध्ये जे केलं त्याने इतिहास घडला; अमित शहांच्या रणनीतीचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 18:32 IST

Assembly Election Results Live: आसाममध्ये पहिल्यांदा बिगर काँग्रेसचं सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलं आहे असा पराक्रम भाजपाने आसाममध्ये केला आहे

ठळक मुद्देआसाममध्ये विरोधी पक्षांशी मुकाबला करत भाजपाच्या नेतृत्त्वातील आघाडीने सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं आहेआसामी लोकांच्या आंदोलनातून राज्यात १९८५ आणि १९९६ मध्ये आसाम गण परिषद सत्तेत आली.नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून निवडणुकीत सुरुवातीला बचावात्मक पवित्रा घेणाऱ्या भाजपानं नंतर आक्रमक भूमिका घेतली

नवी दिल्ली – देशातील ५ राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज घोषित झाले आहेत. या निवडणुकीत भाजपाची कही खुशी कही गम अशी अवस्था झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला ममता बॅनर्जी यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात अपयश आलं आहे. याठिकाणी ममता बॅनर्जी सरकार बनवण्याची हॅट्रीक करणार आहे. तर दुसरीकडे भाजपाने आसाम विधानसभा निवडणुकीत १० पक्षांच्या महाआघाडीला उद्ध्वस्त केले आहे.

आसाममध्ये पहिल्यांदा बिगर काँग्रेसचं सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलं आहे असा पराक्रम भाजपाने आसाममध्ये केला आहे. आसाममध्ये विरोधी पक्षांशी मुकाबला करत भाजपाच्या नेतृत्त्वातील आघाडीने सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं आहे. या आघाडीत आसाम गण परिषद आणि यूनाइटेड पीपुल्स पार्टी लिबरल यांचाही समावेश आहे.आसाममध्ये पहिल्यांदा १९७८ मध्ये बिगर काँग्रेसचं सरकार बनलं होतं. त्यानंतर जनता पार्टी सत्तेत आली. मात्र १८ महिन्यानंतर अंतर्गत वादातून गोलप बोरबोरा सरकार कोसळलं. आसामी लोकांच्या आंदोलनातून राज्यात १९८५ आणि १९९६ मध्ये आसाम गण परिषद सत्तेत आली. परंतु तेदेखील सलग दोनदा सत्तेत राहिले नाहीत. २००१ पासून २००६ पर्यंत आसाममध्ये तरूण गोगाई यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं सरकार होतं.

हिंदू मतांची एकजूट

या निकालातून दिसत आहे की, भाजपाने आसाममध्ये काँग्रेस आघाडीत सहभागी असणाऱ्या बदरुद्दीन अजमल यांच्यावर निशाणा साधत हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यात यश मिळवलं. २०१४, २०१६ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचं दमदार यश या निवडणुकीतही कायम राहिले.

CAA मुद्द्यावर आक्रमक

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून निवडणुकीत सुरुवातीला बचावात्मक पवित्रा घेणाऱ्या भाजपानं नंतर आक्रमक भूमिका घेत सडेतोड मतं मांडली. घुसखोरांचा मुद्दा उचलत सत्ताधारी पक्षाने दावा केला की, महाआघाडी सत्तेत आला तर स्थानिक लोकांचे जीवन धोक्यात आहे. भाजपाची ही रणनीती निवडणुकीत कामाला आली.

सोशल इंजिनिअरिंगचं राजकारण

तज्ज्ञांच्या मते, आसामी मतदारांसोबतच भाजपाने सोशल इंजिनिअरिंगचं राजकारणही केले. कार्बी, दिमासा, मीशिग,राभा आणि तिवा समुदायाच्या मतदारांना पक्षाकडे वळवण्यात भाजपाला यश आलं. त्याचा परिणाम असा झाला की महाआघाडीचे उमेदवार अनेक ठिकाणी पडले.

टॅग्स :BJPभाजपाAssam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१congressकाँग्रेस