शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

Assam Assembly Election Results: भाजपानं आसाममध्ये जे केलं त्याने इतिहास घडला; अमित शहांच्या रणनीतीचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 18:32 IST

Assembly Election Results Live: आसाममध्ये पहिल्यांदा बिगर काँग्रेसचं सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलं आहे असा पराक्रम भाजपाने आसाममध्ये केला आहे

ठळक मुद्देआसाममध्ये विरोधी पक्षांशी मुकाबला करत भाजपाच्या नेतृत्त्वातील आघाडीने सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं आहेआसामी लोकांच्या आंदोलनातून राज्यात १९८५ आणि १९९६ मध्ये आसाम गण परिषद सत्तेत आली.नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून निवडणुकीत सुरुवातीला बचावात्मक पवित्रा घेणाऱ्या भाजपानं नंतर आक्रमक भूमिका घेतली

नवी दिल्ली – देशातील ५ राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज घोषित झाले आहेत. या निवडणुकीत भाजपाची कही खुशी कही गम अशी अवस्था झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला ममता बॅनर्जी यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात अपयश आलं आहे. याठिकाणी ममता बॅनर्जी सरकार बनवण्याची हॅट्रीक करणार आहे. तर दुसरीकडे भाजपाने आसाम विधानसभा निवडणुकीत १० पक्षांच्या महाआघाडीला उद्ध्वस्त केले आहे.

आसाममध्ये पहिल्यांदा बिगर काँग्रेसचं सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलं आहे असा पराक्रम भाजपाने आसाममध्ये केला आहे. आसाममध्ये विरोधी पक्षांशी मुकाबला करत भाजपाच्या नेतृत्त्वातील आघाडीने सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं आहे. या आघाडीत आसाम गण परिषद आणि यूनाइटेड पीपुल्स पार्टी लिबरल यांचाही समावेश आहे.आसाममध्ये पहिल्यांदा १९७८ मध्ये बिगर काँग्रेसचं सरकार बनलं होतं. त्यानंतर जनता पार्टी सत्तेत आली. मात्र १८ महिन्यानंतर अंतर्गत वादातून गोलप बोरबोरा सरकार कोसळलं. आसामी लोकांच्या आंदोलनातून राज्यात १९८५ आणि १९९६ मध्ये आसाम गण परिषद सत्तेत आली. परंतु तेदेखील सलग दोनदा सत्तेत राहिले नाहीत. २००१ पासून २००६ पर्यंत आसाममध्ये तरूण गोगाई यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं सरकार होतं.

हिंदू मतांची एकजूट

या निकालातून दिसत आहे की, भाजपाने आसाममध्ये काँग्रेस आघाडीत सहभागी असणाऱ्या बदरुद्दीन अजमल यांच्यावर निशाणा साधत हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यात यश मिळवलं. २०१४, २०१६ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचं दमदार यश या निवडणुकीतही कायम राहिले.

CAA मुद्द्यावर आक्रमक

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून निवडणुकीत सुरुवातीला बचावात्मक पवित्रा घेणाऱ्या भाजपानं नंतर आक्रमक भूमिका घेत सडेतोड मतं मांडली. घुसखोरांचा मुद्दा उचलत सत्ताधारी पक्षाने दावा केला की, महाआघाडी सत्तेत आला तर स्थानिक लोकांचे जीवन धोक्यात आहे. भाजपाची ही रणनीती निवडणुकीत कामाला आली.

सोशल इंजिनिअरिंगचं राजकारण

तज्ज्ञांच्या मते, आसामी मतदारांसोबतच भाजपाने सोशल इंजिनिअरिंगचं राजकारणही केले. कार्बी, दिमासा, मीशिग,राभा आणि तिवा समुदायाच्या मतदारांना पक्षाकडे वळवण्यात भाजपाला यश आलं. त्याचा परिणाम असा झाला की महाआघाडीचे उमेदवार अनेक ठिकाणी पडले.

टॅग्स :BJPभाजपाAssam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१congressकाँग्रेस