शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

Assam Assembly Election Results: भाजपानं आसाममध्ये जे केलं त्याने इतिहास घडला; अमित शहांच्या रणनीतीचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 18:32 IST

Assembly Election Results Live: आसाममध्ये पहिल्यांदा बिगर काँग्रेसचं सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलं आहे असा पराक्रम भाजपाने आसाममध्ये केला आहे

ठळक मुद्देआसाममध्ये विरोधी पक्षांशी मुकाबला करत भाजपाच्या नेतृत्त्वातील आघाडीने सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं आहेआसामी लोकांच्या आंदोलनातून राज्यात १९८५ आणि १९९६ मध्ये आसाम गण परिषद सत्तेत आली.नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून निवडणुकीत सुरुवातीला बचावात्मक पवित्रा घेणाऱ्या भाजपानं नंतर आक्रमक भूमिका घेतली

नवी दिल्ली – देशातील ५ राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज घोषित झाले आहेत. या निवडणुकीत भाजपाची कही खुशी कही गम अशी अवस्था झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला ममता बॅनर्जी यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात अपयश आलं आहे. याठिकाणी ममता बॅनर्जी सरकार बनवण्याची हॅट्रीक करणार आहे. तर दुसरीकडे भाजपाने आसाम विधानसभा निवडणुकीत १० पक्षांच्या महाआघाडीला उद्ध्वस्त केले आहे.

आसाममध्ये पहिल्यांदा बिगर काँग्रेसचं सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलं आहे असा पराक्रम भाजपाने आसाममध्ये केला आहे. आसाममध्ये विरोधी पक्षांशी मुकाबला करत भाजपाच्या नेतृत्त्वातील आघाडीने सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं आहे. या आघाडीत आसाम गण परिषद आणि यूनाइटेड पीपुल्स पार्टी लिबरल यांचाही समावेश आहे.आसाममध्ये पहिल्यांदा १९७८ मध्ये बिगर काँग्रेसचं सरकार बनलं होतं. त्यानंतर जनता पार्टी सत्तेत आली. मात्र १८ महिन्यानंतर अंतर्गत वादातून गोलप बोरबोरा सरकार कोसळलं. आसामी लोकांच्या आंदोलनातून राज्यात १९८५ आणि १९९६ मध्ये आसाम गण परिषद सत्तेत आली. परंतु तेदेखील सलग दोनदा सत्तेत राहिले नाहीत. २००१ पासून २००६ पर्यंत आसाममध्ये तरूण गोगाई यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं सरकार होतं.

हिंदू मतांची एकजूट

या निकालातून दिसत आहे की, भाजपाने आसाममध्ये काँग्रेस आघाडीत सहभागी असणाऱ्या बदरुद्दीन अजमल यांच्यावर निशाणा साधत हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यात यश मिळवलं. २०१४, २०१६ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचं दमदार यश या निवडणुकीतही कायम राहिले.

CAA मुद्द्यावर आक्रमक

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून निवडणुकीत सुरुवातीला बचावात्मक पवित्रा घेणाऱ्या भाजपानं नंतर आक्रमक भूमिका घेत सडेतोड मतं मांडली. घुसखोरांचा मुद्दा उचलत सत्ताधारी पक्षाने दावा केला की, महाआघाडी सत्तेत आला तर स्थानिक लोकांचे जीवन धोक्यात आहे. भाजपाची ही रणनीती निवडणुकीत कामाला आली.

सोशल इंजिनिअरिंगचं राजकारण

तज्ज्ञांच्या मते, आसामी मतदारांसोबतच भाजपाने सोशल इंजिनिअरिंगचं राजकारणही केले. कार्बी, दिमासा, मीशिग,राभा आणि तिवा समुदायाच्या मतदारांना पक्षाकडे वळवण्यात भाजपाला यश आलं. त्याचा परिणाम असा झाला की महाआघाडीचे उमेदवार अनेक ठिकाणी पडले.

टॅग्स :BJPभाजपाAssam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१congressकाँग्रेस