शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांचा दावा खोटा ठरवण्यासाठी अमित शाह मैदानात; भाजपाचा प्लॅन यशस्वी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 10:47 IST

Uttar Pradesh Assembly Election 2022: मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत शरद पवार(Sharad Pawar) यांनी भाजपाचे १३ आमदार समाजवादी पक्षात प्रवेश करतील असा दावा केला होता

नवी दिल्ली – आगामी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी(UP Assembly Election 2022) भाजपाला अनेक धक्के मिळत आहे. त्यातच स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह अनेक आमदार राजीनामा देत असल्याने भाजपा हायअलर्टवर आली आहे. परिस्थिती सांभाळण्यासाठी भाजपानं कमान गृहमंत्री अमित शाह यांच्या हाती दिली आहे. कुठल्याही प्रकारे मौर्य यांना रोखून भाजपाला लागलेली गळती थांबवण्याचं आव्हान शाह यांच्यासमोर आहे.

मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत शरद पवार(Sharad Pawar) यांनी भाजपाचे १३ आमदार समाजवादी पक्षात प्रवेश करतील असा दावा केला होता. पवारांचा हा दावा खोटा ठरवण्यासाठी अमित शाह यांनी कंबर कसली आहे. भाजपात नाराज असलेल्या नेत्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, कॅबिनेट मंत्री दारासिंह चौहान, राज्यमंत्री धर्मसिंह सैनी, आमदार ममतेश शाक्य, विनय शाक्य, धर्मेंद्र शाक्य, विधान परिषद आमदार देवेंद्रप्रताप सिंह हे भाजपा सोडणार असल्याची बातमी व्हायरल झाली. त्यानंतर या नेत्यांना दिल्लीहून फोन येऊ लागले. जर काही नाराजी असेल तर बसून चर्चा करुया. नेतृत्व तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. परंतु घाईगडबडीत असा कुठलाही निर्णय घेऊ नका ज्यामुळे पक्षाला आणि वैयक्तिक तुम्हाला राजकीय नुकसान होईल अशी हमी दिल्लीतून देण्यात आली आहे.

स्वामी प्रसाद यांच्यानंतर आणखी २ मंत्री, ६ आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा आहे. मंगळवारी दिवसभर चर्चा सुरु होती. परंतु अद्याप कुणी राजीनामा दिला नाही. परंतु काही काळात ते समाजवादी पक्षात सहभागी होतील असा दावा करण्यात येत आहे. मौर्य यांच्या दाव्याप्रमाणे १० ते १२ आमदार भाजपाचा राजीनामा देतील. ४ भाजपा आमदार राकेश राठौर, जय चौबे, माधुरी वर्मा आणि राधाकृष्ण शर्मा हे याआधीच समाजवादी पक्षात सहभागी झाले आहेत.

अमित शाह डॅमेज कंट्रोल करणार?

अमित शाह(Amit Shah) यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांची समजूत काढण्यासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना जबाबदारी  दिली आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांची ताकद भाजपाला चांगलीच माहिती आहे. मौर्य यांच्या राजकीय ताकदीचा फायदा भाजपाला २०१७ च्या निवडणुकीत झाला होता. तेव्हा स्वामी प्रसाद मौर्य बीएसपीचे ताकदवान नेते होते. निवडणुकीच्य काळात त्यांनी बसपाची साथ सोडत भाजपात प्रवेश घेतला होता. यूपीच्या निवडणूक आखाड्यात ओबीसी समुदायाचं किती महत्त्व आहे हे सर्वच राजकीय पक्षांना माहिती आहे.

यूपीत ओबीसी समाजाची लोकसंख्या ४२ टक्के आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपाने १२५ ओबीसी उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. स्वामी प्रसाद मौर्य यांनी त्यांची राजकीय ताकद २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दाखवली होती. जेव्हा मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबातील सदस्य धर्मेंद्र यादव यांना हरवून मौर्य यांची मुलगी खासदार म्हणून निवडून आली. आता स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपा सोडणं पक्षासाठी निवडणुकीच्या काळात अडचणीचं ठरु शकतं. त्यामुळे स्वामी प्रसाद मौर्य यांची नाराजी दूर करण्यात भाजपाला यश येणार का? हे आगामी काळात ठरेल.   

टॅग्स :Amit Shahअमित शाहSharad Pawarशरद पवारUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा