शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Assam : महागाई-रोजगार बनला निवडणुकीचा मुद्दा, सीएए, भूमिहीनांचा प्रश्नही ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 05:15 IST

Assam Assembly Elections 2021: आसाममध्ये पहिल्या टप्प्यात शनिवारी मतदान पार पडले. तब्बल ७७ टक्के लोकांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. यंदाच्या निवडणुकीत अनेक मुद्दे चर्चिले जात असले तरी महागाई आणि रोजगार या मुद्यांवर राजकारण केंद्रित झाल्याचे दिसून येत आहे. 

 गुवाहाटी : आसाममध्ये पहिल्या टप्प्यात शनिवारी मतदान पार पडले. तब्बल ७७ टक्के लोकांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. यंदाच्या निवडणुकीत अनेक मुद्दे चर्चिले जात असले तरी महागाई आणि रोजगार या मुद्यांवर राजकारण केंद्रित झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात चहाच्या मळ्यात काम करणारे लाखो कामगार आहेत. त्यांना कमी रोजंदारी मिळते अशी तक्रार आहे. काँग्रेसने जाहीरनाम्यात स्पष्ट केले आहे की, सत्ता आल्यास या मजुरांची रोजंदारी ३६५ रुपये करण्यात येईल. देशात अन्य राज्याच्या तुलनेत या राज्यातील मजुरांची मजुरी कमी आहे. सध्या या मजुरांना १६७ रुपये रोजंदारी मिळते. महागाईच्या या काळात ही मजुरी अतिशय कमी असल्याची तक्रार आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्यांपुढील समस्या वाढल्या आहेत. निवडणुकीत हा मुद्दाही समोर येत आहे. जानेवारीत आसाममध्ये गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक लाखापेक्षा अधिक लोकांना जमिनीचे प्रमाणपत्र दिले होते. मागील सरकारांनी भूमिहीनांना जमीन देण्यात रस दाखविला नाही, असा आरोपही त्यांनी केला होता. भाजप सरकारने सव्वा दोन लाख कुटुंबांना जमिनीचा भाडेपट्टा दिला आहे, असे त्यांनी सांगितले होते. काँग्रेसने जाहीरनाम्यात असा शब्द दिला आहे की, सरकारी मालकीच्या जमिनीचा भाडेपट्टा भूमिहीनांना देण्यात येईल.  

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१